शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

आढळराव पाटील यांच्यासह ६७ बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 19:23 IST

- एकूण ६७ बैलगाडा मालक व शेतकऱ्यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

अवसरी : उत्तर पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या बैलगाडा शर्यती बंद पडल्या होत्या. शर्यती पूर्ववत सुरू व्हाव्यात या मागणीसाठी २० वर्षापूर्वी मंचर येथे केलेल्या आंदोलनामुळे माझ्यासह माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले व  एकूण ६७ बैलगाडा मालक व शेतकऱ्यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. खेड सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी शनिवारी (दि.१७) सबळ पुराव्या अभावी माझ्यासह सर्व बैलगाडा मालकांची निर्दोष मुक्तता केली आहे. शेतकरी बांधवांना न्याय मिळाला आहे.असे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

यावेळी बैलगाडा मालक व आढळराव पाटील यांनी एकमेकांना पेढे भरून जल्लोष  साजरा केला.यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे व्हॉईस चेअरमन सागर काजळे,पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले,शिवाजी राजगुरू आदी उपस्थित होते.    यावेळी आढळराव पाटील म्हणाले,सन २००५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैलगाडा मालक व शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व मी व किसनराव बाणखेले यांनी केले होते.वीस वर्षात मी ६७ वेळा न्यायालयात हजर राहिलो.सर्व आंदोलक शेतकरी न्यायालयात एकाच वेळी हजर राहणे जमत नव्हते त्यामुळे  खटला लांबणीवर पडला.मी पुढाकार घेतला.सर्वांची ओळख परेड झाली सबळ पुराव्या अभावी आमची निर्दोष मुक्तता झाली.२० वर्षानंतर आमच्या लढ्याला यश आले. 

खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे नाव न घेता आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली.आढळराव पाटील म्हणाले “घोडीवर बसून अनेकांनी दावे केले की माझ्यामुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या.पण त्यात अजिबात तथ्य नाही.शर्यतीसाठी कोणाचा किती त्याग आहे. हे जनतेसमोर आहे.मी अनेक बैलगाडा घाटात उपस्थित असतो.

सध्या बैलगाडा शर्यतीला बाजारो स्वरूप आले आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, “उच्च न्यायालयाने व प्रशासनाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यासाठी अनेक निकष आहेत.बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका व पशुवैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात काहीच नसते तसेच देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीऐवजी वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती भरविल्या जातात.प्रशासन नियमाकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत जर पेटासारख्या संस्था पुन्हा कोर्टात गेल्या. तर बैलगाडा शर्यती पुन्हा अडचणीत येऊ शकतात.त्यासाठी सर्वांनी न्यायालय व शासनच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.” 

-बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात. म्हणून अनेकदा मी लोकसभेत प्रश्न धसास लावला. तसेच अनेकदा आंदोलन केली. -तीन खटले माझ्या विरोधात दाखल झाले. त्यापैकी एका खटल्यातून निर्दोष मुक्ताता झाली आहे. -गुन्हा दाखल झालेल्यांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी  सर्व गुन्हा दाखल झालेल्यांची ओळखपत्र कोर्टाने घेतली. त्यानंतर कोर्टाने निकाल दिला. -अँड गणेश होनराव, अँड मृणाल पडवळ, अँड.सोनम नाईकरे,अँड. कोमल बहिरट या कायद्यातज्ञांची विशेष सहकार्य लाभले. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र