शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

इंदापूरच्या सामाजिक वनीकरण कार्यालयात अनागोंदी;वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा ठावठिकाणा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 12:05 IST

सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गेल्या दीड वर्षापासून इंदापूरच्या कार्यालयात फिरकलेच नसल्याने ‘कार्यालयात आलेला वनपरिक्षेत्र अधिकारी दाखवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा’

इंदापूर : सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गेल्या दीड वर्षापासून इंदापूरच्या कार्यालयात फिरकलेच नसल्याने ‘कार्यालयात आलेला वनपरिक्षेत्र अधिकारी दाखवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा’, अशी घोषणा करण्याची वेळ आली आहे. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यालयीन कामकाजाचा बोजवारा उडाला असून, लोकोपयोगी योजनांची कामेही रखडली आहेत.

सविस्तर वृत्त असे की, दीड वर्षांपूर्वी नरेंद्र गोटमारे पाटील यांची सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारीपदी नेमणूक झाली. त्यांच्याकडे शिरूर तालुक्यासह इंदापूरच्या वनपरिक्षेत्राची जबाबदारी आहे. मात्र, ते शिरूरमध्येच रमले असून, इंदापुरात कधीच आले नाहीत. येथील कार्यालयाचा कारभार लिपिकावर अवलंबून होता, परंतु मे महिन्यात त्या लिपिकाची बदली झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

काल पत्रकारांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयाला भेट दिली असता, दोन कर्मचारी निवांत गप्पा मारत बसलेले आढळले. यंदाच्या वर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आणि त्याची पूर्तता याबाबत विचारले असता, त्यांनी सात-आठ गावांत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. मात्र, गावांची नावे किंवा उद्दिष्टाची माहिती कार्यालयात उपलब्ध नव्हती. मे महिन्यात बदली झालेल्या लिपिकाकडेच सर्व माहिती असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला. जून-जुलैमध्ये उद्दिष्ट मिळाले असताना, मे महिन्यात बदली झालेल्या लिपिकाकडे माहिती कशी असेल? असा प्रश्न उपस्थित होतो. यावरून जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कर्मचारी केवळ पगारासाठी हजेरी लावत असल्याचे स्पष्ट होते.

योजनांचा बोजवारा, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

सामाजिक वनीकरण विभागामार्फत रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांवर, सरकारी व सार्वजनिक जमिनींवर फलदायी आणि उपयुक्त वृक्ष लागवड केली जाते. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि स्थानिकांना फळ, लाकूड, चारा यांचा लाभ मिळतो. तसेच शेतजमिनींवर वृक्ष लागवड करून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि जमिनीची झीज रोखण्यास मदत होते. ‘कन्या वन समृद्धी योजना’ अंतर्गत मुलीच्या जन्मानिमित्त वृक्षारोपण आणि रोपांचे विनामूल्य वाटपही केले जाते. मात्र, या योजना प्रत्यक्षात राबविल्या गेल्या की नाही, याबाबत संशय आहे.

यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात विक्रमी पाऊस झाला. परंतु, त्यामुळे शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली. पावसाळ्यापूर्वी वृक्ष लागवड, शेतात बांध बांधणे, कव्हर क्रॉप्सचा वापर यासाठी कार्यालयाने शेतकऱ्यांना सहकार्य केले असते, तर ही परिस्थिती टळली असती, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

कार्यालय परिसराचे विदारक चित्र

रात्रीच्या वेळी कार्यालय परिसरात कोणीही नसते. याचा फायदा घेत मद्यपी आणि गांजेकस लोक तिथे बसून आपले कार्यक्रम पार पाडतात, ज्याच्या खुणा सकाळी दिसून येतात. कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून, शेजारच्या इमारतीचा तर केवळ सांगाडाच उरला आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’ने याबाबत सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोणतीही हालचाल न केल्याने इमारतीची स्थिती जैसे थे आहे.

शेतकरी आणि नागरिकांमध्ये संताप

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यालय एकाकी पडले आहे. योजनांचा बट्ट्याबोळ झाला असून, पर्यावरणाचे संरक्षण आणि ग्रामीण विकासाच्या उद्दिष्टांना हरताळ फासला जात आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करून जबाबदार अधिकाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्याची मागणी नागरिक आणि शेतकऱ्यांतून होत आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे