शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
3
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
4
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
5
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
6
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
7
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
8
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
9
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
10
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
11
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
12
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
13
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
14
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
15
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
16
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
17
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
18
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
19
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
20
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

पुरंदरच्या बाधित शेतकऱ्यांना एरोसिटीत मिळणार विकसित भूखंड, २६७ हेक्टर क्षेत्र राखीव ठेवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 09:43 IST

- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार मिळणार लाभ, ८२ टक्के शेतकऱ्यांचा पाठिंबा

पुणे : प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी बाधितांच्या पुनर्वसनासाठी १० टक्के विकसित भूखंड देण्यात येणार असून भूसंपादनासाठी संमती देणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ होणार आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार एरोसिटीत हा भूखंड देण्यात येणार आहे. त्यासाठी आठवडाभरात संमती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. विमानतळासाठी सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार पुनर्वसनासाठी १० टक्के अर्थात २६७ हेक्टर (६६७.५ एकर) जमीन राखीव ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, भूसंपादनावर १३ हजार ३०० शेतकऱ्यांपैकी ८२ टक्के अर्थात १० हजार ८४९ शेतकऱ्यांनी हरकत घेतली नसल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पुंरदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी २०१३ च्या कायद्यानुसार मोबदला मिळेल असे पूर्वीच्या अधिसूचनेत जाहीर करण्यात आले होेते. मात्र, फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत घेतलेल्या बैठकीत यात बदल करून पुनर्वसन करता येईल, असा एमआयडीसीचा २०१९ चा कायदा लागू करून शेतकऱ्यांची मागणी मान्य केली आहे. त्यानुसार संमती देणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार असून त्यांना १० टक्के जमिनीचा परतावा अर्थात विकसित भूखंड मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ जमिनीच्या किमतीच्या चार पट मोबदला मिळणार आहे.

जमिनीचा परतावा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नोटीस काढण्यात येणार असून त्यात संमती देण्यासाठी शेतकऱ्यांना तपशील देण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच पुरंदर प्रांताधिकाऱ्यांचे सासवड येथील कार्यालयात ही संमती स्वीकारण्याची सोय करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार संमती स्वीकारली जाणार असून त्यानुसार भूखंडाचेही वाटप केले जाणार आहे. त्यामुळे प्रथम संमती देणाऱ्याला मोक्याचा भूखंड मिळणार आहे. यासाठी विमानतळ परिसरात एरोसिटीची स्थापना करून येणार असून, त्यात हा विकसित केलेला भूखंड देण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. पुनर्वसनाच्या सूत्रानुसार १० टक्के जमीन देण्यात येणार आहे. त्यामुळे ही एकूण जमीन २६७ हेक्टर अर्थात ६६७.५ एकर राखीव ठेवण्यात येणार आहे. विमानतळासाठी प्रत्यक्ष सुमारे दीड हजार हेक्टर जमीन लागणार असली तरी भूसंपादन त्यापेक्षा १ हजार हेक्टरपेक्षा जास्त करण्यात येणार आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी जमीन राखीव ठेवूनही आणखी जमीन शिल्लक राहणार आहे. याचा उपयोग भविष्यातील विस्तारासाठी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

८२ टक्के शेतकऱ्यांचा पाठिंबा, १८ टक्के जणांचा विरोध

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस देण्यात आल्या होत्या. यावर शेतकऱ्यांकडून २ हजार १६३ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यानंतर या हरकतींवर सुमारे महिनाभर चालल्या. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सात गावांमध्ये एकूण ३ हजार २६६ गट आहेत. त्यात १३ हजार ३०० खातेदार आहेत. त्यातील २ हजार ४५१ खातेदारांनीच एकूण २ हजार १६३ हरकती नोंदविल्या होत्या. तर तब्बल १० हजार ८४९ खातेदारांनी हरकतच घेतली नव्हती अर्थात या ८२ टक्के शेतकऱ्यांचा भूसंपादनाला पाठिंबा असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. तर केवळ १८ टक्के शेतकऱ्यांनीच विरोध केला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड