शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे : अतिवेगाला आवर घातल्याने घटले अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:44 IST

तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६० असणारी संख्या ३०६ पर्यंत खाली आली आहे. तर अमृतांजन पूल खंडाळा ते बोरजदरम्यान अपघातांची संख्या निम्म्याने घटली आहे.

- हणमंत पाटील/ विशाल विकारी लोणावळा (पुणे) : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचेप्रमाण घटले आहे. तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६० असणारी संख्या ३०६ पर्यंत खाली आली आहे. तर अमृतांजन पूल खंडाळा ते बोरजदरम्यान अपघातांची संख्या निम्म्याने घटली आहे.पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामागावर अपघाताचे प्रमाण वाढल्याने वेगाला आवर घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. तसेच अपघातांची ठिकाणे शोधून उपाययोजना केल्या होत्या. त्याचा परिणाम गेल्या तीन वर्षांत अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.४७ हजार वाहनांवर कारवाईवाहतुकीचे नियम मोडत वेगाने वाहने चालविणे, लेन कटिंग असे प्रकार करणाºया तब्बल ४७ हजार ४९३ वाहनांवर दोन वर्षांत खंडाळा महामार्ग पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून ६२ लाख ८० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. २०१८ मध्ये द्रुतगती मार्गावर अमृतांजन पूल ते मळवली बोरजदरम्यान ५१ अपघात झाले होते. २०१९ मध्ये ही संख्या घटून ३२ झाली आहे. तर मागील दोन महिन्यांत केवळ एक अपघात झाला आहे.वेगावर नियंत्रण महत्त्वाचेसततची पेट्रोलिंग, वेगमर्यादा व लेन कटिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईमुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे.वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास व लेन कटिंगचा मोह टाळल्यास अपघातांचे प्रमाण निश्चित मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे खंडाळा महामार्गाचे सहायकपोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांनी सांगितले.द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी करण्यासंदर्भात २०१८ पासून उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू केल्याने वाहनांची वेग मर्यादा ताशी शंभरवर आणण्यात यश आले आहे. त्यामुळे भरधाव वेगामुळे अपघात कमी झाले आहे.-मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा 

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेAccidentअपघात