शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अखेर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 06:12 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुस्तावलेल्या परीक्षा विभागाने अखेर गुरुवारी तातडीने कार्यवाही करून परीक्षेला उपस्थित असतानाही गैरहजर दाखविण्यात आलेल्या एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल करून दिला.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुस्तावलेल्या परीक्षा विभागाने अखेर गुरुवारी तातडीने कार्यवाही करून परीक्षेला उपस्थित असतानाही गैरहजर दाखविण्यात आलेल्या एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल करून दिला. त्याचबरोबर खेड शिवापूरच्या स्कूल आॅफ आर्किटेक्चर मधील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत बदल करून देण्याची कार्यवाही रात्री उशिरपर्यंत सुरू होती.मुंबई विद्यापीठाकडून पेपर तपासणीमध्ये झालेला गोंधळ गाजत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचा नाकर्तेपणा उजेडात आला होता. स्कूल आॅफ आर्किटेक्चर कॉलेजचे १४० व एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ११ विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित असतानाही गैरहजर दाखवून नापास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता. गंभीर बाब म्हणजे, ते विद्यार्थी परीक्षा विभागात गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविण्यात आले होते. यापार्श्वभूमीवर गुरूवारी परीक्षा विभागाचा हा हलगर्जीपणाचे वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला खडबडून जाग आली.परीक्षा विभागाच्या एकूणच कार्य पद्धतीबाबत विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कुलगुरू नितीन करमळकर यांनी याप्रकरणामध्ये लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थी संघटनांकडूनही याप्रकराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. परीक्षा विभागाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले होते. एमआयटीच्या काही विद्यार्थ्यांना एमबीएला प्रवेश घ्यायचा होता, तर काही विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे कंपन्यांमध्ये निवड, पण परीक्षा विभागाच्या चुकीमुळे त्यांची संधी हिरावली जाण्याचा धोका निर्माण झाला होता.परीक्षा विभागाच्या अधिकाºयांकडून विद्यार्थ्यांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक ही अत्यंत गंभीर बाब आहे, याप्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी राष्टÑवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे व उपाध्यक्ष संतोष डोख आदी पदाधिकाºयांनी केली आहे.महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने परीक्षा विभागाकडून होणाºया गैरप्रकारांवर बोट ठेवले आहे. परीक्षा विभाग हा सातत्याने गैरकारामुळे चर्चेत येत आहे . कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यातआली आहे.