शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आढळराव पाटील यांच्यासह ६७ बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 19:23 IST

- एकूण ६७ बैलगाडा मालक व शेतकऱ्यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

अवसरी : उत्तर पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या बैलगाडा शर्यती बंद पडल्या होत्या. शर्यती पूर्ववत सुरू व्हाव्यात या मागणीसाठी २० वर्षापूर्वी मंचर येथे केलेल्या आंदोलनामुळे माझ्यासह माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले व  एकूण ६७ बैलगाडा मालक व शेतकऱ्यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. खेड सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी शनिवारी (दि.१७) सबळ पुराव्या अभावी माझ्यासह सर्व बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता केली आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळाला आहे.असे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावेळी बैलगाडा मालक व आढळराव पाटील यांनी एकमेकांना पेढे भरून जल्लोष  साजरा केला.यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे व्हॉईस चेअरमन सागर काजळे,पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले,शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते.    यावेळी आढळराव पाटील म्हणाले,सन २००५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैलगाडा मालक व शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मी व किसनराव बाणखेले यांनी केले होते.वीस वर्षात मी ६७ वेळा न्यायालयात हजर राहिलो.सर्व आंदोलक शेतकरी न्यायालयात एकाच वेळी हजर राहणे जमत नव्हते त्यामुळे  खटला लांबणीवर पडला.मी पुढाकार घेतला.सर्वांची ओळख परेड झाली सबळ पुराव्या अभावी आमची निर्दोष मुक्तता झाली.२० वर्षानंतर आमच्या लढ्याला यश आले. 

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे नाव न घेता आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली.आढळराव पाटील म्हणाले “घोडीवर बसून अनेकांनी दावे केले की माझ्यामुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या.पण त्यात अजिबात तथ्य नाही.शर्यतीसाठी कोणाचा किती त्याग आहे. हे जनतेसमोर आहे.मी अनेक बैलगाडा घाटात उपस्थित असतो.

सध्या बैलगाडा शर्यतीला बाजारो स्वरूप आले आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, “उच्च न्यायालयाने व प्रशासनाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यासाठी अनेक निकष आहेत.बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका व पशुवैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात काहीच नसते तसेच देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीऐवजी वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती भरविल्या जातात.प्रशासन नियमाकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत जर पेटासारख्या संस्था पुन्हा कोर्टात गेल्या. तर बैलगाडा शर्यती पुन्हा अडचणीत येऊ शकतात.त्यासाठी सर्वांनी न्यायालय व शासनच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.” 

-बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात. म्हणून अनेकदा मी लोकसभेत प्रश्न धसास लावला. तसेच अनेकदा आंदोलन केली. -तीन खटले माझ्या विरोधात दाखल झाले. त्यापैकी एका खटल्यातून निर्दोष मुक्ताता झाली आहे. -गुन्हा दाखल झालेल्यांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी  सर्व गुन्हा दाखल झालेल्यांची ओळखपत्र कोर्टाने घेतली. त्यानंतर कोर्टाने निकाल दिला. -अँड गणेश होनराव, अँड मृणाल पडवळ, अँड.सोनम नाईकरे,अँड. कोमल बहिरट या कायद्यातज्ञांची विशेष सहकार्य लाभले. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र