शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:55 IST

कुलगुरूंकडून विद्यापीठातील वसतिगृह समस्येवर त्वरित तोडगा हवा

पुणे : ‘‘हॅलाे, वसतिगृहाचा प्रश्न आहे. कुलसचिवांना फाेन करा. भाेजनगृहाची समस्या आहे, तरीही कुलसचिवांना फाेन करा. विभागातील प्रश्न आहे, कुलसचिवांनाच फाेन करा...’’ हे अनेकांचे ठरलेले उत्तर. कुलसचिवांचे मात्र ठरलेले... फाेन उचलायचाच नाही. याला माध्यम प्रतिनिधी देखील अपवाद नाहीत. यात भरडला जाताेय विद्यार्थी अन् डागाळली जातेय विद्यापीठाची प्रतिमा. एक तर कुलसचिवांनीच संबंधित विभागप्रमुखांना आदेश दिलेले की, माझ्याशिवाय माध्यमांशी काेणीही बाेलायचे नाही; अन् स्वत:ही बाेलायचे नाही. कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

जागतिक मानांकनात विद्यापीठाचा रँक वाढलेला असला तरी विद्यापीठातील समस्या सोडविण्यात ते कमी पडत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, बहुतांश विभागांमध्ये वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रवेश मिळालेले विद्यार्थी शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून तातडीने विद्यापीठ गाठत आहेत. पण, वसतिगृह प्रवेश रखडल्याने राहायचं कुठे? हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. वसतिगृहात किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला, किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, याची माहिती कोणीही देत नाही.

आम्ही दाद मागायची कुणाकडे?गाव खेड्यातील, अतिशय दुर्गम भागातील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेली मी सामान्य मुलगी. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर येताच अनेक वर्षांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण हाेत असल्याची भावना मनात हाेती. राहायला वसतिगृह मिळणार, या विचाराने मी सर्व साहित्य घेऊन आले हाेते. पण, वसतिगृह काही मिळत नाही अन् बाहेर राहणे परवडत नाही, अशी आमची व्यथा असल्याचे एका मुलीने सांगितले....ही तर लूट

विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाची क्षमता साधारणत: १४०० काॅटची आहे. बहुतांश विभाग सुरू झाल्याने वसतिगृह प्रवेश तातडीने देण्याऐवजी ज्या मुली दिवसाला शंभर रुपये भरून राहू शकतील त्यांनाच राहण्याची व्यवस्था करायची, मग गरीब घरच्या मुलींनी काय करायचं? ग्रामीण आणि दुर्गम भागातून अतिशय कष्टाने पुण्यात आलेल्या मुला-मुलींनी काय करायचं? निवारा मिळेना, म्हणून सावित्रीच्या लेकीने शिक्षण साेडून गावी परत जायचं का? असा सवाल उपस्थित होत आहे.

शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक मुलीला वसतिगृह देण्याचा आमचा प्रयत्न असेल. राहायची साेय झाली नाही म्हणून शिक्षण साेडावे लागेल अशी वेळ कुणावर येणार नाही. फक्त काही प्रक्रिया पार पडण्यासाठी थाेडा वेळ लागत आहे. त्यातही तातडीने दुरुस्ती केली जाईल. - डाॅ. सुरेश गाेसावी, कुलगुरू

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडuniversityविद्यापीठ