शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अल्पभूधारकांची जमीन आक्रसली; जमीनदार मात्र आणखी गब्बर

By नितीन चौधरी | Updated: March 12, 2025 14:57 IST

कृषी गणनेतून धक्कादायक वास्तव आले समोर; राज्यात सध्या १ कोटी ६८ लाख ९८ हजार ६७८ शेतकरी

पुणे : राज्यात सध्या कृषी गणना सुरू असून, पहिल्या टप्प्यातील अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. २०१०-११च्या तुलनेत वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली असून, एकूण जमीन धारणा क्षेत्रातही दहा टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी सरासरी जमीन धारणा क्षेत्रात मात्र घट झाली आहे. दुसरीकडे मोठ्या अर्थात ९ ते २० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या तब्बल १० टक्क्यांनी घटली आहे.

राज्यात दर पाच वर्षांनी कृषी गणना करण्यात येते. त्यानुसार २०२१-२२ मध्ये कृषी गणना प्रस्तावित होती. मात्र, कोरोनामुळे ती होऊ शकली नव्हती. त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये राज्यात कृषी गणना केली जात आहे. या गणनेचा पहिला टप्पा अर्थात शेतकरी संख्या व त्यांच्याकडील जमीन क्षेत्र मोजण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सध्या १ कोटी ६८ लाख ९८ हजार ६७८ शेतकरी असून, त्यांच्याकडे एकूण दोन कोटी ४ लाख ९६ हजार ६२३ हेक्टर जमीन आहे, तर २०१०-११च्या तुलनेत वैयक्तिक शेतकऱ्यांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर जमिनीच्या क्षेत्रात १० टक्के वाढ झाली आहे.

सहमालकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख ८६ हजार ८६० इतकी असून, यात गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ७४ टक्क्यांची घट दिसून येत आहे. त्यांच्याकडील जमिनीचे क्षेत्र सध्या ४ लाख २६ हजार ८८० हेक्टर असून, यातही ६० टक्क्यांची घट दिसून येत आहे. अर्थात कुटुंबाकडील जमिनीचे क्षेत्र घटत असून, वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात २०१०-११ मध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांकडे सरासरी जमीन १.४४ हेक्टर होती. त्यात २०२१-२२ मध्ये घट होऊन ते आता १.२१ हेक्टर इतकी झाली आहे. अर्थात वैयक्तिक शेतकऱ्यांकडील सरासरी जमिनीत घट होत असून, एकत्रित कुटुंब पद्धतीचा त्याग केल्यामुळेच वैयक्तिक शेतकऱ्यांच्या संख्येत तसेच त्यांच्या एकूण क्षेत्रात वाढ दिसून येत आहे.

राज्यात ९ ते २० हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ५८ हजार ८९१ असून, त्यांच्याकडील जमिनीचे एकूण क्षेत्र १२ लाख ३६ हजार ६५५ हेक्टर इतके आहे, तर २०१०-११च्या तुलनेत अशा शेतकऱ्यांची संख्या घटली असली तरी त्यांच्याकडील एकूण जमिनीच्या क्षेत्रात मात्र १४ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. यात २०१०-११च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ८९ने कमी झाली असून, त्यांच्याकडे क्षेत्रात मात्र, एकूण १ लाख ५२ हजार २२६ हेक्टरने वाढ झाली आहे. २०१०-११ मध्ये या शेतकऱ्यांकडे सरासरी १५.९६ हेक्टर जमीन होती. मात्र, २०१२-२२ मध्ये यात वाढ होऊन सरासरी क्षेत्र २०.९९ हेक्टर इतके झाले आहे.

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वैयक्तिक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच सरासरी जमीन धारणा क्षेत्रात घट झाली आहे. परिणामी कुटुंबाच्या गरजेइतके उत्पन्न मिळत नसल्याने खेडी ओस पडताहेत व शहरांमधील स्थलांतर वाढले आहे. - विनयकुमार आवटे, संचालक, कृषी, पुणे 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र