शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

Purandar Airport : पुरंदर तालुक्यात ग्राम सुरक्षा यंत्रणेला घरघर; ग्रामस्थांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:20 IST

चोरी, दरोडा, आग, सर्पदंश, बिबट्याचा हल्ला, अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळवण्यासाठी शासनाने सुरू केलेली ही यंत्रणा प्रभावी ठरत होती.

नीरा :पुरंदर तालुक्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे. गावागावांतून या यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. चोरी, दरोडा, आग, सर्पदंश, बिबट्याचा हल्ला, अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळवण्यासाठी शासनाने सुरू केलेली ही यंत्रणा प्रभावी ठरत होती. मात्र, ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे आणि यंत्रणेच्या देखभालीकडे लक्ष न दिल्याने ही सुविधा बंद पडली आहे. यामुळे ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीत जलद मदत मिळणे कठीण झाले आहे.

ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे १८००२७०३६०० या क्रमांकावर कॉल करून गावातील कोणतीही व्यक्ती आपत्कालीन परिस्थितीची माहिती देऊ शकत होती. यामुळे संबंधित पोलिस ठाण्याला तत्काळ माहिती मिळून घटनांवर नियंत्रण मिळविणे शक्य होत होते. चोरी, दरोडा, आग, अपघात यांसारख्या घटनांवर त्वरित कारवाई होत असे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांनी या यंत्रणेचा वापर करणे बंद केले आहे. परिणामी, ही यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असून, ग्रामपंचायतींचे पैसेही वाया जात आहेत.

तालुक्यातील वाढत्या गुन्ह्यांमुळे चिंता

गेल्या दोन-तीन महिन्यांत पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी आणि विद्युत रोहित्र चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. नीरा, मांडकी, जेऊर, पिंपरे, गुळुंचे, कर्नलवाडी, थोपटेवाडी, पिसुर्टी यांसारख्या गावांमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्यात जेऊर, मांडकी, पिंपरे (खुर्द), गुळुंचे, कर्नलवाडी येथे चार-पाच व्यक्ती कोयते आणि रुमाल बांधून घरफोडीच्या उद्देशाने फिरताना ग्रामपंचायतींच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आढळले. मात्र, अशा वेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर न झाल्याने या घटना रोखण्यात अपयश आले आहे.

ग्रामपंचायतींची उदासीनता

मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतींनी या यंत्रणेची देखभाल आणि त्यासाठी लागणारी रक्कम न भरल्याने ही योजना बंद पडली आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचा आर्थिक भार ग्रामपंचायतींवर असतो. मात्र, ग्रामपंचायती या यंत्रणेचा उपयोग ग्रामसभेची माहिती, पाणीपुरवठा, आरोग्य शिबिरे, रेशन वाटप, आणि शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठीही करत नाहीत. हजारो रुपये खर्च करूनही ग्रामपंचायत प्रशासन याबाबत उदासीन का आहे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

ग्रामस्थांची मागणी

ग्राम सुरक्षा यंत्रणा पुन्हा कार्यान्वित व्हावी, अशी मागणी तालुक्यातील गावांमधील ग्रामस्थ करीत आहेत. ही यंत्रणा सुरू असताना चोरी आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळत होती. सध्या जिल्हा पातळीवर ही योजना पुन्हा प्रभावीपणे राबविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. ग्रामस्थांनी या यंत्रणेचा वापर वाढवून गावातील सुरक्षितता सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPurandarपुरंदरAirportविमानतळ