शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
5
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
6
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
7
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
8
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
9
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
10
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
11
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
12
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
13
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
14
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
15
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
16
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
17
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
18
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
19
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
20
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

Purandar Airport : विमानतळ बाधित सात गावांतील शेतकऱ्यांचा शासना विरोधात संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 15:58 IST

पुरंदर विमानतळ बाधित गावांतील शेतकऱ्यांचा संघर्ष तीव्र : शासनाच्या घोषणांना फाटा

- गणेश मुळीक

सासवड : पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेली आठ वर्षे आंदोलने करून शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. सरकारने चारपट मोबदला आणि एअरोसिटीमध्ये १० टक्के विकसित भूखंड देण्याचे जाहीर करूनही शेतकऱ्यांचा रोष कायम आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १७ जुलै रोजी मुंबईत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी, ‘स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना भरघोस मोबदला, भूखंड आणि नोकरीच्या संधी दिल्या जातील,’ असे जाहीर केले. मात्र, या घोषणेला शेतकरी 'मुंगेरीलाल के हसीन सपने' म्हणत फेटाळून लावत आहेत.

१९८८ पैकी १८९५ शेतकऱ्यांचा ठाम विरोधपारगाव, खानवडी, वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर आणि मुंजवडी या सात गावांतील २३०७ शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या. त्यांतील १८९५ शेतकऱ्यांनी लेखी विरोध केला, तर केवळ ९३ शेतकऱ्यांनी संमती दिली – तेही बहुतांश बाहेरील गुंतवणूकदार असल्याचा आरोप संघर्ष समितीचे प्रमुख पी. एस. मेमाणे यांनी केला. 

ड्रोन सर्व्हेला विरोध – पोलिसी कारवाईड्रोन सर्व्हेच्या वेळी शेतकऱ्यांनी विरोध केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यात अनेक शेतकरी जखमी झाले, मात्र गुन्हे मात्र शेतकऱ्यांवरच दाखल करण्यात आले. यावर विधानसभेतील पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आवाज उठविला.

सुपीक जमिनी, बहुपिकीय शेतीचा मुद्दाशेतकऱ्यांच्या मते, या भागातील जमीन अत्यंत सुपीक असून एका वर्षात दोन ते तीन पिके घेतली जातात. उसासह भाजीपाला, फळबागा यांमुळे इतरत्र विमानतळ स्थलांतरित करण्याची मागणी त्यांनी केली; पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून मोबदल्याच्या घोषणांद्वारे 'जखमेवर मीठ चोळले' आहे, असे मत व्यक्त होत आहे. राजकीय हालचाली, पण तोडगा नाहीपूर्वी विमानतळाच्या जागा बदलाबाबत आग्रही असलेले माजी आमदार संजय जगताप यांनी त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश करत, विमानतळ दुसरीकडे हलवण्याची मागणी पुन्हा केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत सकारात्मक संकेत दिले, तरी सरकारचे पाऊल मात्र जुन्याच जागेच्या दिशेने पडत आहे.

‘एमआयडीसी कायदा म्हणजे उच्चाटनाचा फॉर्म्युला’ : मेमाणेसन २०१९ मधील एमआयडीसी कायदा शेतकऱ्यांचे उच्चाटन करण्यासाठी आणला आहे का, असा प्रश्न उपस्थित करत मेमाणे म्हणाले, ‘शेतकरी रोज आंदोलन करू शकत नाहीत – पोटासाठी शेतात काम करावे लागते; पण आम्ही जमीन देणार नाही, हे ठाम आहे.’

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAirportविमानतळ