शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

Vande Bharat Express: पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती, ५ हजार प्रवाशांना लाभ, ६७ लाखांचे रेल्वेला उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:35 IST

दररोज ही गाडी पुण्यातून शंभर टक्के भरून जात आहे. गेल्या आठ दिवसांत जवळपास ५ हजार नागरिकांनी यातून प्रवास केला आहे

पुणे: गेल्या दहा दिवसांपूर्वी पुणे-नागपूर दरम्यान ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. १२ तासांत प्रवास पूर्ण होत असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, बुधवार (दि. २०) पर्यंत आठ फेऱ्या झाल्या आहेत. यातून ४ हजार ९६५ प्रवाशांनी प्रवास केला असून, रेल्वेला ६७ लाख ९८ हजार ४४ इतके उत्पन्न मिळाले आहे.

पुण्यात विदर्भ आणि खान्देशात राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु या भागात जाण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहनांची सोय नाही. असेल तर सुरक्षित प्रवासाची गॅरंटी नाही. त्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेला कायम गर्दी असते. नुकतेच नागपूर विभागातून पुणे शहरासाठी वंदे भारत एक्स्प्रेस (दि. १०) ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली. तिकीट दर जास्त असले तरी रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे ‘वंदे भारत’ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाडीला आठ डबे आहेत. यातून एकावेळी ६२० प्रवशांची क्षमता आहे. दररोज ही गाडी पुण्यातून शंभर टक्के भरून जात आहे. गेल्या आठ दिवसांत जवळपास ५ हजार नागरिकांनी यातून प्रवास केला आहे. यामुळे रेल्वे आणि प्रवासी या दोघांचा फायदा होत आहे.

डबे वाढण्याची शक्यता 

पुढील काही दिवसांत दसरा, दिवाळी सण येणार आहेत. दरम्यानच्या काळात रेल्वेला प्रचंड गर्दी असते. अनेक वेळा तिकीट न मिळाल्याने प्रवासी उभे राहून प्रवास करतात. सध्या वंदे भारतला प्रवाशांची वाढती गर्दी पाहता भविष्यात डबे वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशी आहे आकडेवारी 

एकूण फेऱ्या -- ०८एकूण प्रवासी -- ४९६५एकूण उत्पन्न -- ६७,९८,०४४

वंदे भारत एक्स्प्रेसला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातून ही गाडी दररोज भरून जात आहे. -हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी

टॅग्स :PuneपुणेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसrailwayरेल्वेnagpurनागपूरpassengerप्रवासीticketतिकिट