शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय घेऊ;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:35 IST

- ही वेळ राजकारण करण्याची नसून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची

पुणे : “राज्यातील अतिवृष्टीचे संकट मोठे आहे. त्याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आपण बांधावर जाऊन पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये योग्य निर्णय घेऊ. ही वेळ राजकारण करण्याची नसून, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

पुण्यात शनिवारी एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “मराठवाडा, विदर्भ, तसेच उत्तर महाराष्ट्रात या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्री व मी केली आहे. त्यानुसार हे संकट मोठे आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम सरकार करेल. माता-भगिनींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम सरकार करेल. याबाबत सरकार गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय नक्की घेऊ. त्यासाठी अटी, शर्ती शिथिल कराव्या लागतील. काही बाजूलाही ठेवाव्या लागतील.”

केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीबाबत गृहमंत्री अमित शहा यांना सांगितले आहे. केंद्राने मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्याची आहे. यात सरकार हात आखडता घेणार नाही. केंद्रही मदत करेल, असेही ते यावेळी म्हणाले.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंचनामे आणि मदतकार्य सुरळीत राहावे, यासाठी मंत्र्यांनी दौरे करू नयेत, असा सल्ला दिला होता. त्यावर शिंदे यांनी लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना बांधावर गेल्याशिवाय तेथील परिस्थिती कळणार नाही. घरात बसून परिस्थिती कळत नाही. त्यासाठी बांधावर गेल्यावर लोकांचे अश्रू, व्यथा दिसतात. त्यानंतर नुकसान किती आहे, ते ठरविता येते. त्यामुळे या परिस्थितीत राजकारण न आणता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे, असा टोला पवार यांना लगावला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तुटपुंजी असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिंदे यांनी ही मदत तत्काळ मदत आहे. त्यात घरांच्या दुरुस्तीसाठी, पशुधनासाठी, तसेच शेतीच्या नुकसानीसाठी पंचनामे करण्यात येत आहेत. जमीन खरवडून गेली आहे, त्यासाठी मदत केली जाणार आहे. जीवितहानीसाठीही मदत केली जाईल. हे संकट मोठे असून, त्यावर मंत्रिमंडळात योग्य निर्णय घेऊ. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे देऊ, अशी सरकारची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पीकविम्याचे निकष वगळल्याने शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, याबाबत ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल त्या माध्यमाचा सरकार अवलंब करेल, असेही त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Cabinet to Decide on Farmer Aid: Deputy Chief Minister Eknath Shinde

Web Summary : Deputy Chief Minister Eknath Shinde assured farmers of government support following crop damage due to heavy rains. He criticized those suggesting officials shouldn't visit affected areas and promised pre-Diwali aid, hinting at relaxed norms for maximum benefit.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEknath Shindeएकनाथ शिंदे