शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

बसपेक्षा परवडते दुचाकी, वाहतूककोंडी, ब्रेकडाऊनमुळे मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:35 IST

बसचा तिकीट दर अन् तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीला लागणारे पेट्रोल, वाहतूककोंडीत अडकणाऱ्या बस, ब्रेकडाऊन तसेच बसेसच्या अनियमिततेमुळे कोलमडणारे वेळेचे गणित अशा विविध कारणांमुळे बसपेक्षा स्वत:ची दुचाकीच परवडत असल्याची भावना सर्वसामान्य पुणेकरांची होऊ लागली आहे.

- राजानंद मोरेपुणे - बसचा तिकीट दर अन् तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीला लागणारे पेट्रोल, वाहतूककोंडीत अडकणाऱ्या बस, ब्रेकडाऊनतसेच बसेसच्या अनियमिततेमुळे कोलमडणारे वेळेचे गणित अशा विविध कारणांमुळे बसपेक्षा स्वत:ची दुचाकीच परवडत असल्याची भावना सर्वसामान्य पुणेकरांची होऊ लागली आहे. पण दुचाकींचे प्रमाण वाढणे शहराला परवडणारे नाही. त्यासाठी पीएमपीचे बस व पासचे तिकीट दर कमी करून अधिकाधिक प्रवासी आकर्षित करणे आवश्यक आहे.पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासह परिसरातील विविध भागांमध्ये ‘पीएमपी’कडून बससेवा पुरविली जाते सार्वजनिक वाहतुक व्यवस्था असलेल्या ‘पीएमपी’ने दररोज सरासरी ९ ते १० लाख प्रवासी प्रवास करतात. पण मागील काही वर्षांपासून ‘पीएमपी’ खिळखिळी झाल्याने अनेक प्रवासी या सेवेपासून दुर गेले. त्यांनी स्वत:च्या दुचाकीचा पर्याय निवडला आहे. पीएमपीचा तिकीट दर, ब्रेकडाऊनचे प्रमाण, बसेसची अनियमितता व त्यामुळे फुकट जाणारा वेळ या बाबींचा विचार केल्यास अनेकांना दुचाकी सोयीची वाटते.पीएमपीचे सध्याचे तिकीट दर आणि तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीसाठी येणारा खर्च यामध्ये फारसे अंतर नाही. पीएमपीचा १६ किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी २५ रुपये तिकीट दर आहे. तर सध्याच्या पेट्रोलच्या दराचा विचार केल्यास जवळपास तेवढ्याच अंतरासाठी दुचाकीला जवळपास तितकाच खर्च येतो. दुचाकीने तेवढ्याच कर्चात दोघे जण जाऊ शकतात. किलोमीटर वाढत गेल्यानंतर तिकीट दर काही प्रमाणात कमी होत जातो. सध्या ३६ किलोमीटर प्रवासासाठी ४० रुपये, ४८ किलोमीटर प्रवासासाठी ५० रुपये तर ६० किलोमीटर प्रवासासाठी ६० रुपये तिकीट दर आहे. यावरून असे दिसते की जवळच्या अंतरासाठीचे तिकीट दर लांब पल्यापेक्षा कमी आहेत. हेच दर जवळपास दुचाकीच्या पेट्रोल खर्चाएवढेच आहेत. त्यात पुन्हा घर ते बसथांबा हे अंतर तसेच इच्छित ठिकाण आणि बसथांब्याचे अंतर या मुद्दाही महत्वाचा आहे. बस प्रवासासाठी लागणारा वेळ आणि दुचाकीवरील लागणारा वेळ यात खुप तफावत असते. या सर्व बाबी सामान्य पुणेकरांच्या दृष्टीने दुचाकी वापरण्यासाठी कारणीभुत ठरतात. त्यामुळे कमी अंतरावरील प्रवासासाठी खर्च आणि वेळेचा ताळमेळ दुचाकीला पुरक असल्याचे दिसते.सुसूत्रीकरणामुळे तिकीट दरामध्ये बदल1 डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या सुसूत्रीकरणामुळे तिकीट दरामध्ये बदल झाले. तेव्हा आजपर्यंत पाचच्या पटीत तिकीट दर आहेत. त्यापूर्वी प्रत्येक टप्प्यानुसार १ ते ९ च्या पटीत होते. त्यामुळे सुट्टया पैशांची अडचण होत होती. हे टाळण्यासाठी तिकीट दर पाचच्या पटीत केल्याने काही टप्प्यांच्या दरात २ ते ३ रुपयांची वाढ तर काही टप्प्यांच्या दरात तेवढीच घट झाली.2प्रामुख्याने कमी अंतराचे दर वाढल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली होती. यापूर्वी २०१२ मध्ये तिकीट दर वाढले होते. त्यानंतर आजपर्यंत दरवाढ झालेली नाही.3या तुलनेत डिझेलचे दर सातत्याने वाढत गेले आहेत. असे असले तरी पीएमपीकडून सध्या दरवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही.वाढत जाणारी खासगी वाहने शहराच्यादृष्टीने परवडणारे नाही. शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी ‘पीएमपी’ सक्षम करणे आवश्यक आहे. अधिकाधिक प्रवासी बसकडे आकर्षित व्हायला हवे. त्यासाठी तिकीट व पासचे दर कमी करायला हवेत. शहरात जवळच्या अंतरासाठी केवळ पाच रुपये तिकीट, पासचे दर अत्यंत कमी करणे, त्यासाठी आकर्षण योजना करता येतील. पीएमपीच्या सध्याच्या स्थितीमुळेदुचाकी वापरावी असे अनेकांना वाटते. हे चित्र बदलायला हवे.- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीnewsबातम्या