शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

इंथेनॉल निर्मितीत पुणे महत्वाचे केंद्र - धर्मेंद्र प्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 4:11 PM

पर्यायी इंधन आणि उर्जा स्त्रोत ही देशाची गरज आहे. त्यामुळे इंथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, बायोडिझेल निर्मितीला प्रोत्साहन देणे गरजेचे  आहे.

पिंपरी : पर्यायी इंधन आणि उर्जा स्त्रोत ही देशाची गरज आहे. त्यामुळे इंथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, बायोडिझेल निर्मितीला प्रोत्साहन देणे गरजेचे  आहे. यासाठी इंथेनॉल निर्मिती आणि संशोधन यामध्ये पुणे हे महत्वाचे केंद्र आहे. बायो फ्युअल या इंधन माध्यमांचे, चौथ्या औद्योगिक आणि आर्थिक क्रांतीचे  नेतृत्व पुण्याने करावे, बॉयो फ्लुअल पॉलीसी लवकरच तयार करून मंजूर केली जाईले, असे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडीतील सीआयआरटीतील राष्ट्रीय परिषदेत दिले. 

सीआरआरटीतील ‘इथेनॉल-वाहतूकीसाठी इंधन’ या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. प्रारंभी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलला पर्यायी इंधन आणि बायो फ्लुअल पॉलिसी किती आवश्यक आहे, भविष्यातील इंधनाचे स्त्रोत शोधणे आवश्यक आहे, हे सांगितले.   बायो फ्लुअल पॉलिसी स्विकारून पेट्रोलियम मंत्रालयाने नव्या धोरणास गती द्यावी, अशी मागणी केली. त्यावर धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आधुनिक भारताच्या विकासासाठी इंधनाचे नवे पर्याय शोधणे गरजेचे आहे. २०१३ मध्ये तीस कोटी लीटर इथेनॉल घेतले जात होते. त्यावेळी सत्तावीस रूपये प्रति लिटर दर दिला जाईल. 

२०१४ मध्ये ८० कोटी लीटर पेट्रोल घेतले जात असे. २०१५ मध्ये ११० कोटी लीटर पेट्रोल इंधन घेतले जात. पुढील काही काळाचा विचार केल्यास तीन हजार करोड पेट्रोलची गरज असणार आहे. त्यामुळे दहा टक्के इथेनॉल मिक्स करण्याचे धोरण स्विकारले तरी तीनशे कोटी लीटरची आवश्यकता आहे. आता  ११० कोटी लीटर इंथेनॉल मिळत आहे. हे उत्पादन यावर्षी १५५ कोटी लीटरपर्यंत न्यायचे आहे. आम्ही लकवरच बायो फ्युअल पॉलिसी घेऊन येत आहोत. २०३० विचार केल्यास आपणास पाच हजार करोड लीटर  इथेनॉलची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी २० टक्के जरी उत्पादन झाले. तरी हजार कोटी लीटरची निर्मिती आवश्यक असणार आहे. 

इथेनॉल निर्मिती गरजेची असून महाराष्ट्रात साखर कारखाने जास्त आहेत. त्यांनी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. देशातच बायो सिएनजी, मिथेनॉल, इंथेनॉल, बायोडिझेल यातून पर्यायी इंधन उपलब्ध झाल्यास रोजगार निर्मिती होईल, उत्पादकता वाढेल, आणि आयात करणे कमी होईल. पर्यायी इंधनातून देशात एक लाख करोड रोजगार उलब्ध होती. दोन लाख करोडची नवी अर्थनिती उदयास येईल.