शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:55 IST

कुलगुरूंकडून विद्यापीठातील वसतिगृह समस्येवर त्वरित तोडगा हवा

पुणे : ‘‘हॅलाे, वसतिगृहाचा प्रश्न आहे. कुलसचिवांना फाेन करा. भाेजनगृहाची समस्या आहे, तरीही कुलसचिवांना फाेन करा. विभागातील प्रश्न आहे, कुलसचिवांनाच फाेन करा...’’ हे अनेकांचे ठरलेले उत्तर. कुलसचिवांचे मात्र ठरलेले... फाेन उचलायचाच नाही. याला माध्यम प्रतिनिधी देखील अपवाद नाहीत. यात भरडला जाताेय विद्यार्थी अन् डागाळली जातेय विद्यापीठाची प्रतिमा. एक तर कुलसचिवांनीच संबंधित विभागप्रमुखांना आदेश दिलेले की, माझ्याशिवाय माध्यमांशी काेणीही बाेलायचे नाही; अन् स्वत:ही बाेलायचे नाही. कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

जागतिक मानांकनात विद्यापीठाचा रँक वाढलेला असला तरी विद्यापीठातील समस्या सोडविण्यात ते कमी पडत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, बहुतांश विभागांमध्ये वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रवेश मिळालेले विद्यार्थी शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून तातडीने विद्यापीठ गाठत आहेत. पण, वसतिगृह प्रवेश रखडल्याने राहायचं कुठे? हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. वसतिगृहात किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला, किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, याची माहिती कोणीही देत नाही.

आम्ही दाद मागायची कुणाकडे?गाव खेड्यातील, अतिशय दुर्गम भागातील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेली मी सामान्य मुलगी. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर येताच अनेक वर्षांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण हाेत असल्याची भावना मनात हाेती. राहायला वसतिगृह मिळणार, या विचाराने मी सर्व साहित्य घेऊन आले हाेते. पण, वसतिगृह काही मिळत नाही अन् बाहेर राहणे परवडत नाही, अशी आमची व्यथा असल्याचे एका मुलीने सांगितले....ही तर लूट

विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाची क्षमता साधारणत: १४०० काॅटची आहे. बहुतांश विभाग सुरू झाल्याने वसतिगृह प्रवेश तातडीने देण्याऐवजी ज्या मुली दिवसाला शंभर रुपये भरून राहू शकतील त्यांनाच राहण्याची व्यवस्था करायची, मग गरीब घरच्या मुलींनी काय करायचं? ग्रामीण आणि दुर्गम भागातून अतिशय कष्टाने पुण्यात आलेल्या मुला-मुलींनी काय करायचं? निवारा मिळेना, म्हणून सावित्रीच्या लेकीने शिक्षण साेडून गावी परत जायचं का? असा सवाल उपस्थित होत आहे.

शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक मुलीला वसतिगृह देण्याचा आमचा प्रयत्न असेल. राहायची साेय झाली नाही म्हणून शिक्षण साेडावे लागेल अशी वेळ कुणावर येणार नाही. फक्त काही प्रक्रिया पार पडण्यासाठी थाेडा वेळ लागत आहे. त्यातही तातडीने दुरुस्ती केली जाईल. - डाॅ. सुरेश गाेसावी, कुलगुरू

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडuniversityविद्यापीठ