शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

सण आले की जिभेची मजा सुरू,अन्न सुरक्षा विभागाला जाग येणार कधी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 16:07 IST

- आठ दिवसांवर श्रावण महिना : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांच्या तपासणीचा प्रश्न ऐरणीवर

- भरत निगडे

नीरा : आठ दिवसांनी श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात पोळा, जन्माष्टमी, त्यानंतर गणेशोत्सव, महालक्ष्मी, दसरा, दिवाळी अशा एकापाठोपाठ सणाचा हंगाम सुरू होतो. यादरम्यान शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत ठिकठिकाणी फास्टफूडचे स्टॉल उभे करण्यात येतात, तसेच स्वीट मार्टच्या दुकानांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडते.

नेमका याचा गैरफायदा घेत अनेक व्यावसायिक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून अन्नसुरक्षा नियमांची पायमल्ली करतात. किमान या काळात तरी अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे. खाद्यपदार्थाचे नमुने संकलन आणि कारवाई याकडे प्रशासन फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे यावर्षी तरी प्रशासन जागे होऊन कारवाई करील का? असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून दुकान तपासणी होत नसल्याने काही विक्रेते कमी दर्जा, भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

खाद्यपदार्थांना मोठी मागणीश्रावण महिन्यात उपवास व पौष्टिक खाण्यावर नागरिक भर देतात. फराळात गरमागरम साबुदाणा वडा, हलवा, खीर, खव्याचे पदार्थ, बटाटा व केळीचे वेफर्स, मिठाई, फरसाण, ड्रायफ्रूट, बेकरी उत्पादने यांची मागणी झपाट्याने वाढते, तसेच फराळासाठीचे स्टॉल्स, मिठाईच्या दुकानांमधील तयार खाद्यपदार्थ खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. फूड सेफ्टी ॲक्ट काय?

२००६ मधील अन्नसुरक्षा आणि मानक कायद्यानुसार, खाद्यपदार्थ विक्रेते, उत्पादक, रेस्टॉरंट, मिठाई विक्रेत्यांनी परवाना घेणे बंधनकारक आहे. यासोबतच अशा विक्रेत्यांना स्वच्छता, शिजवण्याची पद्धत, साठवणूक, तापमान नियंत्रण, लेबलिंग, तसेच महत्त्वाचे म्हणजे खाद्यपदार्थ खाण्यासाठीची अंतिम तारीख पॅकिंगवर स्पष्ट दिसेल, असे नमूद केले पाहिजे. विषबाधेचा व संसर्गजन्य आजाराचा धोकाअनेक हॉटेल, रेस्टॉरंट, तसेच मिठाईच्या दुकानांतून दूषित तेल, दूषित पाणी, पॅकिंग न केलेली मिठाई, सरबत, वडे, भजी असे मुदतबाह्य अन्नपदार्थ खाल्ल्यास टायफॉइड, कॉलरा, फूड पॉयझनिंग, अतिसार, उलट्या यासारखे आजार होऊ शकतात. खीर, बर्फी, पनीर, समोसे यामधून संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते. तपासणीची स्थिती काय?तालुक्यात अन्न व औषधी प्रशासनाकडून वर्षातून एखाद्यावेळी कुठल्या तरी आस्थापनेची तपासणी केली जाते. पुरेशा मनुष्यबळाअभावी व स्वतंत्र तपासणी यंत्रणा नसल्यामुळे फक्त निवडक नमुन्यांची तपासणी होते. सणासुदीच्या काळामध्ये नियोजनबद्ध मोहीम राबविणे गरजेचे असताना संबंधित विभाग नियमित तपासणी करण्यात अपयशी ठरत आहे. जिल्ह्यात मोठी कारवाई कधी?...

पुणे शहर व जिल्ह्याचे कार्यक्षेत्र शंभर किलोमीटरच्या परिघातील आहे. ग्रामीण भाग हा शहरापासून लांब असल्याकारणाने जिल्ह्याच्या ठिकाणाहून तालुक्यात भेट देऊन कारवाई करणे शक्य नसल्याने आतापर्यंत तरी मोठ्या प्रमाणात कुठेही कारवाई झालेली नाही.

"सणासुदीच्या काळात हॉटेल, मिठाई दुकाने, धाबे आदी ठिकाणांची तपासणी करण्यात येणार आहे. हवाबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी माहिती नीट वाचूनच खाद्यपदार्थ खरेदी करावे. मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळल्यास खरेदी करू नये. विनापरवाना, भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल." - बा. म. ठाकूर : सहायक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड