शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज तलावातील तीस हजार घनमीटर गाळ गेला कुठे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 19:12 IST

प्रत्यक्षात पाहायला गेले तर कात्रज उद्यानातील असलेल्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी व गाळाचे साम्राज्य आहे.

कात्रज : दक्षिण पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात २९ एकरमध्ये असणाऱ्या तलावात सांडपाणी मिसळत असून, यामुळे लेक टाऊन व परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर आरोग्याला धोका निर्माण झाला असून, येथील नागरिक यामुळे आजारी पडत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

प्रत्यक्षात पाहायला गेले तर कात्रज उद्यानातील असलेल्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी व गाळाचे साम्राज्य आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी महानगरपालिकेकडून एनडीएमए प्रकल्पांतर्गत जलसंपदा विभागाला गाळ काढण्याची नियोजन देण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीदेखील ठरवण्यात आला. जलसंपदा विभागाकडून एप्रिल महिन्यामध्ये तीस हजार घनमीटर गाळ काढण्यात आला, असे सांगण्यात आले. एक लाख घनमीटरपैकी ३० हजार घनमीटर गाळ काढून तो तलावाच्या बाजूला टाकण्यात आला.

पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे काम थांबवण्यात आले. परंतु, अस्तित्त्वात पाहायला गेले तर सध्या या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी व गाळाचे साम्राज्य असल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून लेकटाऊन व आजूबाजूच्या सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास होत असून, यावरती कायमस्वरूपी तोडगा काढला तरच हा प्रश्न मिटेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या तलावात कात्रज व आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात मैलापाणी प्रक्रिया न होता येते. त्यामुळे ही समस्या उद्भवत असून, यावर तोडगा काढून गाळ पूर्णपणे काढून बाहेर टाकला, तरच हा प्रश्न मिटू शकतो, असे लेक टाऊनमधील नागरिकांचे म्हणणे आहे. गाळ काढण्यात आला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात हा गाळ नेमका गेला कुठे? तसेच यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

कात्रज तलावाची निर्मिती पेशव्यांनी पुण्याची तहान भागवण्यासाठी केली होती. सद्यपरिस्थितीत तलाव पाण्याचा तलाव नसून मैलापाणी साठवण असलेला तलाव झाला आहे. तीस हजार घनमीटर गाळ काढल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. परंतु, वास्तविक गाळ काढून तो तलावाच्या अजूबाजूलाच साठवण्यात आला. तो गाळ पावसाळ्यात परत पाण्यासोबत तलवातच आला. हा गाळ नसून पाण्यात येणारा मैलाच आहे. हेच मुख्य कारण आहे की ड्रेनेजने येणारे मैला पाणी बंद करून संपूर्ण तलाव एकदा मोकळा केला पाहिजे, तरच दुर्गंधी कमी होईल.  - लेकटाउन जागृत नागरिक संघ

English
हिंदी सारांश
Web Title : Katraj Lake Silt Removal: Where Did 30,000 Cubic Meters Go?

Web Summary : Katraj Lake faces sewage issues, causing foul odors and health concerns for residents. Despite silt removal claims, the lake remains heavily polluted, prompting questions about corruption and ineffectiveness. Citizens demand a permanent solution.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे