शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

गावाचे पुनर्वसन कधी होणार ? मृत्यूच्या दाढेत वसलेल्या काळवाडी गावाचे पुनर्वसन रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:00 IST

काळवाडी गाव भीमाशंकर खोऱ्यात वसलेले असून, गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर मोठमोठाले दगड कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाण्याच्या दाबामुळे गावाच्या जमिनीत मोठी भेग पडली आहे.

तळेघर : आंबेगाव तालुक्यातील काळवाडी नंबर १ आणि नंबर २ (जांभोरी) ही गावे मृत्यूच्या छायेत वसली आहेत. गावाच्या वरच्या बाजूला राक्षसी रौद्ररूप धारण करणारा भयानक डोंगर, तर खालच्या बाजूला डिंभे धरणाचे विशाल पाणलोट क्षेत्र आणि गावाच्या मध्यभागी काही वर्षांपूर्वी पडलेली मोठी भेग यामुळे ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या गावांचे तातडीने पुनर्वसन व्हावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

काळवाडी गाव भीमाशंकर खोऱ्यात वसलेले असून, गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगरावर मोठमोठाले दगड कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाण्याच्या दाबामुळे गावाच्या जमिनीत मोठी भेग पडली आहे. गेल्या आठ-नऊ दिवसांपासून मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. डोंगराचे पाणी झिरपून घरांच्या भिंतींना ओल येत असून, दोन-तीन दिवसांत घरे कोसळण्याची भीती आहे. गावातील घरांमध्ये पाण्याचे उबड निघत असून, डोंगरावरील दगड खाली येत आहेत.

माळीण आणि इर्शाळवाडी यांसारख्या धोकादायक गावांप्रमाणेच काळवाडी गावाचे पुनर्वसन २०१४ पासून रखडले आहे. स्थानिकांनी वारंवार प्रशासनाला याबाबत कळवूनही ठोस उपाययोजना झालेली नाही. “आमच्यावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? सरकारला आदिवासींची कधी कदर होणार?” असा सवाल ग्रामस्थ कोंडिबा पारधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.

पुनर्वसनासाठी प्रयत्नतात्पुरत्या उपाययोजनेसाठी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला असून, यातून काळवाडी नंबर १ आणि बेंढारवाडी या गावांनी जमीन खरेदी केली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे प्रांत अधिकाऱ्यांनी पाठवलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला. काळवाडी नंबर १ साठी संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे, तर काळवाडी नंबर २ ची जागा खरेदी झाली आहे. मात्र, काही अडचणींमुळे पुनर्वसनाचा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. ग्रामस्थांचे म्हणणे

“रात्री डोळा लागत नाही. घरातून पाण्याचे उबड निघतात, वरचे दगड कधी खाली येतील याचा नेम नाही. सरकार लवकर आम्हाला सुरक्षित ठिकाणी हलवावे, नाहीतर आमची अवस्था माळीणसारखी होईल,” अशी भीती कोंडिबा पारधी यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी यांनी सांगितले की, “काळवाडी नंबर १ आणि बेंढारवाडी यांनी जमीन खरेदी केली असली, तरी पुनर्वसन रखडले आहे.” 

तातडीने पुनर्वसनाची गरज३० जुलै येताच ग्रामस्थांच्या अंगावर शहारे येतात. पावसाळ्यात रात्री झोप लागत नाही, अशी स्थिती आहे. चिमाजी पारधी, कावजी पारधी, सोमा लोहकर, नामदेव भोकटे, सुरेश भवारी, बबन पारधी, चंद्रकांत पारधी यांनी प्रशासनाला तत्काळ पुनर्वसनाची मागणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड