शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

राज्यात अल्पभूधारकांची जमीन आक्रसली; जमीनदार मात्र आणखी गब्बर

By नितीन चौधरी | Updated: March 12, 2025 14:57 IST

कृषी गणनेतून धक्कादायक वास्तव आले समोर; राज्यात सध्या १ कोटी ६८ लाख ९८ हजार ६७८ शेतकरी

पुणे : राज्यात सध्या कृषी गणना सुरू असून, पहिल्या टप्प्यातील अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. २०१०-११च्या तुलनेत वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली असून, एकूण जमीन धारणा क्षेत्रातही दहा टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी सरासरी जमीन धारणा क्षेत्रात मात्र घट झाली आहे. दुसरीकडे मोठ्या अर्थात ९ ते २० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या तब्बल १० टक्क्यांनी घटली आहे.

राज्यात दर पाच वर्षांनी कृषी गणना करण्यात येते. त्यानुसार २०२१-२२ मध्ये कृषी गणना प्रस्तावित होती. मात्र, कोरोनामुळे ती होऊ शकली नव्हती. त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये राज्यात कृषी गणना केली जात आहे. या गणनेचा पहिला टप्पा अर्थात शेतकरी संख्या व त्यांच्याकडील जमीन क्षेत्र मोजण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सध्या १ कोटी ६८ लाख ९८ हजार ६७८ शेतकरी असून, त्यांच्याकडे एकूण दोन कोटी ४ लाख ९६ हजार ६२३ हेक्टर जमीन आहे, तर २०१०-११च्या तुलनेत वैयक्तिक शेतकऱ्यांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर जमिनीच्या क्षेत्रात १० टक्के वाढ झाली आहे.

सहमालकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख ८६ हजार ८६० इतकी असून, यात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ७४ टक्क्यांची घट दिसून येत आहे. त्यांच्याकडील जमिनीचे क्षेत्र सध्या ४ लाख २६ हजार ८८० हेक्टर असून, यातही ६० टक्क्यांची घट दिसून येत आहे. अर्थात कुटुंबाकडील जमिनीचे क्षेत्र घटत असून, वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात २०१०-११ मध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांकडे सरासरी जमीन १.४४ हेक्टर होती. त्यात २०२१-२२ मध्ये घट होऊन ते आता १.२१ हेक्टर इतकी झाली आहे. अर्थात वैयक्तिक शेतकऱ्यांकडील सरासरी जमिनीत घट होत असून, एकत्रित कुटुंब पद्धतीचा त्याग केल्यामुळेच वैयक्तिक शेतकऱ्यांच्या संख्येत तसेच त्यांच्या एकूण क्षेत्रात वाढ दिसून येत आहे.

राज्यात ९ ते २० हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ५८ हजार ८९१ असून, त्यांच्याकडील जमिनीचे एकूण क्षेत्र १२ लाख ३६ हजार ६५५ हेक्टर इतके आहे, तर २०१०-११च्या तुलनेत अशा शेतकऱ्यांची संख्या घटली असली तरी त्यांच्याकडील एकूण जमिनीच्या क्षेत्रात मात्र १४ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. यात २०१०-११च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ८९ने कमी झाली असून, त्यांच्याकडे क्षेत्रात मात्र, एकूण १ लाख ५२ हजार २२६ हेक्टरने वाढ झाली आहे. २०१०-११ मध्ये या शेतकऱ्यांकडे सरासरी १५.९६ हेक्टर जमीन होती. मात्र, २०१२-२२ मध्ये यात वाढ होऊन सरासरी क्षेत्र २०.९९ हेक्टर इतके झाले आहे.

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सरासरी जमीन धारणा क्षेत्रात घट झाली आहे. परिणामी कुटुंबाच्या गरजेइतके उत्पन्न मिळत नसल्याने खेडी ओस पडताहेत व शहरांमधील स्थलांतर वाढले आहे. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी, पुणे 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र