शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:47 IST

सध्या पावसाळ्यामुळे भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये जंगलाचा विस्तार वाढला आहे.

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभोरी, पोखरीची बेंढारवाडी आणि राजेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पाळीव जनावरांवरील सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण झाले असून, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे नाराजी वाढत आहे.

सध्या पावसाळ्यामुळे भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये जंगलाचा विस्तार वाढला आहे. यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी योग्य निवारा मिळाला असून, जांभोरी, पोखरी, राजेवाडी, काळेवाडी, घोडेगाव, चिंचोली, पळसटीका, परांडा, धोंडमाळ, तळेघर, नारोडी, कोळवाडी-कोटमदरा, फुलवडे, ढाकाळे, शिंदेवाडी आदी गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जांभोरी येथील शेतकरी सबाजी शेळके यांच्या शेळीवर बिबट्याने दिवसाढवळ्या हल्ला करून ठार केले, तर बेंढारवाडी येथील अंकुश केगले, ठकसेन केगले आणि वामन दांगट यांच्या शेळ्या बिबट्याने पळवल्या. राजेवाडी येथील दत्तात्रय साबळे यांच्या घरासमोर सलग तीन दिवस बिबट्या दिसल्याने परिसरात भीती पसरली आहे.

वन विभागावर नाराजी:

ग्रामस्थांचा आरोप आहे की, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावांऐवजी शहरी भागात राहत असल्याने बिबट्यांना पकडण्यात अपयश येत आहे. हल्ल्यांनंतर कर्मचारी केवळ पंचनामा करतात, मात्र बिबट्यांना पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात यश येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. निसर्गप्रेमींच्या अंदाजानुसार, या भागात सुमारे १५० बिबटे असावेत, तर स्थानिकांचे म्हणणे आहे की ही संख्या यापेक्षाही जास्त आहे. डिंभे ते भीमाशंकर या भागात ऊसशेती नसतानाही बिबट्यांचा वावर वाढत आहे.

ग्रामस्थांची मागणी:

जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदा पारधी, उपसरपंच बबन केंगले, पोलिस पाटील नवनाथ केंगले, मारुती केंगले, सोनाली पोटे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी, रवी भवारी, शिवराम केंगले यांच्यासह ग्रामस्थांनी बिबट्याच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, कैलास काळे, सावता झोडगे, विनायक काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिक व जनावरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

वन विभागाची कारवाई कधी?

बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि नागरी वस्त्यांमधील त्यांच्या मुक्त संचारामुळे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वन विभागाकडून ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्याPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र