शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचन ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून गोंधळ; पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:13 IST

सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या नव्या इमारतीसमोर पार पडलेल्या या सभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवड प्रक्रियेमुळे वातावरण तापले, आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.

उरुळी कांचन : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून मोठा गदारोळ झाला. सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतच्या नव्या इमारतीसमोर पार पडलेल्या या सभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवड प्रक्रियेमुळे वातावरण तापले, आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.

ग्रामसभेच्या सुरुवातीला नियमित विषयांवर चर्चा झाली. मागील सभेचा वृत्तांत, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समिती, आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समिती स्थापनेवर चर्चा झाली. ग्राम स्वराज सॉफ्टवेअर वापरण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, कालवा अस्तरीकरण, स्वच्छता यासह विविध विषयांवर ठराव मंजूर झाले. तसेच, मतदार यादीतील १४५० नावे हरकतींमुळे कमी करण्यात आल्याबाबत ही चर्चा झाली, आणि यावर आरोप-प्रत्यारोप झाले.

ग्रामसभेचा मुख्य वाद महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून उद्भवला. माजी अध्यक्ष अलंकार कांचन यांनी राजीनामा दिल्याने नवीन अध्यक्ष निवडण्याचा मुद्दा उपस्थित झाला. चार अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी दोन अर्ज कागदपत्रांच्या अभावी अपात्र ठरले. उर्वरित दोन उमेदवार, योगेश कांचन आणि महादेव बापू कांचन, यांच्या नावांवर चर्चा झाली.

ग्रामसेवक प्रकाश गळवे यांनी शासकीय नियमांचे वाचन करत पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता अधोरेखित केली. त्यानंतर बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न झाले, परंतु ते निष्फळ ठरले. यामुळे सरपंच ऋतुजा कांचन यांनी सर्वाधिकाराने महादेव बापू कांचन यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली.

 ग्रामस्थांचा आक्षेप आणि गोंधळ

या निर्णयाला काही ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आणि लोकशाही पद्धतीने निवड न झाल्याचा आरोप केला. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक कार्यालयावर धडक देत घोषणाबाजी केली, ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण कांबळे, बापूसाहेब म्हत्रे, प्रवीण चौधर, सुजाता भुजबळ, सातव, जगताप यांच्यासह मोठ्या पोलिस बंदोबस्ताने परिस्थिती नियंत्रणात आणली. 

आजची निवड प्रक्रिया सरपंचांनी लोकशाही पद्धतीने न करता मनमानीने केली. माझा अर्ज का बाद झाला याचा खुलासा व्हायला हवा. ग्रामसभेचा हक्क भंग झाला आहे, आणि आम्ही याविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत.  - योगेश कांचन, तंटामुक्ती अध्यक्षपदाचे उमेदवार  

 मी स्वतः राजीनामा दिला होता आणि ही निवड पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी केली होती. मात्र, सरपंचांनी बेकायदेशीरपणे निवड जाहीर केली. ग्रामसेवकांनी बंद दाराआड उमेदवारांशी चर्चा केली, याचा खुलासा व्हायला हवा. ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकता सभा संपवण्यात आली. -अलंकार कांचन, माजी तंटामुक्ती अध्यक्ष   

‘झालेल्या ग्रामसभेचा वृत्तांत जसा आहे तसा सादर करणार आहे. तंटामुक्ती अध्यक्षपदाचा निर्णय सरपंचांनी जाहीर केला आहे. - प्रकाश गळवे, ग्रामसेवक  

‘महादेव बापू कांचन यांची निवड सर्वानुमते आणि गावात वाद टाळण्यासाठी माझ्या सर्वाधिकाराने करण्यात आली. त्यांनी यापूर्वी भैरवनाथ उत्सव समितीवर चांगले काम केले आहे. बॅनर फाडण्याचा अनुचित प्रकार घडायला नको होता. मागील तंटामुक्ती अध्यक्ष कायदेशीर होते की नाही याची चौकशी आम्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे, आणि त्यानंतर याचा खुलासा होईल.’  - ऋतुजा अजिंक्य कांचन, सरपंच

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड