शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

विमा हप्त्यापोटी वाचलेले ४ हजार कोटी शेतकऱ्यांना देणे शक्य

By नितीन चौधरी | Updated: September 27, 2025 13:09 IST

खरीप पीक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा निकष वगळल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही; अन्य तीन निकषही वगळले

नितीन चौधरी 

पुणे : राज्य सरकारने यंदा खरीप पीक विमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा निकष वगळल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. मात्र, या निकषासह अन्य तीन निकषही वगळण्यात आले आहेत. परिणामी, विमा हप्ता १३ टक्क्यांवरून केवळ ४ टक्क्यांवर आला आहे. तसेच यंदा विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ कोटी ७० लाखांहून ९२ लाखांवर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारला पीक विमा योजनेत यंदा केवळ ९२४ कोटी रुपयांचा भार सोसावा लागला आहे. गेल्यावर्षी ही रक्कम सुमारे ५ हजार कोटी होती. त्यामुळे विमा हप्त्यापोटी वाचलेले तब्बल ४ हजार कोटी रुपये सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना दिले जाऊ शकतात. त्यासाठी नैसर्गिक आपत्तीमधून देण्यात येणाऱ्या २ हेक्टरच्या मदतीचे निकषही वाढविणे राज्य सरकारला शक्य आहे. त्यातून मदत कमी मिळाल्याचा शेतकऱ्यांचा रोष कमी करता येईल, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

खरीप पीक विमा योजनेत यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा निकष वगळला. गेल्यावर्षी या निकषातून राज्यातील शेतकऱ्यांना ३ हजार २१५ कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती. याचा अर्थ या स्थानिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाली. प्रत्यक्षात पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाई केवळ ८१ कोटी रुपये इतकी होती. यावरून उत्पादनात मोठी घट झाली नाही. अन्यथा या निकषाद्वारेही शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मोठी रक्कम मिळाली असती. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधूनही नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत दिली जाते. पीक विमा योजना आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून एकाच आपत्तीसाठी दोनवेळा मदत दिली जात होती. त्यामुळेच गेली दोन वर्षे यातून राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ८ हजार कोटी रुपयांचा भार पडला. गेल्यावर्षी राज्य सरकारने एक रुपयात विमा हप्ता उपलब्ध करून दिला होता. त्याचाही १ हजार ६०० कोटी रुपयांचा भार सरकारवर पडला होता. त्यामुळे विमा हप्त्याची रक्क्म १३ टक्क्यांवर पोहोचली होती.

त्यामुळेच यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती यासारखे चार निकष वगळण्यात आले आहेत. त्यामुळे विमा हप्ता १३ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. तसेच यंदा पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या १ कोटी ७० लाखांवरून ९२ लाख इतकी घटली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा भार कमी झाला आहे. यातून राज्य सरकारला केवळ ९२४ कोटी रुपयांचाच हप्ता विमा कंपन्यांना द्यावा लागला आहे. यातून राज्य सरकारचे सुमारे ४ हजार कोटी रुपये वाचले आहेत. तर केंद्र सरकारचेही सुमारे २ हजार कोटी रुपये वाचले आहेत. त्यामुळेच विमा योजनेतून मिळणारी स्थानिक आपत्तीतील नुकसानभरपाई या वाचलेल्या ६ हजार कोटींमधून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधूनही देणे सहज शक्य आहे. त्यासाठी सध्या ठेवण्यात आलेली २ हेक्टरची मदत वाढवली जाऊ शकते. यातून गरजू शेतकऱ्यांना योग्य ती मदत देता येणे शक्य आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Saved crop insurance money could aid farmers in distress.

Web Summary : Maharashtra government saved ₹4,000 crore in crop insurance premiums. Waiving certain criteria reduced costs and farmer participation. These funds could now be used to increase disaster relief for farmers, easing financial burdens during crises.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAgriculture Schemeकृषी योजना