शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘वी वाँट, कॅरी ऑन’चा नारा;शासनाने मागितली दाेन दिवसांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 10:42 IST

विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान रोखण्यासाठी ‘पुन्हा परीक्षा घ्या, तसेच कॅरी ऑन द्या’ अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह ‘एनएसयूआय’च्या वतीने साेमवारी (दि. १४) तीव्र आंदाेलन करण्यात आले.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठांतर्गत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक-दोन विषयांत नापास झाल्यामुळे ‘इअर डाऊन’चा फटका बसत आहे. त्यांचे संपूर्ण वर्षच वाया जात आहे. यात विद्यार्थ्यांचे हाेणारे नुकसान रोखण्यासाठी ‘पुन्हा परीक्षा घ्या, तसेच कॅरी ऑन द्या’ अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह ‘एनएसयूआय’च्या वतीने साेमवारी (दि. १४) तीव्र आंदाेलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील गेटवर चढून आत प्रवेश करत कुलगुरू कार्यालयासमाेर आंदोलन केले. याप्रसंगी ‘वी वाँट, कॅरी ऑन’च्या घाेषणा देण्यात आल्या.

अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि परीक्षेतील बदलांमुळे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आम्हाला 'कॅरी ऑन'ची सवलत मिळाली नाही, तर आमचे एक वर्ष वाया जाईल. एका विषयांत अनुत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी असून, त्यांचे पूर्ण वर्षच वाया जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी करायचे काय? विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती विद्यापीठाला करत आहाेत, असे आंदाेलक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 

प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्ते गेटवर चढले आणि थेट विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर पाेहाेचले. पोलिसांनी हस्तक्षेप करत ‘एनएसयूआय’चे प्रतिनिधी व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी कुलगुरूंशी थेट भेट घडवून दिली. विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दाेन दिवसांची मुदत मागितली आहे. वेळेत निर्णय झाला नाही तर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा एनएसयूआय आणि विद्यार्थी काँग्रेसतर्फे देण्यात आला. या वेळी विद्यार्थी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव अक्षय जैन, एनएसयूआयचे प्रवक्ते अविनाश सोळुंके, विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, आलसी इंजिनिअर चॅनेलचे रोनक खाबे, महेश कांबळे, राज जाधव, तेजस बनसोड, अभिषेक पवार, सचिन भाडख, वैभव महाडिक, अभिषेक जाधव, रोहित निकम, श्रद्धा डोंड, यश जाधव, साहिल चव्हाण आदी उपस्थित होते.या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या

- निकालातील अनियमितता, चुकीचे ग्रेस मार्क्स, फोटोकॉपी व रिव्हॅल्युएशन प्रक्रियेतील त्रुटी तत्काळ दूर करा. निकालाच्या वेबसाइटवर वारंवार बदल हाेत असून त्यात सातत्य ठेवा.- अमरावती विद्यापीठाने 'कॅरी ऑन' चा निर्णय घेतला आहे, मग पुणे विद्यापीठ का घेऊ शकत नाही? यावर तत्काळ निर्णय घ्या किंवा पुनर्परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता घ्या.

'कॅरी ऑन' म्हणजे काय?एखादा विद्यार्थी मागील वर्षाच्या काही विषयांमध्ये नापास झाला असले तर, त्याला पुढील वर्षात प्रवेश देऊन त्या विषयांची परीक्षा नंतर देण्याची सवलत देणे म्हणजे ‘कॅरी ऑन’चा निर्णय हाेय. ही सवलत विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात दिली जात होती, मात्र आता ती बंद केली आहे. यामुळे विद्यार्थी एका वर्षात अनुत्तीर्ण झाला तरी त्याला पुढील वर्षात प्रवेश मिळणार नाही आणि यात त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे.आंदाेलक विद्यार्थी म्हणतात...

- आम्ही पेपर लिहून देखील अपेक्षित मार्क मिळत नाहीत. आता आंदाेलन केले तर दोन दिवस थांबा म्हणत आहेत. आमचे पूर्ण वर्ष वाया जाईल.- एका विषयात नापास झालाे म्हणून पूर्ण वर्ष वाया घालणे याेग्य नाही. तेव्हा त्या विषयाची फेरपरीक्षा घ्या आणि पूर्ण वर्ष वाया जाण्यापासून वाचवा.

- आठ दिवसांपूर्वीच शांततेच्या मार्गाने आम्ही विद्यापीठात आंदाेलन केले होते. तेव्हाही विद्यापीठाने आम्हाला दोन दिवसांची वेळ मागितली हाेती, सहा दिवस झाले तरी कोणताच निर्णय न झाल्याने आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागले.- विद्यापीठाने ‘कॅरी ऑन’चा निर्णय मान्य केला नाही तर आमचे शिक्षण अर्धवट अर्धवट राहील.

- मी आता तृतीय वर्षात आहे. दुसरे वर्ष उत्तीर्ण झाले असून, माझा प्रथम वर्षाचा एक विषय राहिला आहे. त्यामुळे माझं पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं. ‘कॅरी ऑन’चा निर्णय झाला तर एक संधी भेटेल.

विद्यार्थ्यांना वारंवार रस्त्यावर उतरावं लागतंय, आंदोलनं करावी लागत आहेत. हे त्यांचं काम नाही. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखलं जाणारं विद्यापीठ आपल्याच विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालत असेल, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. - अक्षय जैन, माजी राष्ट्रीय सचिव, विद्यार्थी काँग्रेस    

विद्यार्थ्यांचे वर्ष वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. विद्यापीठ प्रशासनाने वेळेवर निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटेल.  - भूषण रानभरे, माजी जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी कॅरी ऑन किंवा पुरवणी परीक्षेसंदर्भात निवेदने सादर केली आहेत. अशी मागणी केलेले सर्व विद्यार्थी त्या-त्या वर्षात किमान ५० टक्के श्रेयांक प्राप्त करू शकले नाहीत. तरीही विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विचार करून कायदेशीर बाबी पाहून, संबंधित शिखर संस्थांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. - प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ  

विद्यापीठ प्रशासन नेहमीच विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून निर्णय घेत असते. याही अगोदर विशिष्ट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, असे निर्णय घेतले आहेत. तेव्हा कायदेशीर सल्ला घेऊन आणि नियमांच्या अधीन राहून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.- प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीexamपरीक्षा