शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषीमंत्री कोकाटेंना उपमुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर मंत्रिपद वाटू लागले औटघटकेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:41 IST

आम्ही आज मंत्री, तर उद्या सामान्य नागरिकच; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलून दाखविली मनातील खदखद

पुणे : कृषिमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणारे आणि सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री यांनी समज दिल्यानंतर आता त्यांना मंत्रिपद औटघटकेचे वाटू लागले आहे. मला मंत्रिपदाचे काही वाटत नाही, अशी निरवानिरवीची भाषा कोकाटे यांनी बोलून दाखविली आहे. चार-दोन गोष्टी चुकू शकतात, मी पण सामान्य माणूसच आहे, अशी उपरती कोकाटे यांना आली आहे. यामागे आपला हेतू स्वच्छ होता, अशी सारवासारवही केली आहे. यावरून कोकाटे मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.पुण्यात बुधवारी (दि. ९) कृषी विभागातर्फे आयोजित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. त्यापूर्वी कृषिराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्री काही काळासाठी असतो, मंत्री म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी कायमस्वरूपी नसते, त्यामुळे आम्ही आज मंत्री, तर उद्या सामान्य नागरिक असतो, या वक्तव्यावर कोकाटे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. शेतकरी अनेक वर्षे कर्जाची परतफेड करत नाहीत आणि कर्जमाफीची वाट बघतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास त्यातून ते साखरपुडे आणि लग्न करतात, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कोकाटे चांगलेच अडचणीत आले. त्यावर विरोधी पक्षांनी चांगलीच आगपाखड केली. मंत्रिमंडळातील सहकारी पक्षाचा मंत्री या नात्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची माफीही मागितली. उपमुख्यमंत्री यांनीही पुण्यात पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना तोलूनमापून बोलावे असा सल्लाही दिला. त्यानंतर पवार यांनी कोकाटे यांना प्रत्यक्ष बोलावून चांगलीच समज दिल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांना ही उपरती झाली आहे.आपण काय काम करतो, आपल्याला काय जबाबदारी दिली आहे, हे जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्रिपद औटघटकेचे आहे. मंत्रिपदाचे आपल्याला काही वाटत नाही. मंत्रिपदाबाबत मला फार अपेक्षित नव्हते. आपल्याला काही वेगळे मिळवायचे आहे, असे काही नव्हते, जी जबाबदारी पक्षाने, नेत्याने व समाजाने दिली ती कर्तव्यभावनेने पार पाडायची आहे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रManikrao Kokateमाणिकराव कोकाटे