शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

तब्बल १० महिने उलटूनही जेजुरीच्या नवीन पाणी योजनेला मुहूर्तच लागेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:51 IST

- ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष; नाझरे जलाशयातून शहराला आठवड्यातून केवळ दोन वेळाच होतोय पाणीपुरवठा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामाला बसली खीळ

- बी. एम. काळेजेजुरी -  अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी वीर जलाशयावरून प्रस्तावित नवीन पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळूनही तब्बल दहा महिने उलटले, तरी कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे जेजुरीकरांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे.सध्या जेजुरीला नाझरे जलाशय आणि मांडकी डोह येथून पाणीपुरवठा होतो. मात्र, या दोन्ही योजना शहराची पाण्याची गरज भागवण्यास अपुरी पडतात. विशेषतः उन्हाळ्यात पाणीपुरवठा करणे जिकिरीचे ठरते. सध्या नाझरे जलाशय भरलेले असतानाही शहराला आठवड्यातून केवळ दोनदा पाणी मिळते. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन २०१८ मध्ये तत्कालीन जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी वीर जलाशयावरून पाणी पुरवठा योजनेची मागणी शासनाकडे केली होती. माजी आमदार संजय जगताप यांनी या योजनेचा पाठपुरावा करत सुमारे ६६ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करवला. यामध्ये वीर जलाशयातून १.४७३२ दशलक्ष

घनमीटर पाणी उचलण्याची परवानगी, जेजुरीपर्यंत पाइपलाइन, शहरात ५ लाख आणि २ लाख लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या आणि ३४ किमी लांबीच्या अंतर्गत पाइपलाइनचा समावेश आहे. ५ सप्टेंबर २०२४ रोजी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली. तर २६ सप्टेंबर २०२४ रोजी निविदा प्रक्रिया सुरू झाली. १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संतोष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीची ५९.६० कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामाला खीळ बसली.

रखडलेली योजनादहा महिन्यांनंतरही योजनेचे काम सुरू झालेले नाही. जेजुरी नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता नागनाथ बिराजदार यांनी सांगितले की, ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही, परंतु दोन दिवसांपूर्वी अनामत रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, योजनेच्या रखडण्याचे स्पष्ट कारण कोणीही देऊ शकलेले नाही. काही शासकीय अधिकारी शासनाकडे निधीची कमतरता असल्याचे सांगत असल्याची माहिती आहे.त्वरित काम सुरू करामाजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी शासनाला आवाहन केले आहे की, जेजुरीकरांचा अंत न पाहता योजनेचे काम तातडीने सुरू करावे. शहराला नियमित पाणीपुरवठा होणे ही काळाची गरज आहे. शासनाने त्वरित पावले उचलून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जेजुरीच्या नागरिकांना आता शासन आणि प्रशासन योजनेला गती देईल, याची प्रतीक्षा आहे. अन्यथा, पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र