शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

भीमाशंकर साखर कारखान्यावर चुकीचे आरोप करू नये; बाळासाहेब बेंडेंचा रमेश येवलेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 17:38 IST

काही दिवसांपूर्वी रमेश येवले यांनी पत्रकार परिषदेत भीमाशंकर कारखान्यावर काही गंभीर आरोप केले होते.

अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेली महत्त्वाची संस्था असून, त्याचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आहे. स्वतःच्या सवंग लोकप्रियतेसाठी रमेश येवले यांनी कारखान्यावर खोटे आरोप करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल, असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिला. पारगाव दत्तात्रयनगर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे आदी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी रमेश येवले यांनी पत्रकार परिषदेत भीमाशंकर कारखान्यावर काही गंभीर आरोप केले होते. त्याचा खुलासा करताना बेंडे म्हणाले, “भीमाशंकर कारखाना शेतकऱ्यांच्या शेतीच्या अर्थकारणाचा आधार आहे. कारखान्याने पारदर्शक कारभाराद्वारे राज्य आणि देशपातळीवर २९ पारितोषिके मिळवून नावलौकिक कमावला आहे. येवले यांच्यासारखे लोक सवंग लोकप्रियतेसाठी खोटे आरोप करत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.”

त्यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा खुलासा करताना सांगितले की, मागील वर्षीच्या ४२६ कोटी रुपये कर्जाच्या तुलनेत यंदा कर्ज ३६ कोटींनी वाढून ४६२ कोटी रुपये झाले आहे. याचे कारण गाळपात वाढ, डिस्टिलरी आणि सहवीजनिर्मिती प्रकल्पांसाठी घेतलेले कर्ज, तसेच साखर आणि मोलॅसिसचा शिल्लक साठा वाढणे आहे. “कर्जाची परतफेड नियमित सुरू आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती सुदृढ आहे. यंदा शेतकऱ्यांना २१० रुपये प्रति टन अंतिम हप्ता दिला, जो वाढाव्यातून वाटण्यात आला. त्यामुळे नफा कमी दिसत आहे,” असे बेंडे यांनी स्पष्ट केले.

येवले यांनी ५० किलोमीटरहून अधिक अंतरावरील ऊस आणि बिगरनोंदीच्या उसामुळे नुकसान आणि उतारा कमी झाल्याचा आरोप केला होता. याबाबत बेंडे म्हणाले, “मागील हंगामात एकूण गाळपापैकी फक्त ३.७२ टक्के ऊस ५० किलोमीटर बाहेरून आला आणि केवळ २ टक्के ऊस बिगरनोंदीचा होता. यंदा साखर उतारा ११.८१ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे आरोप खोटे ठरतात. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले असताना भीमाशंकर कारखाना योग्य नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव देत आहे. “ज्यांनी कधी सहकारी संस्था चालवली नाही, त्यांनी कारखान्यावर खोटे आरोप करू नये,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

फोटो : पारगाव (ता. आंबेगाव) येथील पत्रकार परिषदेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील आणि संचालक.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र