शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
2
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
3
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
4
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
5
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
6
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
7
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
8
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
9
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
10
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
11
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
12
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
13
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
14
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
15
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
16
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
17
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
18
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
19
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
20
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात

तब्बल १० महिने उलटूनही जेजुरीच्या नवीन पाणी योजनेला मुहूर्तच लागेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:51 IST

- ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष; नाझरे जलाशयातून शहराला आठवड्यातून केवळ दोन वेळाच होतोय पाणीपुरवठा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामाला बसली खीळ

- बी. एम. काळेजेजुरी -  अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी वीर जलाशयावरून प्रस्तावित नवीन पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळूनही तब्बल दहा महिने उलटले, तरी कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे जेजुरीकरांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे.सध्या जेजुरीला नाझरे जलाशय आणि मांडकी डोह येथून पाणीपुरवठा होतो. मात्र, या दोन्ही योजना शहराची पाण्याची गरज भागवण्यास अपुरी पडतात. विशेषतः उन्हाळ्यात पाणीपुरवठा करणे जिकिरीचे ठरते. सध्या नाझरे जलाशय भरलेले असतानाही शहराला आठवड्यातून केवळ दोनदा पाणी मिळते. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन २०१८ मध्ये तत्कालीन जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी वीर जलाशयावरून पाणी पुरवठा योजनेची मागणी शासनाकडे केली होती. माजी आमदार संजय जगताप यांनी या योजनेचा पाठपुरावा करत सुमारे ६६ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करवला. यामध्ये वीर जलाशयातून १.४७३२ दशलक्ष

घनमीटर पाणी उचलण्याची परवानगी, जेजुरीपर्यंत पाइपलाइन, शहरात ५ लाख आणि २ लाख लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या आणि ३४ किमी लांबीच्या अंतर्गत पाइपलाइनचा समावेश आहे. ५ सप्टेंबर २०२४ रोजी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली. तर २६ सप्टेंबर २०२४ रोजी निविदा प्रक्रिया सुरू झाली. १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संतोष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीची ५९.६० कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामाला खीळ बसली.

रखडलेली योजनादहा महिन्यांनंतरही योजनेचे काम सुरू झालेले नाही. जेजुरी नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता नागनाथ बिराजदार यांनी सांगितले की, ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही, परंतु दोन दिवसांपूर्वी अनामत रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, योजनेच्या रखडण्याचे स्पष्ट कारण कोणीही देऊ शकलेले नाही. काही शासकीय अधिकारी शासनाकडे निधीची कमतरता असल्याचे सांगत असल्याची माहिती आहे.त्वरित काम सुरू करामाजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी शासनाला आवाहन केले आहे की, जेजुरीकरांचा अंत न पाहता योजनेचे काम तातडीने सुरू करावे. शहराला नियमित पाणीपुरवठा होणे ही काळाची गरज आहे. शासनाने त्वरित पावले उचलून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जेजुरीच्या नागरिकांना आता शासन आणि प्रशासन योजनेला गती देईल, याची प्रतीक्षा आहे. अन्यथा, पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र