शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

महामार्गांवरील कोंडीमुळे लालपरी, ई-शिवाई, शिवनेरीला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:18 IST

- ई-शिवाई, शिवनेरीचे चार्जिंग डाऊन; पाच-तास प्रवासाला लागताहेत सात ते आठ 

पुणे : प्रवाशांची प्रचंड गर्दी, गाड्यांच्या रांगा, महामार्गावरील वाहतूककोंडीने परतीच्या प्रवासासाठी पुणे, मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एरव्ही सोलापूरहून पुण्याला पोहोचण्यासाठी पाच तास लागतात. परंतु, महामार्गावरील कोंडीमुळे या प्रवासासाठी तब्बल सात ते आठ तास लागत आहेत. यामुळे सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, बीड व इतर आगारांतून पुणे, मुंबईला जाणाऱ्या लालपरी, ई-शिवाई, शिवनेरीला नियोजित वेळेत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर नागरिक परत त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले आहेत. यामुळे बसस्थानक, खासगी ट्रॅव्हल्स आणि रेल्वेला प्रचंड गर्दी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून पुणे, मुंबई या प्रमुख शहरांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. परंतु, दिवाळीत चारचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे. परिणामी, फेरी पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे ई-शिवाई, शिवनेरीचे चार्जिंग डाऊन होते. त्याचा परिणाम पुढील फेरीवर होत आहे.पुणे एसटी विभागातून दादर, बोरिवली, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बीड, सातारा या शहरांदरम्यान ई-शिवाई, शिवनेरी बस धावतात. कोंडीमुळे नियोजित फेरीपेक्षा जादा फेऱ्यांचे नियोजन एसटी प्रशासनाकडून करण्यात येते. दरम्यान, दिवाळीमुळे गावी, पर्यटनाला जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. परंतु, वाहतूक कोंडीत अडकल्याने ई-शिवाई, शिवनेरीच्या बॅटरी (चार्जिंग) डाऊन होत आहेत. याचा परिणाम पुढील फेऱ्यांवर होत आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. 

नोकरीवर वेळेत जाण्यासाठी धडपड अन...

तीन, चार दिवसांच्या सुटीनंतर पुण्यात नोकरी करणारे माघारी निघाले आहेत. त्यामुळे सर्व बसेसना प्रचंड गर्दी आहे. शिवाय आगाऊ आरक्षणही फुल्ल झालेले असते. त्यामुळे अनेकजण चारचाकी घेऊन गेलेले पुणे, मुंबईचे नोकरदार कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रात्रीच निघत आहेत. परंतु, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महामार्गावर कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत पोहोचण्यासाठी धडपडत यावे लागत आहे. 

चार ते पाच किलोमीटर अंतरासाठी दीड ते दोन तास

छत्रपती संभाजीनगर - पुणे, नाशिक - पुणे, कोल्हापूर - पुणे, सोलापूर - पुणे, मुंबई मार्गावर वाहतूक कोंडीने चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे चार ते पाच किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागल्याचे काही वाहनधारकांनी सांगितले. 

...इथे होते वाहतूक कोंडी

नाशिकवरून येताना संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, राजगुरूनगर, चाकण औद्योगिक क्षेत्र, मोशी, भोसरी. कोल्हापूरवरून येताना तासवडे टोलनाका, कराड, सातारा, कात्रज नवीन बोगदा, नवले पूल, खेड शिवापूर टोलनाका परिसर, सोलापूरहून येताना लोणी काळभोर, उरळी कांचन, यवत. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून येताना शिरूर बायपास, रांजणगाव, कारेगाव, शिक्रापूर, सणवाडी, काेरेगाव, वाघोली, चंदननगर या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे प्रमुख मार्गांवर दोन ते चार किलोमीटरची रांग लागत आहेत.

पुण्यातून धावणाऱ्या ई-बसेसची आकडेवारी :

शहर - ई-बसेस संख्या

ठाणे - २०

दादर - २०

बोरिवली - २०

सोलापूर - १०

छत्रपती संभाजीनगर - १०

कोल्हापूर - १०

नाशिक - १०

बीड - ५

सातारा - ५

बारामती- ५

English
हिंदी सारांश
Web Title : Highway Congestion Hits State Transport Buses: Schedules Disrupted

Web Summary : Highway congestion after Diwali is severely delaying state transport buses like Lalpari and Shivneri. Passengers face extended travel times, with routes taking seven to eight hours instead of five. E-bus charging is also affected, disrupting schedules to major cities.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड