शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 19:47 IST

सध्या पावसाळ्यामुळे भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये जंगलाचा विस्तार वाढला आहे.

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभोरी, पोखरीची बेंढारवाडी आणि राजेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पाळीव जनावरांवरील सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण झाले असून, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे नाराजी वाढत आहे.

सध्या पावसाळ्यामुळे भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये जंगलाचा विस्तार वाढला आहे. यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी योग्य निवारा मिळाला असून, जांभोरी, पोखरी, राजेवाडी, काळेवाडी, घोडेगाव, चिंचोली, पळसटीका, परांडा, धोंडमाळ, तळेघर, नारोडी, कोळवाडी-कोटमदरा, फुलवडे, ढाकाळे, शिंदेवाडी आदी गावांमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जांभोरी येथील शेतकरी सबाजी शेळके यांच्या शेळीवर बिबट्याने दिवसाढवळ्या हल्ला करून ठार केले, तर बेंढारवाडी येथील अंकुश केगले, ठकसेन केगले आणि वामन दांगट यांच्या शेळ्या बिबट्याने पळवल्या. राजेवाडी येथील दत्तात्रय साबळे यांच्या घरासमोर सलग तीन दिवस बिबट्या दिसल्याने परिसरात भीती पसरली आहे.

वन विभागावर नाराजी:

ग्रामस्थांचा आरोप आहे की, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावांऐवजी शहरी भागात राहत असल्याने बिबट्यांना पकडण्यात अपयश येत आहे. हल्ल्यांनंतर कर्मचारी केवळ पंचनामा करतात, मात्र बिबट्यांना पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात यश येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे. निसर्गप्रेमींच्या अंदाजानुसार, या भागात सुमारे १५० बिबटे असावेत, तर स्थानिकांचे म्हणणे आहे की ही संख्या यापेक्षाही जास्त आहे. डिंभे ते भीमाशंकर या भागात ऊसशेती नसतानाही बिबट्यांचा वावर वाढत आहे.

ग्रामस्थांची मागणी:

जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदा पारधी, उपसरपंच बबन केंगले, पोलिस पाटील नवनाथ केंगले, मारुती केंगले, सोनाली पोटे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी, रवी भवारी, शिवराम केंगले यांच्यासह ग्रामस्थांनी बिबट्याच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, कैलास काळे, सावता झोडगे, विनायक काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिक व जनावरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

वन विभागाची कारवाई कधी?

बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि नागरी वस्त्यांमधील त्यांच्या मुक्त संचारामुळे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वन विभागाकडून ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडleopardबिबट्याPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र