शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भीमाशंकर साखर कारखान्यावर चुकीचे आरोप करू नये; बाळासाहेब बेंडेंचा रमेश येवलेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 17:38 IST

काही दिवसांपूर्वी रमेश येवले यांनी पत्रकार परिषदेत भीमाशंकर कारखान्यावर काही गंभीर आरोप केले होते.

अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेली महत्त्वाची संस्था असून, त्याचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आहे. स्वतःच्या सवंग लोकप्रियतेसाठी रमेश येवले यांनी कारखान्यावर खोटे आरोप करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिला. पारगाव दत्तात्रयनगर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे आदी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी रमेश येवले यांनी पत्रकार परिषदेत भीमाशंकर कारखान्यावर काही गंभीर आरोप केले होते. त्याचा खुलासा करताना बेंडे म्हणाले, “भीमाशंकर कारखाना शेतकऱ्यांच्या शेतीच्या अर्थकारणाचा आधार आहे. कारखान्याने पारदर्शक कारभाराद्वारे राज्य आणि देशपातळीवर २९ पारितोषिके मिळवून नावलौकिक कमावला आहे. येवले यांच्यासारखे लोक सवंग लोकप्रियतेसाठी खोटे आरोप करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.”

त्यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा खुलासा करताना सांगितले की, मागील वर्षीच्या ४२६ कोटी रुपये कर्जाच्या तुलनेत यंदा कर्ज ३६ कोटींनी वाढून ४६२ कोटी रुपये झाले आहे. याचे कारण गाळपात वाढ, डिस्टिलरी आणि सहवीजनिर्मिती प्रकल्पांसाठी घेतलेले कर्ज, तसेच साखर आणि मोलॅसिसचा शिल्लक साठा वाढणे आहे. “कर्जाची परतफेड नियमित सुरू आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती सुदृढ आहे. यंदा शेतकऱ्यांना २१० रुपये प्रति टन अंतिम हप्ता दिला, जो वाढाव्यातून वाटण्यात आला. त्यामुळे नफा कमी दिसत आहे,” असे बेंडे यांनी स्पष्ट केले.

येवले यांनी ५० किलोमीटरहून अधिक अंतरावरील ऊस आणि बिगरनोंदीच्या उसामुळे नुकसान आणि उतारा कमी झाल्याचा आरोप केला होता. याबाबत बेंडे म्हणाले, “मागील हंगामात एकूण गाळपापैकी फक्त ३.७२ टक्के ऊस ५० किलोमीटर बाहेरून आला आणि केवळ २ टक्के ऊस बिगरनोंदीचा होता. यंदा साखर उतारा ११.८१ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे आरोप खोटे ठरतात. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले असताना भीमाशंकर कारखाना योग्य नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव देत आहे. “ज्यांनी कधी सहकारी संस्था चालवली नाही, त्यांनी कारखान्यावर खोटे आरोप करू नये,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

फोटो : पारगाव (ता. आंबेगाव) येथील पत्रकार परिषदेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील आणि संचालक.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र