शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 11:33 AM

चाकूहल्ला प्रकरण

ठळक मुद्दे प्रशासनाने याबाबत गंभीर पाऊल उचलण्याचा घेतला निर्णय सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावे

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानावर एका तरुणावर व त्याच्या मित्रांवर अनोळखी व्यक्तीने चाकूसारख्या हत्याराने वार केल्याची घटना नुकतीच घडली. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने याबाबत गंभीर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.शाहरुख शेख (वय २३ रा. दापोडी) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी एका अनोळखी सायकलस्वार व्यक्तीविरोधात गुन्हा दखल केला आहे. शाहरुख शेख हे त्यांच्या मैत्रिणीसह विद्यापीठाच्या मैदानात गप्पा मारत बसले होते. त्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याबरोबर गैरसमजातून भांडण केले. त्यामुळे शेख यांनी भांडण सोडविण्यासाठी त्यांचा भाऊ अझर शेख व त्याचा मित्र चेतन येडल्लू यांना बोलवले. परंतु, अनोळखी व्यक्तीने या तिघांवर चाकूसारख्या हत्याराने वार करून त्यांना जखमी केले. पोलिसांकडून या अनोळखी व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. विद्यापीठाचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. फिर्यादी व आरोपी हे सर्व विद्यापीठाबाहेरचे आहेत, असे पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. माळेगावे यांनी सांगितले.काही वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या आवारात विद्यापीठाच्याच सुरक्षा रक्षकाचा खून झाला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देत विद्यापीठात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. तसेच पोलिसांकडून सुरक्षा ऑडिट करून संरक्षक भिंत बांधून घेतली. तसेच, सुरक्षारक्षकांची संख्या वाढविली. सद्य:स्थितीत विद्यापीठात महत्त्वाच्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक व होमगार्ड नियुक्त केले आहेत. सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी दिली आहे.विद्यापीठातील दोन विद्यार्थी संघटनांमध्ये काही महिन्यांपूर्वी जोरदार हाणामारी झाली होती. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यातच दोन-तीन दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ५ मध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली. त्यामुळे विद्यापीठात बेकायदेशीपणे राहून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाºया विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे...................

सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावेविद्यापीठाच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस निर्णय घेतला आहेत. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून येणाºया प्रत्येकाची चौकशी केली जाईल. त्यानंतरच त्याला विद्यापीठात प्रवेश मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांसह विद्यापीठात काही कामानिमित्त येणाºया व्यक्तींची गैरसोय होऊ शकते.परंतु, विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले आहे.

 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकर