शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

राहुल गांधींनी काँग्रेस छोडो कार्यक्रमाकडे लक्ष द्यावे; राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

By नितीन चौधरी | Updated: November 3, 2022 19:43 IST

महाराष्ट्रात येत असली तरी ती 'भारत जोडो' यात्रा नव्हे, तर 'पुढारी जोडो' यात्रा

पुणे: राहुल गांधी यांना यापूर्वीच मी सल्ला दिला आहे की, काँग्रेस छोडो कार्यक्रमाकडे लक्ष द्या. विविध योजनांतून सामान्य नागरिक पक्षाशी जोडला जातो. पण यात्रेतून जोडला जात नाही, असा टोला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. संपूर्ण देशात काँग्रेसची वाताहात झाली असून ही यात्रा आता महाराष्ट्रात येत असली तरी ती 'भारत जोडो' यात्रा नव्हे, तर 'पुढारी जोडो' यात्रा आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. 

पुण्यात विधानभवनात एका बैठकीसाठी ते आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सरसावले आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा नसून ती पुढारी जोडो यात्रा झाली आहे. त्यापेक्षा वेगळे महत्त्व त्याला राहिले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसची अवस्था कशी झाली हे पाहिले आहे. मंत्रीपदासाठी सत्तेत राहायचे. राज्याची आणि देशाची पातळीवर सारखीच अवस्था आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांना आता कोणी गृहीत धरत नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे फारसा फरक पडेल असे वाटत नाही.”

गुजरातमध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळेल असा दावा केला जात आहे, याबाबत ते म्हणाले, “गुजरातमध्ये निरंतरपणे भाजपची सत्ता राहिली आहे.देशात विकासाचे मॉडेल म्हणून गुजरातकडे पाहिले जाते. नरेंद्र मोदी यांना जनाधार आहे. यंदाच्या गुजरातमधील निवडणुकांमध्ये सुद्धा जनता मोदी यांच्या पाठीशी असेल त्यात काही तिळमात्र शंका नाही.” तर राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळविले जात असल्याच्या टीकेला उत्तर देताना, उद्योगमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्वेतपत्रिका येऊ देत. त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल. विरोधकांनी टीकेचा सूर जो सुरु केला आहे सत्ता गेल्याचा वैफल्य आहे. त्यातून बेछूट आरोप सुरु आहेत. राज्याचे काम उत्तम सुरु आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेRahul Gandhiराहुल गांधीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस