शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळासाठी चार महिन्यांत भूसंपादन सुरु करणार : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 20:35 IST

पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपुरंदरमध्ये विमानतळ सिटीदेखील उभारणारआंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करून विमानतळ शहर असणारपुणे शहराची पुढील काही वर्षांत होणारी वाढ लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे गरजेचे

पुणे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी येत्या चार महिन्यांत जमीन भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. तसेच विमानतळ परिसरात नगर रचना विभागाच्या नियमाप्रमाणे एक उत्तम शहर (सिटी) उभारणार आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात कार्यक्रमप्रसंगी दिले.पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ ६२० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. विमानतळासाठी लागणाऱ्या जमीन भूसंपादन कसे करायचे याचे नियोजन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे करत आहेत. त्याचबरोबर या विमानतळाच्या परिसरात विमानतळ शहर (सिटी) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी नगर रचनेच्या नियमांनुसार (टीपी स्कीम) प्रारूप आराखडा तयार करण्यात येणार आहे.  केवळ सिमेंट कॉँक्रिटचे जंगल उभे न करता त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करून अत्याधुनिक सर्व सुविधा असलेले असे हे विमानतळ शहर असणार आहे. या विमानतळ सिटीमध्ये सुनियोजित पक्के रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, शाळा, बगीचे, दवाखाने, विद्यूतीकरण, इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले. विमानतळासाठी नियोजन सुरू आहे. जेणेकरून या ठिकाणी अधिकाधिक गुंतवणूक वाढेल. यासाठी तीन-चार सरकारी कंपन्या एकत्रित काम करत असून, हा विषय अंतिम टप्प्यात असल्याचे फडणवीस याप्रसंगी म्हणाले. ....................खडकवासला ते फुरसुंगी टनेल बांधापुणे शहराची पुढील काही वर्षांत होणारी वाढ लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मुळशी धरणातील पाणी भीमा पात्रात सोडून ते पाणी पूर्व भागातील तालुक्यांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पुढाकार घ्यावा. तसेच पाण्याची होणारी गळती थांबविण्यासाठी खडकवासला ते फुरसुंगी असा किलोमीटर टनेल बांधावा. त्यामुळे जवळपास ३ टीएमसी पाणी बचत यामधून होईल, अशा प्रमुख मागण्या जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत.................पीएमआरडीएची स्थापना होऊन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांत मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. रिंगरोड, मेट्रो आणि टाऊन प्लनिंगच्या १४ योजना प्रामुख्याने करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील ३२ किलोमीटरच्या रिंगरोडचे काम सुरू असून, लवकरच पुढील दोन महिन्यांत ते पूर्ण होईल. पीएमआरडीएच्या वतीने शेतकऱ्यांना श्रीमंत करणारे प्रकल्प राबविण्यात येत आहे. - गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे

टॅग्स :PurandarपुरंदरAirportविमानतळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgirish bapatगिरीष बापटFarmerशेतकरी