शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
5
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
6
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
7
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
8
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
9
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
10
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
11
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
12
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
13
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
14
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
15
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
16
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
17
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
18
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
19
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
20
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला

पुरंदर विमानतळ प्रकल्प रद्द करण्यासाठी बाधितांचे केंद्रीय हवाई राज्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 12:50 IST

- पुरंदर दौऱ्यावर आलेल्या मुरलीधर मोहोळ यांना शेतकऱ्यांनी दिले निवेदन, २०१८ मध्ये या प्रकल्पाला मिळालेली एनओसी रद्द झाल्याचेही निदर्शनास आणून दिले, योग्य तो मार्ग काढण्याची केली विनंती

सासवड : पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप करत, हा प्रकल्प तातडीने रद्द करावा किंवा अन्यत्र हलवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.

शनिवारी (दि. २ ऑगस्ट) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी पुरंदरच्या दौऱ्यावर आले असता, विमानतळ प्रकल्पबाधित गावातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, साकेत जगताप, आनंद जगताप, संतोष जगताप यांच्यासह संघर्ष समिती प्रमुख पांडुरंग मेमाणे, कुंभारवळणच्या सरपंच मंजुषा गायकवाड, देवदास कामथे, वनपुरीचे माजी सरपंच रामदास कुंभारकर, शिवाजी कुंभारकर, सतीश कुंभारकर, महादेव कुंभारकर, सयाजी कुंभारकर, दादासो कुंभारकर, सोपान कुंभारकर, बबन खेडेकर, उदाचीवाडीचे विकास कुंभारकर, तात्या मगर आदी शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित विमानतळासाठी संपादित होणारी जमीन ही सुपीक आणि बागायती आहे. या क्षेत्रात शेतकरी वर्षातून तीन पिके घेतात आणि मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. २०१३ च्या भूसंपादन व पुनर्वसन कायद्यामुसार बागायती क्षेत्राचे भूसंपादन करण्यास मनाई आहे. तरीही पारगाव, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाला मिळालेली एनओसी रद्द झाली होती, परंतु २०२५ मध्ये पुन्हा त्याच जागेवर प्रकल्प प्रस्तावित झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत स्पष्ट माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

प्रकल्पाच्या स्थानाबाबत प्रश्न

शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या स्थानाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रस्तावित विमानतळाच्या ३६ किमी परिघात पश्चिमेस एनडीएचे विमानतळ, उत्तरेला ३६ किमीवर लोहगाव विमानतळ, पूर्वेला ४७ किमीवर बारामती विमानतळ आणि १३ किमी अंतरावर ऐतिहासिक पुरंदर किल्ला आहे. अशा ठिकाणी विमानतळ उभारणे कितपत योग्य आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रकल्पामुळे सातही गावातील शेतकऱ्यांचे भवितव्य आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने भूसंपादनाला त्यांचा ठाम विरोध आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे केली असून, हा प्रकल्प रद्द करावा किंवा स्थलांतरित करावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. 

समाधानकारक तोडगा काढणार

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मला शेतकऱ्यांबद्दल पूर्ण आस्था आहे. तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. तुमच्या भावना आणि म्हणणे मी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवेन आणि यावर समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड