शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

पुरंदर विमानतळ प्रकल्प रद्द करण्यासाठी बाधितांचे केंद्रीय हवाई राज्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:50 IST

- पुरंदर दौऱ्यावर आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना शेतकऱ्यांनी दिले निवेदन, २०१८ मध्ये या प्रकल्पाला मिळालेली एनओसी रद्द झाल्याचेही निदर्शनास आणून दिले, योग्य तो मार्ग काढण्याची केली विनंती

सासवड : पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप करत, हा प्रकल्प तातडीने रद्द करावा किंवा अन्यत्र हलवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.

शनिवारी (दि. २ ऑगस्ट) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी पुरंदरच्या दौऱ्यावर आले असता, विमानतळ प्रकल्पबाधित गावातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, साकेत जगताप, आनंद जगताप, संतोष जगताप यांच्यासह संघर्ष समिती प्रमुख पांडुरंग मेमाणे, कुंभारवळणच्या सरपंच मंजुषा गायकवाड, देवदास कामथे, वनपुरीचे माजी सरपंच रामदास कुंभारकर, शिवाजी कुंभारकर, सतीश कुंभारकर, महादेव कुंभारकर, सयाजी कुंभारकर, दादासो कुंभारकर, सोपान कुंभारकर, बबन खेडेकर, उदाचीवाडीचे विकास कुंभारकर, तात्या मगर आदी शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित विमानतळासाठी संपादित होणारी जमीन ही सुपीक आणि बागायती आहे. या क्षेत्रात शेतकरी वर्षातून तीन पिके घेतात आणि मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. २०१३ च्या भूसंपादन व पुनर्वसन कायद्यामुसार बागायती क्षेत्राचे भूसंपादन करण्यास मनाई आहे. तरीही पारगाव, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाला मिळालेली एनओसी रद्द झाली होती, परंतु २०२५ मध्ये पुन्हा त्याच जागेवर प्रकल्प प्रस्तावित झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

प्रकल्पाच्या स्थानाबाबत प्रश्न

शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या स्थानाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रस्तावित विमानतळाच्या ३६ किमी परिघात पश्चिमेस एनडीएचे विमानतळ, उत्तरेला ३६ किमीवर लोहगाव विमानतळ, पूर्वेला ४७ किमीवर बारामती विमानतळ आणि १३ किमी अंतरावर ऐतिहासिक पुरंदर किल्ला आहे. अशा ठिकाणी विमानतळ उभारणे कितपत योग्य आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रकल्पामुळे सातही गावातील शेतकऱ्यांचे भवितव्य आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने भूसंपादनाला त्यांचा ठाम विरोध आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे केली असून, हा प्रकल्प रद्द करावा किंवा स्थलांतरित करावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. 

समाधानकारक तोडगा काढणार

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मला शेतकऱ्यांबद्दल पूर्ण आस्था आहे. तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. तुमच्या भावना आणि म्हणणे मी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवेन आणि यावर समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड