शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पुणे-सोलापूर महामार्ग : टोलवसुली पट्ट्यात दिशादर्शकांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 02:33 IST

पुणे-सोलापूर महामार्गाच्या टोलवसुली पट्ट्यात सुविधांबाबत कमालीची दुरवस्था असतानाही टोलवसुली कंपनीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.

उरुळी कांचन - पुणे-सोलापूर महामार्गाच्या टोलवसुली पट्ट्यात सुविधांबाबत कमालीची दुरवस्था असतानाही टोलवसुली कंपनीचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.रस्ता दुभाजक उंची कमी झाली आहे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे नाहीत, दिशादर्शक फलक सुस्थितीत नाहीत, अंतराचे फलक काही ठिकाणी नाहीत तर काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे, गावांच्या नावांचे फलक योग्य त्या मोठ्या आकाराचे व नेमक्या ठिकाणी नाहीत, सर्व्हिस रस्ते वाहतुकीसाठी नाहीतच त्यावर सगळीकडे अतिक्रमण झाले आहे. ते दूर करून उपयोगात आणणे, मुख्य रस्ता व सर्व्हिस रस्ता यामध्ये असणाऱ्या अनेक ठिकाणच्या लोखंडी जाळ्या तुटल्यात किंवा चोरून नेल्या आहेत.त्या परत बसविणे यांसारख्या जबाबदाºया टाळणे, धोक्याच्या किंवा अपघातप्रवण क्षेत्रात काही अतिरिक्त सूचनाफलक किंवा हायमास्ट दिवे लावणे, तसेच वेगनियंत्रण करण्यासाठी लालरंगाच्या दिव्यांची व्यवस्था, अशा व अनेक सोयीसुविधा पुरवणे हे या कंपनीने करणे निविदा-शर्तींनुुसार अपेक्षित असताना याकडे या कंपनीने तब्बल१४ वर्षे झाली पूर्णपणे डोळेझाक केलेली आहे.फक्त टोलवसुली हेच आपले काम, अशा पद्धतीने त्यांचे काम जोरात सुरू आहे. कंपनीच्या टोलवसुलीची मुदत फक्त दोन वर्षे बाकी असताना ते आता काय लक्ष घालणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. काही ठिकाणी साईटपट्ट्या ९ इंच ते फुटभर पडलेल्या तर काही ठिकाणी साईटपट्ट्या फुटभर उंच झाल्या आहेत.अपघातप्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालवा, असा फलक व धोक्याची सूचना देणारा लाल सिग्नल बसविणे गरजेचे आहे. कोणताही अधिकारी याबाबत कर्तव्य तत्परता दाखवीत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. संबंधितानी त्वरित लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.शासन व सदरची खासगी कंपनी यांच्यामधील करारानुसार टोलवसुलीपासून ते टोलवसुली संपेपर्यंतच्या कालावधीत या रस्त्याची संपूर्ण देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी कंपनीची आहे.सुविधांपासून वंचित : टोल वसुलीत धन्यताकंपनीने रस्त्याचा संपूर्ण पृष्ठभाग (डांबरीकरणाचा) समपातळीत राखणे, सेवा रस्ता सुस्थितीत ठेवणे व त्यावर अतिक्रमण होऊ न देणे, मुख्य रस्त्याच्या साईडपट्ट्या वापरायोग्य ठेवणे व त्यांची निगा राखणे, गरजेच्या ठिकाणी संरक्षक कठडे लावणे आणि त्याची निगा राखणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारणे, रस्ता दुभाजाकावरील प्रकाश नियंत्रक सुस्थितीत ठेवणे, महामागार्पासून प्रत्येक गावांचा जोडरस्त्याच्या ठिकाणी होणारे अपघात टाळण्यासाठी नियंत्रक दिवे बसविणे, चौकाच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या प्रकाशझोताच्या दिव्यांची सोय करणे व गरजेच्यावेळी दुरुस्ती करणे, दिशादर्शक फलक, अंतराचे फलक, गावांच्या नावांचे फलक व रहदारीसाठी राष्ट्रीय महामार्ग व परिवहन खात्याच्या नियमावली आणि निर्देशानुसार लावले पाहिजेत, असे फलक लावणे व त्यांची निगा ठेवणे हे जनतेच्या सोयीसाठी त्यांना मिळणाºया पैशांतून पुरविण्याची महत्वाची जबाबदारी या कंपनीवर असतानाही सदर कंपनी आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता फक्त टोलवसुली करण्यातच धन्यता मानत आहे. जनतेला अनेक सुविधांपासून वंचित ठेवत आहे.

टॅग्स :highwayमहामार्गPuneपुणेSolapurसोलापूर