शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १० महिने उलटूनही जेजुरीच्या नवीन पाणी योजनेला मुहूर्तच लागेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:51 IST

- ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष; नाझरे जलाशयातून शहराला आठवड्यातून केवळ दोन वेळाच होतोय पाणीपुरवठा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामाला बसली खीळ

- बी. एम. काळेजेजुरी -  अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी वीर जलाशयावरून प्रस्तावित नवीन पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळूनही तब्बल दहा महिने उलटले, तरी कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळे जेजुरीकरांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे.सध्या जेजुरीला नाझरे जलाशय आणि मांडकी डोह येथून पाणीपुरवठा होतो. मात्र, या दोन्ही योजना शहराची पाण्याची गरज भागवण्यास अपुरी पडतात. विशेषतः उन्हाळ्यात पाणीपुरवठा करणे जिकिरीचे ठरते. सध्या नाझरे जलाशय भरलेले असतानाही शहराला आठवड्यातून केवळ दोनदा पाणी मिळते. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन २०१८ मध्ये तत्कालीन जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी वीर जलाशयावरून पाणी पुरवठा योजनेची मागणी शासनाकडे केली होती. माजी आमदार संजय जगताप यांनी या योजनेचा पाठपुरावा करत सुमारे ६६ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करवला. यामध्ये वीर जलाशयातून १.४७३२ दशलक्ष

घनमीटर पाणी उचलण्याची परवानगी, जेजुरीपर्यंत पाइपलाइन, शहरात ५ लाख आणि २ लाख लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या आणि ३४ किमी लांबीच्या अंतर्गत पाइपलाइनचा समावेश आहे. ५ सप्टेंबर २०२४ रोजी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली. तर २६ सप्टेंबर २०२४ रोजी निविदा प्रक्रिया सुरू झाली. १० ऑक्टोबर २०२४ पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संतोष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीची ५९.६० कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कामाला खीळ बसली.

रखडलेली योजनादहा महिन्यांनंतरही योजनेचे काम सुरू झालेले नाही. जेजुरी नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता नागनाथ बिराजदार यांनी सांगितले की, ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही, परंतु दोन दिवसांपूर्वी अनामत रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, योजनेच्या रखडण्याचे स्पष्ट कारण कोणीही देऊ शकलेले नाही. काही शासकीय अधिकारी शासनाकडे निधीची कमतरता असल्याचे सांगत असल्याची माहिती आहे.त्वरित काम सुरू करामाजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी शासनाला आवाहन केले आहे की, जेजुरीकरांचा अंत न पाहता योजनेचे काम तातडीने सुरू करावे. शहराला नियमित पाणीपुरवठा होणे ही काळाची गरज आहे. शासनाने त्वरित पावले उचलून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जेजुरीच्या नागरिकांना आता शासन आणि प्रशासन योजनेला गती देईल, याची प्रतीक्षा आहे. अन्यथा, पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र