शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

प्रवाशांची कुचंबणा; दौंड-केडगाव-पुणे रेल्वे मार्गावर असुविधांचा डबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:44 IST

- रेल्वे प्रशासनाची अनास्था; सुविधांचा अभाव, प्रवाशांना एकाच डब्यात कोंबून करावा लागतोय प्रवास, गर्दी, चोरी, छेडछाडीच्या प्रकारात झाली वाढ, तातडीने उपाययोजना करण्याची होतेय मागणी

- बापू नवले

केडगाव : दौंड-केडगाव-पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी रोजचा प्रवास हा एक अवर्णनीय संघर्ष बनला आहे. रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या, डब्यांमध्ये ढवळाढवळ करणारी अनियंत्रित गर्दी आणि प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षामुळे प्रवाशांची परवड थांबत नाही. सकाळी-संध्याकाळच्या वेळात परिस्थिती इतकी बिकट होते की, महिला प्रवाशांसाठी तर प्रसाधनगृहाचा वापरसुद्धा अशक्यप्राय झाला आहे. 'आमची व्यथा ऐकणारं कोणीतरी आहे का?' असा हवालदिल प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.

केडगाव हे पुणे शहरालगतचे एक महत्त्वाचे उपनगर असून, येथून दररोज मोठ्या संख्येने नोकरदार, विद्यार्थी आणि इतर नागरिक पुण्यात कामासाठी आणि शिक्षणासाठी ये-जा करतात; मात्र रेल्वेच्या अपुऱ्या सेवेमुळे हा दैनंदिन प्रवास एक वेदनादायी अनुभव झाला आहे. प्रवाशांना एकाच डब्यात कोंबून प्रवास करावा लागतो. पाय ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे दरवाज्यात लटकून प्रवास करणे ही इतकी सामान्य घटना झाली आहे की ती आता कोणाच्याच लक्षात येत नाही.

या मर्यादित सेवेमुळे निर्माण झालेल्या गर्दीमुळे चोरी, छेडछाड यांसारख्या गुन्ह्यांचा धोका वाढला आहे. अनेक प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू प्रवासादरम्यान चोरीला गेल्याचे प्रकार नोंदवले गेले आहेत. त्याचबरोबर, गाड्या वेळेवर न आल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या कामावर किंवा शाळांमध्ये उशीर होतो. या गंभीर समस्येकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रवाशांनी अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली, तरीही आजवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्टेशनची नवीन इमारत, जुनी जाचक सेवा

यासंदर्भातील विरोधाभास अधिकच तीव्र करणारी घटना म्हणजे नुकतेच केडगाव रेल्वे स्टेशनचे भव्य नूतनीकरण करण्यात आले आहे. लाखो रुपये खर्चून या स्टेशनला राष्ट्रीय पातळीवरील दर्जा देण्यात आला आहे. मात्र, प्रवाशांचे म्हणणे आहे की ज्या प्रवाशांसाठी हे स्टेशन उभारले गेले, त्या प्रवाशांचीच येथे कुचंबणा होत आहे.स्थानिक प्रवासी सागर नेवसे यांनी लोकमतशी बोलताना एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. "सकाळी ८:५५ वाजता बारामती-पुणे डेमो गेल्यानंतर सायंकाळी ५:०० वाजता दौंड-पुणे डेमो गाडी येईपर्यंत, म्हणजे साडेआठ तासांपर्यंत, केडगाव स्टेशनवर पुण्याकडे जाणारी एकही गाडी थांबत नाही. सकाळी नऊनंतर पुण्याला जायचे असलेल्या प्रवाशांसाठी पर्यायच नाही," असे ते म्हणाले. भविष्यातील धोका, तातडीची गरज

केडगाव रेल्वे प्रवासी संघाचे दत्तात्रय टेकवडे यांनी भविष्याचा इशारा दिला आहे. "या समस्येवर तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे, नाहीतर परिस्थिती आणखी गंभीर होईल. या वाहतूक समस्येमुळे कंटाळून अनेक जणांनी नोकऱ्या सोडल्या आहेत, तर काही जण पुण्यात जाण्याऐवजी स्थानिक पातळीवरच व्यवसाय करू लागले आहेत. सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० या कालावधीत किमान एक तरी जलद गाडी केडगावला थांबवणे अत्यावश्यक आहे," असे ते सांगतात.

अशाप्रकारे, रेल्वे प्रशासनाकडे केडगावसारख्या वाढत्या उपनगराच्या प्रवाशांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याने, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर वाढत आहे. प्रवाशांची ओरड ऐकून घेणे आणि सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलणे ही आता रेल्वे प्रशासनाची जबाबदारी राहिली आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड