शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

भारत सरकारने क्रिकेट सामन्यासाठी आपली भूमिका बदलली का? सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:12 IST

- विरोधकांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सरकारकडून निधी डावलला जातो

पुणे : केंद्र सरकारकडून जलजीवन मिशनसाठी निधी मिळत असला तरी राज्य सरकार विरोधकांच्या मतदारसंघातील विकासकामांना निधी देत नाही, ही अस्वस्थ करणारी बाब आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

खासदार सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जलजीवन अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांपैकी ७० टक्के कामे अद्याप अपूर्ण असल्याचे नमूद केले. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे काम अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी झालेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले.

क्रिकेट सामन्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, “एकीकडे पाणी देत नाही म्हणायचे आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायचे? भारत सरकारने क्रिकेट सामन्यासाठी आपली भूमिका बदलली का?” अशी विचारणा त्या केंद्र सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाबाबत गोंधळमराठा आरक्षणासंदर्भात जीआर काढण्यात आल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. सरकारमधील काही लोक वेगवेगळी विधाने करीत असून, यामुळे वातावरण बिघडत आहे. सरकारने कटुता वाढवू नये, असे सुळे म्हणाल्या. याबाबत स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.राज ठाकरे यांचे स्वागत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या, “समविचारी पक्षासोबत जाण्यास काहीच हरकत नाही. राज ठाकरे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे.” काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आम्ही अनेकदा स्वतंत्र लढलो आहोत, त्यामुळे ठाकरे गटाबाबत आम्हाला कोणतीही अडचण नाही, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSupriya Suleसुप्रिया सुळेPakistanपाकिस्तानIndiaभारत