शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महसूल विभाग सुधारल्यास सबंध राज्य सुधारेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 20:11 IST

महसूल विभागाच्या विभागाचे अभिलेख ब्लॉकचेन पद्धतीमध्ये आणल्यास सुलभतेने फेरफार नोंदविले जातील.

पुणे : “जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या ९० टक्के सामान्य नागरिकांना सेवा देताना अनेक चुका होतात. चुकीचे फेरफार, दबावाखाली एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर, सातबारा उताऱ्यावरील चुकीच्या नोंदी यामुळे सामान्य त्रस्त होतात. त्यामुळे महसूल विभागाच्या विभागाचे अभिलेख ब्लॉकचेन पद्धतीमध्ये आणल्यास सुलभतेने फेरफार नोंदविले जातील. परिणामी नवीन प्रकरणे तयारच होणार नाहीत. यापुढे नवीन महसुली प्रकरणे तयार होणार नाहीत यासाठी काम करायचे तसेच जुन्या महसुली प्रकरणांना लोकअदालतींमधून निकाली काढायचे. यातून महसूल विभाग सुधारल्यास सबंध राज्य सुधारेल,” अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

 छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवापंधरवडाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, खासदार मेधा कुलकर्णी, शहर व जिल्ह्यातील अनेक आमदार, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून अनेक सेवा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यातील ५० टक्के सेवा या केवळ महसूल विभागातूनच दिल्या जातात. या सेवा देताना सामान्यांचे जीवन सुलभ होईल यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येणारी गर्दी कमी करायची आहे. अनेक नागरिक सातबारा उताऱ्यातील कामांसाठी मंत्रालयात येताना दिसतात. ऑनलाईन सेवांच्या माध्यमातून अभिलेख ब्लॉकचेन पद्धतीमध्ये आणणे गरजेचे आहे. त्यामुळे फेरफारची कामे सुलभतेने होतील. सामान्यांच्या जीवनात सुलभता आणायची असल्यास नवीन महसुली प्रकरणे तयार होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच लोकअदालतीच्या माध्यमातून जुन्या महसुली प्रकरणांना निकाली काढून सामान्यांना न्याय द्यावा लागणार आहे.” राज्य सरकारतर्फे ११०० सेवा ऑनलाईन तसेच व्हॉटस्अॅपवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यातील ४४ सेवा येत्या तीन महिन्यांत, तर २६ जानेवारीपर्यंत व उर्वरित २०० सेवा एकमेपर्यंत देण्याचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 पाणंद रस्त्यांची लोकचळवळ व्हावी

शेतकऱ्यांच्या जीवनात पाणंद रस्त्यांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे हे रस्ते मोकळे करण्याची मागणी होत असते. या रस्त्यांवरील अतिक्रमण तसेच हद्दीवरून होणारे वाद टाळण्यासाठी आता हे रस्ते जीआयएस नकाशांवर आणले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले रस्ते मिळतील. यातून गावागावांमधील अर्थकारण परिवर्तित होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पाणंद रस्त्यांच्या कामासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेतल्याचे सांगत जलयुक्त शिवार योजनेत ज्या पद्धतीने कामे झाली त्याची लोकचळवळ झाली, अशीच चळवळ या माध्यमातूनही होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा

पवार यांनी या वेळी पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी गावात पाणंद रस्त्यांच्या झालेल्या कामाबाबत कौतुक करत अधिकाऱ्याने ठरविल्यास सामान्यांचा त्रास कमी कसा करता येईल, याचे हे आदर्श उदाहरण असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यातील अधिकाऱ्यांना आपल्या गावात असे काम करण्यासाठी या गावाचा आदर्श घ्यावा असा सल्ला दिला. 

...तर गवगवा झाला नसतातर सोलापूरमधील कुर्डू येथील अवैध उत्खननावरून महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत झालेल्या वादावरही त्यांनी मिश्किल भाष्य केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रस्त्यांसाठी मुरूम टाकल्यास रॉयल्टी लागणार नाही तसेच पोलिसांचा बंदोबस्त ही मोफत असेल असे सांगितले. त्यामुळे पोलीसांनी पाणंद रस्त्यावर मुरूम टाकणे टाकण्यासाठी परवानगी आहे याची नोंद घ्यावी. सर्व ही बाब तिकडे सोलापुरातही सांगावे, असा मिश्किल टोला लगावत बावनकुळे यांनी ही योजना एक महिन्यापूर्वी आणली असती तर या बाबीचा गवगवा झाला नसता, असा खुलासाही केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस