शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

‘ज्याचा रस्ता त्याचाच पूल, देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्याच विभागाची’ जिल्हा प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:35 IST

पुलाच्या मालकीवरून जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागात तू तू मै मै होत अखेर दोन्ही विभागांनी जबाबदारी झटकली होती.

पुणे : कुंडमळा येथील दुर्घटनेच्या चौकशी समितीच्या अहवालानंतर रस्त्यांच्या मालकीनुसारच पुलांची मालकी असेल, असा धोरणात्मक निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यात रस्ता बांधणारा विभाग कोणताही असला तरी देखभाल दुरुस्ती संबंधित रस्ता ज्याच्या मालकीचा त्यालाच करावी लागणार आहे. त्यामुळे या पुढे जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आपापल्या हद्दीतील रस्त्यांची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे प्रकार बंद होऊन ती निश्तिच करता येणार आहे.

कुंडमळा येथील दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, तर ३८ जण जखमी झाले होते. यानंतर पुलाच्या मालकीवरून जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागात तू तू मै मै होत अखेर दोन्ही विभागांनी जबाबदारी झटकली होती. त्यामुळे कोणत्या विभागावर कारवाई करावी, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती नेमली होती. या घटनेत नेमकी चूक कोणाची? पूल कोणाच्या मालकीचा? याचा अभ्यास करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले होते.

या समितीचा अहवाल सोमवारी राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यात धक्कादायक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. या पुलाची मालकी कोणा एका विभागाकडे नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तसेच जिल्हा परिषद आणि सार्वजनिक विभागाचीही यात तांत्रिकदृष्ट्या चूक नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळेच डुडी यांनी यापुढे अशा स्वरूपाच्या घटनांनंतर पुलांच्या मालकीविषयी एक सुस्पष्ट धोरण असावे, असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे एखादा पूल बांधल्यानंतर ज्या हद्दीत तो बांधला आहे, त्या हद्दीतील रस्ता ज्या विभागाच्या मालकीचा आहे, तो पूलही त्याच विभागाच्या मालकीचा असणार आहे. बहुतांश वेळा पूल बांधण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग घेतो.

राष्ट्रीय महामार्गांशेजारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पूल बांधून देत असते. त्यामुळे असे पूल ज्या हद्दीत असतील, उदाहणार्थ जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या हद्दीत असल्यास, त्याची मालकी जिल्हा परिषदेकडे असेल. त्यामुळे या पुलांची देखभालीची जबाबदारीही याच विभागाची असेल असे निश्चित केले आहे. हे पूल धोकादायक स्थितीत असल्याच्या त्यांच्या दुरुस्तीची तसेच ते पाडण्याची आवश्यकता असल्यास ते त्यांनीच पाडावेत, असेही यात ठरविण्यात आले आहे.

कुंडमळा दुर्घटनेनंतर जबाबदारी झटकण्याचा प्रकार समोर आला. आता या धोरणात्मक निर्णयानंतर प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित केली आहे. अशी घटना घडल्यास त्याच विभागाला याबाबत जबाबदार धरण्यात येईल. अशीच स्थिती अन्य जिल्ह्यांतही असण्याची शक्यता आहे. हे धोरण राज्य स्तरावर राबविता येणे शक्य आहे.  - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड