शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना हवेत हेक्टरी ५० हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 20:05 IST

पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले पुण्यातील ५५ महसूल मंडले तसेच सोलापूर, बीड, भंडारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान

पुणे : पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले. पंजाबमध्ये झालेल्या अतिवृष्टीत तेथील भगवंत मान सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत म्हणून दिले. आता राज्यातील युती सरकारनेही पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत म्हणून द्यावेत अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली.

पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले पुण्यातील ५५ महसूल मंडले तसेच सोलापूर, बीड, भंडारा, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. अनेकांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले. सोयाबीन पाण्याखाली. कापूस पीक अडचणीत आहे. संत्रा, मोसंबी अशा फळबागांमध्ये गळती होऊन त्यांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देणे गरजेचे असतानाही राज्य सरकारकडून त्यावर काहीच हालचाल व्हायला तयार नाही. याच सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, आता ते हवेतच विरले आहे. दुसरीकडे अशाच पूरस्थितीमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारने शेतकऱ्यांना तब्बल ५० हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई जाहीर केलेली आहे. ही मागणी विरोधी पक्षात असताना अनेकजण करतात, परंतु सत्तेवर आल्यावर याची अंमलबजावणी करणारे आपचे सरकार देशातील पहिले सरकार आहे, असा दावा किर्दत यांनी केला.

कर्जमाफीबाबत तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहेच, पण फक्त २ हेक्टर जमिनीवरच्या नुकसान झालेल्या पिकासाठीच मदत मिळेल असा निर्णय घेत त्यांनी आधीच पिडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठच चोळले आहे. ही मदतही कोरडवाहूसाठी ८ हजार ५०० व बागायतीसाठी १८ हजार इतकीच आहे. झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत अत्यल्प आहे. त्यात अमेरिकेतून कापूस आयात करण्यासारखे निर्णय सरकार घेत आहे. आता किमान मदतीबाबत तरी सरकारने हात आखडता घेऊ नये. आपचे कार्यकर्ते राज्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून या मागणीचे निवेदन देणार आहेत, अशी माहिती किर्दत यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजना