शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

पावसामुळे पुणेकरांची दाणादाण; सर्वत्र वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:19 IST

मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुकीचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे दिवसभर पहायला मिळत होते.

पुणे - शहर व परिसरात गुरुवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ आणि दाणादाण उडाली. शहराच्या विविध भागात पाणी शिरल्याच्या जवळपास ९० तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आल्या. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतुकीचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडी झाल्याचे दिवसभर पहायला मिळत होते.

शहर व परिसरात गुरुवारी पहाटेपासून जोरदार पाऊस पडला. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाळी गटारे आणि महापालिकेने पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेल्या ड्रेनेज लाइनमध्ये कचरा अडकल्याने रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दिवसभरात विविध भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याच्या ९० तक्रारी आल्या. तक्रारी आल्यानंतर महापालिकेच्या विविध पथकांनी १० ते २५ मिनिटांमध्ये आवश्यक उपाययोजना केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, रस्त्यावर साठलेले पाणी काढून घेण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सकाळपासूनच कामाला लागले होते. रस्त्यावर साठलेले पाणी तसेच इतर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके नेमण्यात आली आहेत. याबरोबर पथ विभाग, मलनिस्सारण विभागातील कर्मचारी देखील रस्त्यावर उतरून काम करत होते. पाणी साठलेल्या रस्त्यावरील चेंबरचे झाकण उघडून पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून दिली जात होती. अनेक भागात पाण्याचा निचरा कमी वेळेत करण्यास महापालिकेला यश आल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली, असा दावा महापालिकेकडून केला जात आहे.

या भागात साचले पाणी

- धायरी भागातील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. नऱ्हे, आंबेगाव, सिंहगड रस्ता, नवले पूल ते वारजे भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

- बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून जाणारे चेंबर तुंबल्याने पाणी वाहून जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ड्रेनेजचे झाकण उघडून कचरा काढल्यानंतर पाणी वाहून गेले.

- पर्वतीकडून नीलायम चित्रपटगृहाजवळील पूल उतरून खाली आल्यानंतर डाव्या बाजूला असलेले झाड पडले. झाडाच्या फांद्या, कचरा चेंबरवर पडल्याने पाणी वाहून जाताना अडचण निर्माण झाली होती.

- आठवले चौक ते प्रभात रस्ता कॅनॉल रस्त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराकडे जाणाऱ्या गल्लीच्या परिसरातील रस्त्यावर पाणी साचले होते.

- स्वारगेट चौक आणि हडपसरमधील सिद्धेश्वर हॉटेलसमोर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला.

- शहराच्या उपनगरांसह मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या सदाशिव, नारायण, शनिवार पेठेसह शिवाजीमहाराज रस्ता आणि इतर रस्त्यांवरही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

एकतानगरीसाठी स्वतंत्र पथक

मागील वर्षी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील नदीकाठाजवळ असलेल्या एकतानगरी सोसायटीत पाणी घुसले होते. यंदाच्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर त्याचा फटका एकतानगरीला बसू नये,यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. आपतकालीन स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र पथक येथे तैनात करण्यात आले आहे, असे उपायुक्त संदीप खलाटे यांनी सांगितले.

शहरात गुरुवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला धरणातून काही प्रमाणात पाणी सोडण्यास सुुरुवात झाली आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागात जाऊन आवाहन करत आहेत. नदीकाठच्या नागरिकांनाही धोक्याचा इशारा दिला जात आहे. आतापर्यंत खडकवासला जवळच्या १२ ते १५ घरे वगळता इतर कोठेही पाणी शिरलेले नाही.  - गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड