शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आळंदीकरांना काळ्या पाण्याची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:11 AM

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात आले ...

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत लाखो रुपये खर्चून जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात आले आहे. मात्र लाखो रुपये खर्चूनही आळंदीकरांना पिण्यासाठी हक्काचे स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. मागील काही दिवसांपासून शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातून नागरिकांना स्वच्छ पाण्याऐवजी गढूळ मलमिश्रित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे स्थानिकांना पिण्यासाठी विकत पाणी खरेदी करण्याची वेळ ओढवली आहे.

आळंदी शहराला दररोज ५० ते ६० लाख लिटर स्वच्छ पाण्याची गरज आहे. शहरात स्वच्छ पाणी वितरीत करण्यासाठी इंद्रायणी नदीलगत वाॅटरप्रूप जलशुद्धीकरण केंद्र आहे. सध्या मात्र जलशुद्धीकरण केंद्रातून नळाद्वारे मलमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. नळाद्वारे प्राप्त झालेल्या या पाण्याचा कुबट वास येत असून ते पिण्यायोग्य नसल्याची सत्यस्थिती समोर येऊ लागली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना जुलाब, उलट्या, साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, मागील आठ दिवसांपासून नागरिकांना पिण्यासाठी विकत जार आणावे लागत आहे. नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून लवकरात लवकर शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

“ नळाद्वारे गढूळ पाणी वितरीत केले जात असल्यामुळे आम्हा नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न समोर उभा राहिला आहे. या पाण्याचा उग्र वास येत असून अतिशय गढूळ पाणी आहे. परिणामी जुलाब, उलट्या, साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे.

- संदीप नाईकरे, नागरिक

फोटो ओळ : हा घ्या पुरावा... आळंदीत रविवारी (दि.१७) नळाद्वारे वितरित झालेले काळेकुट्ट पाणी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)