शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बसपेक्षा परवडते दुचाकी, वाहतूककोंडी, ब्रेकडाऊनमुळे मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:35 IST

बसचा तिकीट दर अन् तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीला लागणारे पेट्रोल, वाहतूककोंडीत अडकणाऱ्या बस, ब्रेकडाऊन तसेच बसेसच्या अनियमिततेमुळे कोलमडणारे वेळेचे गणित अशा विविध कारणांमुळे बसपेक्षा स्वत:ची दुचाकीच परवडत असल्याची भावना सर्वसामान्य पुणेकरांची होऊ लागली आहे.

- राजानंद मोरेपुणे - बसचा तिकीट दर अन् तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीला लागणारे पेट्रोल, वाहतूककोंडीत अडकणाऱ्या बस, ब्रेकडाऊनतसेच बसेसच्या अनियमिततेमुळे कोलमडणारे वेळेचे गणित अशा विविध कारणांमुळे बसपेक्षा स्वत:ची दुचाकीच परवडत असल्याची भावना सर्वसामान्य पुणेकरांची होऊ लागली आहे. पण दुचाकींचे प्रमाण वाढणे शहराला परवडणारे नाही. त्यासाठी पीएमपीचे बस व पासचे तिकीट दर कमी करून अधिकाधिक प्रवासी आकर्षित करणे आवश्यक आहे.पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासह परिसरातील विविध भागांमध्ये ‘पीएमपी’कडून बससेवा पुरविली जाते सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’ने दररोज सरासरी ९ ते १० लाख प्रवासी प्रवास करतात. पण मागील काही वर्षांपासून ‘पीएमपी’ खिळखिळी झाल्याने अनेक प्रवासी या सेवेपासून दुर गेले. त्यांनी स्वत:च्या दुचाकीचा पर्याय निवडला आहे. पीएमपीचा तिकीट दर, ब्रेकडाऊनचे प्रमाण, बसेसची अनियमितता व त्यामुळे फुकट जाणारा वेळ या बाबींचा विचार केल्यास अनेकांना दुचाकी सोयीची वाटते.पीएमपीचे सध्याचे तिकीट दर आणि तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीसाठी येणारा खर्च यामध्ये फारसे अंतर नाही. पीएमपीचा १६ किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी २५ रुपये तिकीट दर आहे. तर सध्याच्या पेट्रोलच्या दराचा विचार केल्यास जवळपास तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीला जवळपास तितकाच खर्च येतो. दुचाकीने तेवढ्याच कर्चात दोघे जण जाऊ शकतात. किलोमीटर वाढत गेल्यानंतर तिकीट दर काही प्रमाणात कमी होत जातो. सध्या ३६ किलोमीटर प्रवासासाठी ४० रुपये, ४८ किलोमीटर प्रवासासाठी ५० रुपये तर ६० किलोमीटर प्रवासासाठी ६० रुपये तिकीट दर आहे. यावरून असे दिसते की जवळच्या अंतरासाठीचे तिकीट दर लांब पल्यापेक्षा कमी आहेत. हेच दर जवळपास दुचाकीच्या पेट्रोल खर्चाएवढेच आहेत. त्यात पुन्हा घर ते बसथांबा हे अंतर तसेच इच्छित ठिकाण आणि बसथांब्याचे अंतर या मुद्दाही महत्वाचा आहे. बस प्रवासासाठी लागणारा वेळ आणि दुचाकीवरील लागणारा वेळ यात खुप तफावत असते. या सर्व बाबी सामान्य पुणेकरांच्या दृष्टीने दुचाकी वापरण्यासाठी कारणीभुत ठरतात. त्यामुळे कमी अंतरावरील प्रवासासाठी खर्च आणि वेळेचा ताळमेळ दुचाकीला पुरक असल्याचे दिसते.सुसूत्रीकरणामुळे तिकीट दरामध्ये बदल1 डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या सुसूत्रीकरणामुळे तिकीट दरामध्ये बदल झाले. तेव्हा आजपर्यंत पाचच्या पटीत तिकीट दर आहेत. त्यापूर्वी प्रत्येक टप्प्यानुसार १ ते ९ च्या पटीत होते. त्यामुळे सुट्टया पैशांची अडचण होत होती. हे टाळण्यासाठी तिकीट दर पाचच्या पटीत केल्याने काही टप्प्यांच्या दरात २ ते ३ रुपयांची वाढ तर काही टप्प्यांच्या दरात तेवढीच घट झाली.2प्रामुख्याने कमी अंतराचे दर वाढल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली होती. यापूर्वी २०१२ मध्ये तिकीट दर वाढले होते. त्यानंतर आजपर्यंत दरवाढ झालेली नाही.3या तुलनेत डिझेलचे दर सातत्याने वाढत गेले आहेत. असे असले तरी पीएमपीकडून सध्या दरवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही.वाढत जाणारी खासगी वाहने शहराच्यादृष्टीने परवडणारे नाही. शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी ‘पीएमपी’ सक्षम करणे आवश्यक आहे. अधिकाधिक प्रवासी बसकडे आकर्षित व्हायला हवे. त्यासाठी तिकीट व पासचे दर कमी करायला हवेत. शहरात जवळच्या अंतरासाठी केवळ पाच रुपये तिकीट, पासचे दर अत्यंत कमी करणे, त्यासाठी आकर्षण योजना करता येतील. पीएमपीच्या सध्याच्या स्थितीमुळेदुचाकी वापरावी असे अनेकांना वाटते. हे चित्र बदलायला हवे.- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीnewsबातम्या