शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवापराबाबत न्यायालयाच्या अवमानास पुणे महापालिकाच जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 20:03 IST

पुण्याचा पाणीवापर नियंत्रित असावा यासाठी जलसंपदा मंत्रालयाने आदेश द्यावेत, अशी मागणीही पुणे पाटबंधारे मंडळाने केली आहे. 

ठळक मुद्देजलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन होत नसल्याची करुन दिली जाणीवपाटबंधारे विभागाचे महापालिकेला पत्र महापालिकेला मंजुर पाणीच घ्यावे लागेल : जलसंपदा विभाग

पुणे : जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका पाणी वापर करत नसल्याची जाणीव पाटबंधारे विभागाने महापालिका आयुक्त सौरव राव यांना पत्राद्वारे करुन दिली आहे. तसेच, या प्रकरणी न्यायाधिकरणाचा अवमान झाल्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास महापालिकाच जबाबदार असेल, असेही त्यात बजावण्यात आले आहे. तसेच, पुण्याचा पाणीवापर नियंत्रित असावा यासाठी जलसंपदा मंत्रालयाने आदेश द्यावेत, अशी मागणीही पुणे पाटबंधारे मंडळाने केली आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सप्टेंबर २०१७मध्ये पुणे शहराला वार्षिक ८.१९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीवापर मंजुर केला होता. म्हणजेच ६३५ दशलक्ष लिटर (एमएलडी) दररोज पाणी वापरता येईल. त्यानंतर खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, सध्या महानगरपालिका १३५० एमएलडी पाणी उचलत आहे. महानगरपालिकेने अद्यापही जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. खडकवासला धरणातून पाणी घेण्याची यंत्रणा महानगरपालिकेची आहे. ती त्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन करुन पाणी घेण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे. महानगरपालिका वापरत असलेल्या जास्तीच्या पाण्यामुळे हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यात सिंचनासाठी पाणी कमी पडते. त्यामुळे जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे कायदेशीर अडचणी उद्भवल्यास अथवा आदेशाचा अवमान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पुणे महानगरपालिकेचीच राहिल, असे पाटबंधारे विभागाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.  -----------------महापालिकेमुळे उन्हाळी आवर्तनावर येणार गदा!कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन व उन्हाळ्यात  एक आवर्तन देण्याचा निर्णय झाला आहे. महानगरपालिकेच्या जास्तीच्या पाणीवापरामुळे उन्हाळ्यातील सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा राहणार नाही. जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेने पाणी वापर करावा यासाठी कालवा सल्लागार समितीला कळवावे, तसेच त्याबाबत आपण योग्य आदेश द्यावेत असे पत्रही पुणे पाटबंधारे विभागाने जलसंपदा मंत्र्यांच्या खासगी सचिवाला पाठविले आहे. ------------------

महापालिकेला मंजुर पाणीच घ्यावे लागेल : जलसंपदा विभागपुणे महापालिकेच्या पाणी वापराबाबत नुकतीच जलसंपदा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांची बैठक झाली. त्यात जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या विरोधात निर्णय घेता येणार नसल्याचे मान्य करण्यात आले. याबाबत नक्की काय करायचे त्याचा निर्णय ८ दिवसांत घेण्याचे तत्वत: मान्य करण्यात आले. मात्र, आठ दिवसांत त्यावर नक्की निर्णय होईल असे नाही. ही बाब राज्यसरकारवर अवलंबून असल्याची माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका