शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Pune: सत्यशोधक समितीला राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचा विरोध, समितीमध्ये नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्याची मागणी 

By श्रीकिशन काळे | Updated: February 6, 2024 12:05 IST

Pune: सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रमध्ये झालेल्या 'जब वी मेट' या नाटकामधील गोंधळाप्रकरणी जी सत्यशोधक समिती स्थापन केली आहे, त्या समितीला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विरोध करीत आहे.

- श्रीकिशन काळे पुणे :  सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रमध्ये झालेल्या 'जब वी मेट' या नाटकामधील गोंधळाप्रकरणी जी सत्यशोधक समिती स्थापन केली आहे, त्या समितीला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विरोध करीत आहे. कारण या कमिटी मध्ये जे जे  सदस्य म्हणून घेतले आहेत, ते एका ठराविक विचार धारेचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केला आहे. पाटील म्हणाले, स्थापन केलेली समिती पाहिल्यानंतर लागणारा निकाल हा फक्त एका बाजूने लागू शकतो, किंवा एकच बाजू समोर येऊ शकते असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे तत्काळ या समितीमध्ये सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे, लेखक दिग्दर्शक अतुल पेठे, लेखक दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, राजन गवस, रंगनाथ पठारे यांच्यापैकी कोणत्याही दोन व्यक्तींचा समावेश किंवा तिघांचा समावेश यामध्ये करावा,  अशी आम्ही राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी करीत आहोत.कारण हल्ला करणारे हे निराळे राहिले आणि ज्यांना मारहाण झाली त्यांच्यांवरच गुन्हे दाखल झाले. आता विद्यापीठाने जी समिती चौकशी करणार आहे, त्यात देखील एकाच विचारधारेशी जोडलेले लोकं आहेत. त्यांनी एकतर्फी निर्णय घेऊ शकतील, म्हणून या समितीमध्ये नाटक्षेत्रातील योग्य व्यक्तींना समाविष्ट करावे, अशी आमची मागणी आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे