शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पुरंदर विमानतळासाठी चार महिन्यांत भूसंपादन सुरु करणार : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 20:35 IST

पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपुरंदरमध्ये विमानतळ सिटीदेखील उभारणारआंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करून विमानतळ शहर असणारपुणे शहराची पुढील काही वर्षांत होणारी वाढ लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे गरजेचे

पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी येत्या चार महिन्यांत जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. तसेच विमानतळ परिसरात नगर रचना विभागाच्या नियमाप्रमाणे एक उत्तम शहर (सिटी) उभारणार आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात कार्यक्रमप्रसंगी दिले.पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ ६२० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या जमीन भूसंपादन कसे करायचे याचे नियोजन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे करत आहेत. त्याचबरोबर या विमानतळाच्या परिसरात विमानतळ शहर (सिटी) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नगर रचनेच्या नियमांनुसार (टीपी स्कीम) प्रारूप आराखडा तयार करण्यात येणार आहे.  केवळ सिमेंट कॉँक्रिटचे जंगल उभे न करता त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करून अत्याधुनिक सर्व सुविधा असलेले असे हे विमानतळ शहर असणार आहे. या विमानतळ सिटीमध्ये सुनियोजित पक्के रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, शाळा, बगीचे, दवाखाने, विद्यूतीकरण, इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले. विमानतळासाठी नियोजन सुरू आहे. जेणेकरून या ठिकाणी अधिकाधिक गुंतवणूक वाढेल. यासाठी तीन-चार सरकारी कंपन्या एकत्रित काम करत असून, हा विषय अंतिम टप्प्यात असल्याचे फडणवीस याप्रसंगी म्हणाले. ....................खडकवासला ते फुरसुंगी टनेल बांधापुणे शहराची पुढील काही वर्षांत होणारी वाढ लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मुळशी धरणातील पाणी भीमा पात्रात सोडून ते पाणी पूर्व भागातील तालुक्यांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा. तसेच पाण्याची होणारी गळती थांबविण्यासाठी खडकवासला ते फुरसुंगी असा किलोमीटर टनेल बांधावा. त्यामुळे जवळपास ३ टीएमसी पाणी बचत यामधून होईल, अशा प्रमुख मागण्या जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत.................पीएमआरडीएची स्थापना होऊन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांत मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. रिंगरोड, मेट्रो आणि टाऊन प्लनिंगच्या १४ योजना प्रामुख्याने करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील ३२ किलोमीटरच्या रिंगरोडचे काम सुरू असून, लवकरच पुढील दोन महिन्यांत ते पूर्ण होईल. पीएमआरडीएच्या वतीने शेतकऱ्यांना श्रीमंत करणारे प्रकल्प राबविण्यात येत आहे. - गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे

टॅग्स :PurandarपुरंदरAirportविमानतळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgirish bapatगिरीष बापटFarmerशेतकरी