शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

गुंजवणीच्या पाण्यासाठी पुरंदरचा एकमुखी ठराव , २ टीएमसी पाणी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 3:18 AM

गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला.

खळद : गुंजवणी प्रकल्पातील बंद पाइपलाइनच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि भोर, वेल्ह्यासह पुरंदरच्या शेतक-यांना आमच्या वाट्याचे २ टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, असा एकमुखी ठराव आज करण्यात आला.शिवरी येथील शिवपार्वती लॉन्स मंगल कार्यालयात शनिवारी गुंजवणी प्रकल्पाबाबत जनसुनावणी पार पडली. यावेळी ११०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून जनसुनवाई हा याचाच एक भाग असून, या जनसुनवाईनंतर लगेचच तो मंजुरीसाठी ठेवण्यात येईल व अंतिम मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया होऊन वर्षभरात कामाला सुरुवात होईल, असे अधिकाºयांनी सांगत सहकार्याचे आवाहन केले.जनसुनावणीला पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, उपसभापती दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, हरिभाऊ लोळे,रमेश इंगळे, कैलास कामथे, दिलीप गिरमे, शिवाजीराव पवार, राजेंद्र झेंडे, बाळासाहेब थेऊरकर, अनिल जगताप, बबनराव कामथे, आत्माराम कामथे, सतीश लिंभोरे, किशोर लिंभोरे, राजाभाऊ क्षीरसागर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट, उपअभियंता दिगंबर दुबल, शिवाजी डेंगळे, शहाजी सस्ते आदींनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली.यावेळी प्रकल्पाची तांत्रिक व अन्य स्वरूपाची माहिती अधिकाºयांनी उपस्थितांना दिली. बंद जलवाहिनी असलेला गुंजवणी हा देशातील पहिला अत्याधुनिक प्रकल्प असल्याची माहिती यावेळी अधीक्षक अभियंता धुमाळ यांनी दिली. ते म्हणाले की,या प्रकल्पाला केंद्राकडून दुष्काळी निधीतून काही कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. उर्वरित तरतूद राज्य शासनाने केलेली आहे.या जनसुनवाईदरम्यान सर्वांनी या योजनेचे स्वागत केले. मात्र, जुन्या योजनेत ज्या २५ गावांचा समावेश आहे, या गावांतील जमिनीवर सीलिंग करण्यात आले असून, आता या योजनेत नारायणपूर अंतर्गत १७ नवीन गावांचा समावेश झाला असल्याने आमचे सीलिंग कमी करून या गावांवरही सीलिंग टाकावे, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकºयांनी केली.योजनेची वैशिष्ट्ये३६५ दिवस २४ तास पाणी उपलब्धता शेतकºयांना त्यांच्या सोयीनुसार पिके घेण्याचे स्वातंत्र्य ठिबक किंवा पाट पद्धतीने पाणी वापरण्याची तिन्ही तालुक्यांतील शेतकºयांना मुभा. २४०० मि.मी. व्यासाचा पाईप आवश्यक तेथे स्लुईस व एअर वॉल्व्ह सिंचनाखालील क्षेत्र : वेल्हा - ८५० हेक्टर, भोर - ९४३५ हेक्टर, पुरंदर - १११०७ हेक्टर पाण्याचे प्रेशरहेड आउटलेटच्या मुखाशी असल्याने नारायणपूर उपसा सिंचन योजनेतील शेतकºयांना विद्युत पंप बसवण्याची आवश्यकताराहणार नाही. ६४८५ अश्वशक्तीने होणार पंपिंग पाणीवापर संस्थांची निर्मिती

टॅग्स :Waterपाणी