शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यानगरी बरोबरच आधुनिक ऊर्जा निर्मितीचे केंद्रबिंदू बनविणार : धर्मेद्र प्रधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 17:32 IST

शहरातील आणि शेतीतील टाकाऊ वस्तूपासून बायोगॅस बनविण्याची प्रक्रिया शहरात सुरु

ठळक मुद्देशहरातील पहिल्या एमएनजीएल भवन या कार्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन ३७० तर केलेच, त्यासोबतच विकासही मोठ्या प्रमाणात केला...भारतात स्वच्छ इंधन पोहोचविणे आणि गॅस आधारीत अर्थकारणासाठी प्रयत्न

पुणे :  आपल्या देशाला आवश्यकतेच्या ७५ ते ८० टक्के गॅस आणि तेल आयात करावे लागते. हे आपल्या देशात देखील तयार होऊ शकते आणि पुणे याचा केंद्रबिंदू बनत आहे. आधुनिक भारतात ऊर्जेला नव्या माध्यमातून पोहोचविण्याची जबाबदारी पुण्याने घेतली आहे. शहरातील आणि शेतीतील टाकाऊ वस्तूपासून बायोगॅस बनविण्याची प्रक्रिया शहरात सुरु आहे. यातून स्थानिक अर्थव्यवस्था सुधारेल आणि शहर देखील स्वच्छ आणि सुंदर होईल. असे मत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले.      महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्यावतीने निर्माण करण्यात येणाऱ्या शहरातील पहिल्या एमएनजीएल भवन या कार्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन बालेवाडीतील साई चौक येथे करण्यात आले होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. सीएनजी स्टेशन वास्तूचे देखील भूमीपूजन यावेळी झाले. खासदार गिरीष बापट, अमर साबळे, आमदार चंद्रकांत पाटील, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, दिलीप वेडेपाटील, ज्योती कळमकर, एकनाथ पवार, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र नाटेकर, व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर, स्वतंत्र संचालक राजेश पांडे, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यावेळी उपस्थित होते.     प्रधान म्हणाले, भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात स्वच्छ इंधन पोहोचविणे आणि गॅस आधारीत अर्थकारणासाठी प्रयत्न केले जात आहेत. याला अनुसरुनच आज एमएनजीएल काम करीत आहे. देशातील क्रमांक ३ ची कंपनी हा नावलौकीक एमएनजीएलने त्यांच्या व्यवस्थापन आणि ग्राहक सेवा यामाध्यमातून मिळविला आहे. सीएनजीला मोबाईल डिस्पेन्सरनेच विक्री करण्याची योजना देखील एमएनजीएलने राबवावी. एमएनजीएल केवळ व्यावसायिक अनुष्ठान नाही तर, राज्यात, देशात सामाजिक आणि हरित  परिर्वतनाचे द्योतक बनेल असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला. ...................................................................................................   ३७० तर केलेच, त्यासोबतच विकासही मोठ्या प्रमाणात केला... चंद्रकांत पाटील म्हणाले, पेट्रोलियम मंत्रालयाने ५ वर्षात सामान्य माणसाचा विचार करुन जास्तीत जास्त  योजना राबविल्या. ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात चुलीसमोर स्वयंपाक करतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या प्रयत्नातून  ग्रामीण भागातील चूलीची जागा गॅसने घेतली आहे. मागील ५ वर्षात आमच्या सरकारने केवळ ३७० चे राजकारण केले असे म्हणतात, परंतु ३७० तर केलेच, त्यासोबतच विकासही मोठ्या प्रमाणात केला आहे असे पाटील यांनी सांगीतले...................................................................................................

टॅग्स :Puneपुणे