शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
2
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
4
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
5
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
6
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
7
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
8
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
9
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
10
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
11
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
12
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
13
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
14
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
15
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
16
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
17
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
18
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
19
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...

पुणेकरांनो ही बँक २२ सप्टेंबरपासून कायमची बंद होतेय; आरबीआयचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 13:39 IST

गेल्या काही काळापासून आरबीआयने अनेक बँकांवर कारवाई केली आहे. ज्या ज्या बँकांनी नियम पाळलेले नाहीत किंवा वारेमाप कर्जे वाटली आहेत, त्यांच्यावर बंधने आणली होती.

देशातील एका बड्या शहरात वाढलेली आणि विस्तारलेली बँक २२ सप्टेंबरपासून कायमची बंद होणार आहे. नियम पाळले नाहीत म्हणून आरबीआयने ही कारवाई केली आहे. या बँकेचे लायसन रद्द करण्यात आले आहे. या तारखेनंतर कोणीही या बँकेतून पैसे काढू शकणार नाहीय. 

गेल्या काही काळापासून आरबीआयने अनेक बँकांवर कारवाई केली आहे. ज्या ज्या बँकांनी नियम पाळलेले नाहीत किंवा वारेमाप कर्जे वाटली आहेत, त्यांच्यावर बंधने आणली होती. त्यातूनही मार्ग न निघाल्याने आरबीआयने अनेक बँका बंद केल्या आहेत. पुण्याच्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेविरोधात देखील अशीच कारवाई करण्यात आली आहे. 

रिझव्‍‌र्ह बँकेने 10 ऑगस्ट रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. पुण्याच्या रुपी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना या सूचनेच्या सहा आठवड्यांनी रद्द केला जाणार असल्याचे त्यात म्हटले होते. यानंतर बँकेच्या सर्व शाखादेखील बंद केल्या जातील असेही म्हटले होते. अंतिम मुदत 22 सप्टेंबर 2022 रोजी संपणार आहे. या बँकेवर निर्बंध असल्याने ग्राहक आधीच पैसे काढू शकले नव्हते. यामुळे या ग्राहकांना पुढच्या सरकारी प्रक्रियेवर अवलंबून रहावे लागणार आहे. केचे ७ लाखांपेक्षा जास्त ठेवीदार असून त्यांचे मिळून काहीशे कोटी रूपये बँकेत अडकले आहेत.बँकेची बिकट आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आणि आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे पुण्यातील सहकारी बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेकडे कोणतेही भांडवल शिल्लक नाही. त्यांच्याकडे कमाईचे कोणतेही साधन उरले नाही. अशा परिस्थितीत आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्यांचे पैसे अडकलेत त्यांचे काय होणार?नव्या नियमानुसार ज्या ग्राहकांचे पैसे बुडालेल्या बँकांत अडकले आहेत त्यांना ५ लाखांपर्यंत पैसे परत केले जातात. बँकेत पैसे जमा केलेल्या ग्राहकांना 5 लाखांच्या ठेवींवर विमा संरक्षण दिले जाते. हा विमा ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे प्रदान केला जातो. DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी आहे, जी सहकारी बँकांच्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते. ग्राहकांना 5 लाख रुपयांच्या ठेवीवर विमा दाव्याअंतर्गत पैसे परत मिळतील. परंतु ज्या ग्राहकांनी पाच लाखांहून अधिक रुपये बँकेत जमा केले आहेत त्यांना पूर्ण रक्कम परत मिळणार नाही. त्यांना जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत भरपाईही दिली जाईल.

किती पैसे अडकलेतबँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर आरबीआयने बँकेवर प्रशासक मंडळ नियुक्त केले होते. सध्या सुधीर पंडित हे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष आहेत. बँकेचे ७ लाखांपेक्षा अधिक ठेवीदार आहेत. त्यांची मिळून १३०० कोटी रूपयांची रक्कम बँकेत अडकली आहे. त्यापैकी ६४ हजार जणांना ठेवीदार विमा सुरक्षा महामंडळाने कमाल ५ लाख रूपये व किमान त्यापेक्षा कमी ठेव असेल त्यांना मिळून ७०० कोटी रूपये दिले आहेत. रूपये ५ लाखांपेक्षा जास्त ठेव असलेल्या असंख्य ठेवीदारांचे अजूनही बँकेत ६०० कोटी रूपये अडकून पडले आहेत.

टॅग्स :Rupee Bankरुपी बँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक