शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:55 IST

कुलगुरूंकडून विद्यापीठातील वसतिगृह समस्येवर त्वरित तोडगा हवा

पुणे : ‘‘हॅलाे, वसतिगृहाचा प्रश्न आहे. कुलसचिवांना फाेन करा. भाेजनगृहाची समस्या आहे, तरीही कुलसचिवांना फाेन करा. विभागातील प्रश्न आहे, कुलसचिवांनाच फाेन करा...’’ हे अनेकांचे ठरलेले उत्तर. कुलसचिवांचे मात्र ठरलेले... फाेन उचलायचाच नाही. याला माध्यम प्रतिनिधी देखील अपवाद नाहीत. यात भरडला जाताेय विद्यार्थी अन् डागाळली जातेय विद्यापीठाची प्रतिमा. एक तर कुलसचिवांनीच संबंधित विभागप्रमुखांना आदेश दिलेले की, माझ्याशिवाय माध्यमांशी काेणीही बाेलायचे नाही; अन् स्वत:ही बाेलायचे नाही. कुलगुरू महाेदय, तुम्हीच सांगा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार कसे अन् विद्यापीठाची प्रतिमा सुधारणार कशी? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

जागतिक मानांकनात विद्यापीठाचा रँक वाढलेला असला तरी विद्यापीठातील समस्या सोडविण्यात ते कमी पडत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, बहुतांश विभागांमध्ये वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रवेश मिळालेले विद्यार्थी शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून तातडीने विद्यापीठ गाठत आहेत. पण, वसतिगृह प्रवेश रखडल्याने राहायचं कुठे? हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. वसतिगृहात किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला, किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, याची माहिती कोणीही देत नाही.

आम्ही दाद मागायची कुणाकडे?गाव खेड्यातील, अतिशय दुर्गम भागातील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेली मी सामान्य मुलगी. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर येताच अनेक वर्षांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण हाेत असल्याची भावना मनात हाेती. राहायला वसतिगृह मिळणार, या विचाराने मी सर्व साहित्य घेऊन आले हाेते. पण, वसतिगृह काही मिळत नाही अन् बाहेर राहणे परवडत नाही, अशी आमची व्यथा असल्याचे एका मुलीने सांगितले....ही तर लूट

विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाची क्षमता साधारणत: १४०० काॅटची आहे. बहुतांश विभाग सुरू झाल्याने वसतिगृह प्रवेश तातडीने देण्याऐवजी ज्या मुली दिवसाला शंभर रुपये भरून राहू शकतील त्यांनाच राहण्याची व्यवस्था करायची, मग गरीब घरच्या मुलींनी काय करायचं? ग्रामीण आणि दुर्गम भागातून अतिशय कष्टाने पुण्यात आलेल्या मुला-मुलींनी काय करायचं? निवारा मिळेना, म्हणून सावित्रीच्या लेकीने शिक्षण साेडून गावी परत जायचं का? असा सवाल उपस्थित होत आहे.

शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेल्या प्रत्येक मुलीला वसतिगृह देण्याचा आमचा प्रयत्न असेल. राहायची साेय झाली नाही म्हणून शिक्षण साेडावे लागेल अशी वेळ कुणावर येणार नाही. फक्त काही प्रक्रिया पार पडण्यासाठी थाेडा वेळ लागत आहे. त्यातही तातडीने दुरुस्ती केली जाईल. - डाॅ. सुरेश गाेसावी, कुलगुरू

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडuniversityविद्यापीठ