शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पुणे-सोलापूर महामार्ग : टोलवसुली पट्ट्यात दिशादर्शकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 02:33 IST

पुणे-सोलापूर महामार्गाच्या टोलवसुली पट्ट्यात सुविधांबाबत कमालीची दुरवस्था असतानाही टोलवसुली कंपनीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.

उरुळी कांचन - पुणे-सोलापूर महामार्गाच्या टोलवसुली पट्ट्यात सुविधांबाबत कमालीची दुरवस्था असतानाही टोलवसुली कंपनीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.रस्ता दुभाजक उंची कमी झाली आहे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे नाहीत, दिशादर्शक फलक सुस्थितीत नाहीत, अंतराचे फलक काही ठिकाणी नाहीत तर काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे, गावांच्या नावांचे फलक योग्य त्या मोठ्या आकाराचे व नेमक्या ठिकाणी नाहीत, सर्व्हिस रस्ते वाहतुकीसाठी नाहीतच त्यावर सगळीकडे अतिक्रमण झाले आहे. ते दूर करून उपयोगात आणणे, मुख्य रस्ता व सर्व्हिस रस्ता यामध्ये असणाऱ्या अनेक ठिकाणच्या लोखंडी जाळ्या तुटल्यात किंवा चोरून नेल्या आहेत.त्या परत बसविणे यांसारख्या जबाबदाºया टाळणे, धोक्याच्या किंवा अपघातप्रवण क्षेत्रात काही अतिरिक्त सूचनाफलक किंवा हायमास्ट दिवे लावणे, तसेच वेगनियंत्रण करण्यासाठी लालरंगाच्या दिव्यांची व्यवस्था, अशा व अनेक सोयीसुविधा पुरवणे हे या कंपनीने करणे निविदा-शर्तींनुुसार अपेक्षित असताना याकडे या कंपनीने तब्बल१४ वर्षे झाली पूर्णपणे डोळेझाक केलेली आहे.फक्त टोलवसुली हेच आपले काम, अशा पद्धतीने त्यांचे काम जोरात सुरू आहे. कंपनीच्या टोलवसुलीची मुदत फक्त दोन वर्षे बाकी असताना ते आता काय लक्ष घालणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. काही ठिकाणी साईटपट्ट्या ९ इंच ते फुटभर पडलेल्या तर काही ठिकाणी साईटपट्ट्या फुटभर उंच झाल्या आहेत.अपघातप्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालवा, असा फलक व धोक्याची सूचना देणारा लाल सिग्नल बसविणे गरजेचे आहे. कोणताही अधिकारी याबाबत कर्तव्य तत्परता दाखवीत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. संबंधितानी त्वरित लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.शासन व सदरची खासगी कंपनी यांच्यामधील करारानुसार टोलवसुलीपासून ते टोलवसुली संपेपर्यंतच्या कालावधीत या रस्त्याची संपूर्ण देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची आहे.सुविधांपासून वंचित : टोल वसुलीत धन्यताकंपनीने रस्त्याचा संपूर्ण पृष्ठभाग (डांबरीकरणाचा) समपातळीत राखणे, सेवा रस्ता सुस्थितीत ठेवणे व त्यावर अतिक्रमण होऊ न देणे, मुख्य रस्त्याच्या साईडपट्ट्या वापरायोग्य ठेवणे व त्यांची निगा राखणे, गरजेच्या ठिकाणी संरक्षक कठडे लावणे आणि त्याची निगा राखणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारणे, रस्ता दुभाजाकावरील प्रकाश नियंत्रक सुस्थितीत ठेवणे, महामागार्पासून प्रत्येक गावांचा जोडरस्त्याच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी नियंत्रक दिवे बसविणे, चौकाच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या प्रकाशझोताच्या दिव्यांची सोय करणे व गरजेच्यावेळी दुरुस्ती करणे, दिशादर्शक फलक, अंतराचे फलक, गावांच्या नावांचे फलक व रहदारीसाठी राष्ट्रीय महामार्ग व परिवहन खात्याच्या नियमावली आणि निर्देशानुसार लावले पाहिजेत, असे फलक लावणे व त्यांची निगा ठेवणे हे जनतेच्या सोयीसाठी त्यांना मिळणाºया पैशांतून पुरविण्याची महत्वाची जबाबदारी या कंपनीवर असतानाही सदर कंपनी आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता फक्त टोलवसुली करण्यातच धन्यता मानत आहे. जनतेला अनेक सुविधांपासून वंचित ठेवत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गPuneपुणेSolapurसोलापूर