शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या प्राधान्य योजनेत सुमारे ६ लाख लाभार्थी वाढले, जिल्हानिहाय कोटा निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:50 IST

- काही जिल्ह्यांच्या शिधापत्रिका आणि लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ, तर काही जिल्ह्यांत घट झाली

पुणे : केंद्र सरकारने शिधापत्रिकेवर धान्यवाटप करताना राज्याला अंत्योदय योजनेचे शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे लाभार्थी यांची संख्या निश्चित केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अंत्योदय योजनेसाठी एकूण शिधापत्रिकांच्या संख्येत कोणताही बदल केलेला नसला तरी प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत सुमारे ६ लाखांनी वाढ झाली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यांना मंजूर केलेल्या शिधापत्रिकांना या धान्यवाटपात समाविष्ट करून घेता येणार आहे. यात काही जिल्ह्यांच्या शिधापत्रिका आणि लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ, तर काही जिल्ह्यांत घट झाली आहे.

राज्य सरकारने अनेकदा निरनिराळ्या पद्धतीने धान्याच्या कोट्यात बदल करून देखील कोटा पूर्णपणे वितरित होत नसल्याचे दिसून आले आहे. शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवर डिजिटायझेशन करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या संख्येनुसार विनावापर कोटा शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवरील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या आधारे जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची राज्यात १ फेब्रुवारी २०१४ पासून अंमलबजावणी सुरू आहे. शिधापत्रिकाधारकांकडून त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न व प्रत्येक सदस्यांचा आधार क्रमांक यासह कुटुंबातील सदस्यांची सविस्तर माहिती दर्शविणारे सुधारित हमीपत्र देखील भरून घेण्यात येत आहे.

राज्यासाठी दिलेल्या एकूण कोट्याची पूर्तता होत नसल्याने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्यांचा सुधारित इष्टांक देण्याच्या दृष्टीने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवर डिजिटायझेशन करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या आधारे राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या कोट्यानुसार राज्यात २५ लाख ५ हजार ३० अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका निश्चित करण्यात आल्या आहेत. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत ५ कोटी ९८ लाख १२ हजार ७९६ इतकी आहे. गेल्या वर्षी अंत्योदय योजनेची संख्या कायम होती. तर प्राधान्य योजनेत ५ कोटी ९२ लाख १६ हजार ३१ लाभार्थी होते. यंदा त्यात ५ लाख ९६ हजार ७६५ लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली आहे.

पुणे जिह्यातील अंत्योदय योजनेसाठी ९ हजार १०० पत्रिकांची अतिरिक्त मागणी करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने ३१६ पत्रिका वाढवून दिल्या आहेत. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत सुमारे अडीच लाख लाभार्थी वाढवून मिळावेत अशी मागणी होती. प्रत्यक्षात ४८ हजार २४१ लाभार्थी संख्या वाढवून मिळाली आहे. ही वाढीव संख्या समप्रमाणात १३ तालुक्यांना विभागून देण्यात येईल. - महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारीपुणे शहरात अंत्योदय योजनेसाठी ५०० पत्रिकांची मागणी असताना ४५ ची वाढ आहे, तर प्राधान्य योजनेत ५ लाख लाभार्थ्यांची वाढीव मागणी करण्यात आली होती. त्यात केवळ २८ हजार ८९६ लाभार्थ्यांची वाढ देण्यात आली आहे. - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणेे शहर 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रfoodअन्न