शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला;नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:49 IST

९० टक्के भरलेले डिंभे धरण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. धरणात सतत येत असलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाच गेटद्वारे, तसेच कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे

घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डिंभे धरणात दहा हजार क्युसेकने पाणी येत आहे, तर धरणाच्या पाच गेटद्वारे पाच हजार क्युसेकने पाणी घोड नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे घोड नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा कुकडी पाटबंधारे विभागाने दिला आहे.दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ओढ्या-नाल्यांना व नद्यांना पूर आले आहेत. ९० टक्के भरलेले डिंभे धरण ९५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. धरणात सतत येत असलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाच गेटद्वारे, तसेच कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे घोड नदीला पूर आला आहे.कुकडी पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या असलेल्या मोटारी शेतकऱ्यांनी हलवाव्यात, असेही सांगितले आहे. तसेच पश्चिम घाटाच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या वाड्यांवर त्यांना सतर्क राहण्याचे आव्हान महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. धोकादायक गावांवर विशेष लक्ष प्रशासनाने ठेवले असून स्थानिक सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस