शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचा " पुणे पॅटर्न " राज्यात राबविणार : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:15 IST

कार्बन न्यूट्रल शहर बनविणार

ठळक मुद्देशहरात इलेक्ट्रीक आणि जैव इंधनावरील बसची संख्या वाढविण्यात येईलसौर ऊर्जेचा वापर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत केली जाईलकोणत्याही शहराचा शाश्वत विकास करायचा झाल्यास पर्यावरण हानी होणार नाही याची दक्षता

पुणे : पुण्यामधे ओला-सुका कचरा वेगळा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून, कापडी पिशव्या वापरण्यांची पुणेकरांची सवय आहे. त्या शिवाय घनकचरा व्यवस्थापनही चांगले सुरु आहे. शहरात इलेक्ट्रीक आणि जैव इंधनावरील बसची संख्या वाढविण्यात येईल. त्यामाध्यमातून ''कार्बन न्यूट्रल शहर '' म्हणून ' पुणे पॅटर्न ' राज्यभर प्रस्थापित करणार असल्याची माहिती पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिली. पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे शहराला २०३० पर्यंत कार्बन न्यूट्रल शहर बनविण्याच्या विषयावर ठाकरे यांनी ज्येष्ठ अर्थ शास्त्रज्ञ विजय केळकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याशी संवाद साधला. प्रा. अमिताव मलिक यांनी ‘मेकींग पुणे मेट्रोपोलिटन रिजन कार्बन न्यूट्रल बाय-२०३०’ या विषयावर सादरीकरण केले. पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरीटीचे (पीएमआरडीए) आयुक्त विक्रम कुमार या वेळी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, पुणेकर हे पर्यावरण प्रेमी आहेत. त्यांना सायकल चालविण्याची देखील सवय आहे. तसेच, बांबूचे टूथ ब्रश आणि कापडी पिशव्या वापरातही ते आघाडीवर आहेत. ओला-सुका कचरा वेगळा केला जातो. त्यामुळे पुणेकर २०३० नव्हे तर २०२५ पर्यंतच शहराला कार्बन न्यूट्रल करतील. त्यासाठी शहरामधे इलेक्ट्रीक बस आणि जैव इंधनावरील बस चालविण्यात येईल. सौर ऊर्जेचा वापर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत केली जाईल. या कामी पुणे राज्याला दिशा दाखवू शकते.  याशिवाय २०२०, २०२५ साल आणि २०३० साला पर्यंत काय करायचे याचा आढावा वेळोवेळी घेतला जाईल. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच, पर्यटनाच्या दृष्टीने देखील काय करता येईल. जगभरातील प्रवासी येथे कसे आकृष्ट होतील, हे पाहिले जाईल. प्रत्येक महिन्यामधे या कामाचा आढावा घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.     --नदीकाठचा विकास अभ्यासानंतर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट (नदीकाठ विकास) प्रस्तावाचा विचार अभ्यासानंतर करण्यात येईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. कोणत्याही शहराचा शाश्वत विकास करायचा झाल्यास पर्यावरण हानी होणार नाही याची दक्षता घेऊन करायला हवा. त्याचा विचार करुनच रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रस्ताव राबविण्यात येईल, अशी माहिती वन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.  

 

टॅग्स :PuneपुणेAaditya Thackerayआदित्य ठाकरेenvironmentपर्यावरणState Governmentराज्य सरकार