शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:47 IST

सध्या पावसाळ्यामुळे भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये जंगलाचा विस्तार वाढला आहे.

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभोरी, पोखरीची बेंढारवाडी आणि राजेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पाळीव जनावरांवरील सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण झाले असून, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे नाराजी वाढत आहे.

सध्या पावसाळ्यामुळे भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये जंगलाचा विस्तार वाढला आहे. यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी योग्य निवारा मिळाला असून, जांभोरी, पोखरी, राजेवाडी, काळेवाडी, घोडेगाव, चिंचोली, पळसटीका, परांडा, धोंडमाळ, तळेघर, नारोडी, कोळवाडी-कोटमदरा, फुलवडे, ढाकाळे, शिंदेवाडी आदी गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जांभोरी येथील शेतकरी सबाजी शेळके यांच्या शेळीवर बिबट्याने दिवसाढवळ्या हल्ला करून ठार केले, तर बेंढारवाडी येथील अंकुश केगले, ठकसेन केगले आणि वामन दांगट यांच्या शेळ्या बिबट्याने पळवल्या. राजेवाडी येथील दत्तात्रय साबळे यांच्या घरासमोर सलग तीन दिवस बिबट्या दिसल्याने परिसरात भीती पसरली आहे.

वन विभागावर नाराजी:

ग्रामस्थांचा आरोप आहे की, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावांऐवजी शहरी भागात राहत असल्याने बिबट्यांना पकडण्यात अपयश येत आहे. हल्ल्यांनंतर कर्मचारी केवळ पंचनामा करतात, मात्र बिबट्यांना पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात यश येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. निसर्गप्रेमींच्या अंदाजानुसार, या भागात सुमारे १५० बिबटे असावेत, तर स्थानिकांचे म्हणणे आहे की ही संख्या यापेक्षाही जास्त आहे. डिंभे ते भीमाशंकर या भागात ऊसशेती नसतानाही बिबट्यांचा वावर वाढत आहे.

ग्रामस्थांची मागणी:

जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदा पारधी, उपसरपंच बबन केंगले, पोलिस पाटील नवनाथ केंगले, मारुती केंगले, सोनाली पोटे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी, रवी भवारी, शिवराम केंगले यांच्यासह ग्रामस्थांनी बिबट्याच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, कैलास काळे, सावता झोडगे, विनायक काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिक व जनावरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

वन विभागाची कारवाई कधी?

बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि नागरी वस्त्यांमधील त्यांच्या मुक्त संचारामुळे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वन विभागाकडून ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्याPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र