शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

‘ज्याचा रस्ता त्याचाच पूल, देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्याच विभागाची’ जिल्हा प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:35 IST

पुलाच्या मालकीवरून जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागात तू तू मै मै होत अखेर दोन्ही विभागांनी जबाबदारी झटकली होती.

पुणे : कुंडमळा येथील दुर्घटनेच्या चौकशी समितीच्या अहवालानंतर रस्त्यांच्या मालकीनुसारच पुलांची मालकी असेल, असा धोरणात्मक निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यात रस्ता बांधणारा विभाग कोणताही असला तरी देखभाल दुरुस्ती संबंधित रस्ता ज्याच्या मालकीचा त्यालाच करावी लागणार आहे. त्यामुळे या पुढे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आपापल्या हद्दीतील रस्त्यांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे प्रकार बंद होऊन ती निश्तिच करता येणार आहे.

कुंडमळा येथील दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, तर ३८ जण जखमी झाले होते. यानंतर पुलाच्या मालकीवरून जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागात तू तू मै मै होत अखेर दोन्ही विभागांनी जबाबदारी झटकली होती. त्यामुळे कोणत्या विभागावर कारवाई करावी, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती नेमली होती. या घटनेत नेमकी चूक कोणाची? पूल कोणाच्या मालकीचा? याचा अभ्यास करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले होते.

या समितीचा अहवाल सोमवारी राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यात धक्कादायक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. या पुलाची मालकी कोणा एका विभागाकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच जिल्हा परिषद आणि सार्वजनिक विभागाचीही यात तांत्रिकदृष्ट्या चूक नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळेच डुडी यांनी यापुढे अशा स्वरूपाच्या घटनांनंतर पुलांच्या मालकीविषयी एक सुस्पष्ट धोरण असावे, असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे एखादा पूल बांधल्यानंतर ज्या हद्दीत तो बांधला आहे, त्या हद्दीतील रस्ता ज्या विभागाच्या मालकीचा आहे, तो पूलही त्याच विभागाच्या मालकीचा असणार आहे. बहुतांश वेळा पूल बांधण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेतो.

राष्ट्रीय महामार्गांशेजारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पूल बांधून देत असते. त्यामुळे असे पूल ज्या हद्दीत असतील, उदाहणार्थ जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या हद्दीत असल्यास, त्याची मालकी जिल्हा परिषदेकडे असेल. त्यामुळे या पुलांची देखभालीची जबाबदारीही याच विभागाची असेल असे निश्चित केले आहे. हे पूल धोकादायक स्थितीत असल्याच्या त्यांच्या दुरुस्तीची तसेच ते पाडण्याची आवश्यकता असल्यास ते त्यांनीच पाडावेत, असेही यात ठरविण्यात आले आहे.

कुंडमळा दुर्घटनेनंतर जबाबदारी झटकण्याचा प्रकार समोर आला. आता या धोरणात्मक निर्णयानंतर प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित केली आहे. अशी घटना घडल्यास त्याच विभागाला याबाबत जबाबदार धरण्यात येईल. अशीच स्थिती अन्य जिल्ह्यांतही असण्याची शक्यता आहे. हे धोरण राज्य स्तरावर राबविता येणे शक्य आहे.  - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड