शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभाग सुधारल्यास सबंध राज्य सुधारेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 20:11 IST

महसूल विभागाच्या विभागाचे अभिलेख ब्लॉकचेन पद्धतीमध्ये आणल्यास सुलभतेने फेरफार नोंदविले जातील.

पुणे : “जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या ९० टक्के सामान्य नागरिकांना सेवा देताना अनेक चुका होतात. चुकीचे फेरफार, दबावाखाली एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर, सातबारा उताऱ्यावरील चुकीच्या नोंदी यामुळे सामान्य त्रस्त होतात. त्यामुळे महसूल विभागाच्या विभागाचे अभिलेख ब्लॉकचेन पद्धतीमध्ये आणल्यास सुलभतेने फेरफार नोंदविले जातील. परिणामी नवीन प्रकरणे तयारच होणार नाहीत. यापुढे नवीन महसुली प्रकरणे तयार होणार नाहीत यासाठी काम करायचे तसेच जुन्या महसुली प्रकरणांना लोकअदालतींमधून निकाली काढायचे. यातून महसूल विभाग सुधारल्यास सबंध राज्य सुधारेल,” अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

 छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवापंधरवडाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, खासदार मेधा कुलकर्णी, शहर व जिल्ह्यातील अनेक आमदार, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून अनेक सेवा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यातील ५० टक्के सेवा या केवळ महसूल विभागातूनच दिल्या जातात. या सेवा देताना सामान्यांचे जीवन सुलभ होईल यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणारी गर्दी कमी करायची आहे. अनेक नागरिक सातबारा उताऱ्यातील कामांसाठी मंत्रालयात येताना दिसतात. ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून अभिलेख ब्लॉकचेन पद्धतीमध्ये आणणे गरजेचे आहे. त्यामुळे फेरफारची कामे सुलभतेने होतील. सामान्यांच्या जीवनात सुलभता आणायची असल्यास नवीन महसुली प्रकरणे तयार होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच लोकअदालतीच्या माध्यमातून जुन्या महसुली प्रकरणांना निकाली काढून सामान्यांना न्याय द्यावा लागणार आहे.” राज्य सरकारतर्फे ११०० सेवा ऑनलाईन तसेच व्हॉटस्अॅपवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यातील ४४ सेवा येत्या तीन महिन्यांत, तर २६ जानेवारीपर्यंत व उर्वरित २०० सेवा एकमेपर्यंत देण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 पाणंद रस्त्यांची लोकचळवळ व्हावी

शेतकऱ्यांच्या जीवनात पाणंद रस्त्यांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे हे रस्ते मोकळे करण्याची मागणी होत असते. या रस्त्यांवरील अतिक्रमण तसेच हद्दीवरून होणारे वाद टाळण्यासाठी आता हे रस्ते जीआयएस नकाशांवर आणले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले रस्ते मिळतील. यातून गावागावांमधील अर्थकारण परिवर्तित होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पाणंद रस्त्यांच्या कामासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेतल्याचे सांगत जलयुक्त शिवार योजनेत ज्या पद्धतीने कामे झाली त्याची लोकचळवळ झाली, अशीच चळवळ या माध्यमातूनही होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा

पवार यांनी या वेळी पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी गावात पाणंद रस्त्यांच्या झालेल्या कामाबाबत कौतुक करत अधिकाऱ्याने ठरविल्यास सामान्यांचा त्रास कमी कसा करता येईल, याचे हे आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यातील अधिकाऱ्यांना आपल्या गावात असे काम करण्यासाठी या गावाचा आदर्श घ्यावा असा सल्ला दिला. 

...तर गवगवा झाला नसतातर सोलापूरमधील कुर्डू येथील अवैध उत्खननावरून महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत झालेल्या वादावरही त्यांनी मिश्किल भाष्य केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रस्त्यांसाठी मुरूम टाकल्यास रॉयल्टी लागणार नाही तसेच पोलिसांचा बंदोबस्त ही मोफत असेल असे सांगितले. त्यामुळे पोलीसांनी पाणंद रस्त्यावर मुरूम टाकणे टाकण्यासाठी परवानगी आहे याची नोंद घ्यावी. सर्व ही बाब तिकडे सोलापुरातही सांगावे, असा मिश्किल टोला लगावत बावनकुळे यांनी ही योजना एक महिन्यापूर्वी आणली असती तर या बाबीचा गवगवा झाला नसता, असा खुलासाही केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस