शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Pune Mini Lockdown : संचारबंदीची भीती; बेरोजगारीचे संकट; हॉटेलमधील कर्मचारी थेट आपलं गाव गाठणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 00:16 IST

या परप्रांतीय कामगारांना मागच्यावेळी गाव गाठण्यासाठी चक्क प्रत्येकी वीस हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे आता निघावं की थांबावं या द्विधा मनस्थितीत ते अडकले आहेत.

प्राची कुलकर्णी

पुणे: पुणे शहरात प्रशासनाने शनिवारपासून जमावबंदी आणि संचारबंदी जाहीर केली आहे.तसेच हॉटेल व रेस्टॉरंट ७ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यामुळे हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे मोठे संकट ओढवले असून ते गावी परतण्याच्या तयारीत आहे. 

पुणे शहरात हॉटेल आणि रेस्टॉरंटची प्रचंड संख्या आहे. तसेच त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.त्यामुळे निश्चितपणे प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्णयामुळे आधीच मागच्या वर्षी अडचणीत आलेल्या या कर्मचाऱ्यांवर आता पुढे काय हा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे शहरातले हॉटेलमधले कर्मचारी पुन्हा एकदा गावाकडे जायला निघण्याच्या तयारीत दिसत आहेत. काहीही केलं तरी मागच्या वेळसारखी परिस्थिती येऊ द्यायची नाही अशीच खुणगाठ त्यांनी बांधली आहे.  

उत्तराखंडचे रमेश शर्मा ( नाव बदलले आहे)  पुण्यातल्या एका हॅाटेलात स्वयंपाकी म्हणून काम करतात गेल्या लॅाकडाउन मध्ये परवानगी मिळत नाही म्हणून काही दिवस शहरात राहीले. पण त्याचा फटका इतका की गावी जायला त्यांना प्रत्येक वीस हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे आता निघावं की थांबावं या द्विधा मनस्थितीत ते अडकले आहेत.

शर्मा म्हणाले ,” मागच्या संचारबंदीला हॉटेलकडून जेवढी होईल तेवढी मदत झाली होती. त्यानंतर संचारबंदीचे अजून दिवस १५ वाढवण्यात आले. मग आम्ही आमच्या गावी गेलो. कोणाचीही मदत न घेता प्रवासाला स्वतः खर्च केला. सरकारने तेव्हपासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. रेस्टोरंट बंद असले तरी ते आमच्या राहण्याची आणि खाण्याची सोय ते करत आहेत. सरकार आमच्यासाठी काहींचं करत नाहीत. त्यातून त्यांनी संचारबंदी लागू करून ठेवली आहे. आम्ही परराज्यातून स्वतःच्या परिवारासहित या ठिकाणी आलो आहोत. या संचारबंदीत किराणा माल, भाजीपाला सर्व गोष्टींची दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मग हॉटेल आणि रेस्टोरंट यांच्यावर का बंदी आणण्यात आली आहे." 

या परिस्थितीत उत्पन्न थांबलं आहे.  त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी हॅाटेल हेच त्यांचं घर बनले आहे. शिल्लक धान्यसाठा त्यांना शिधा पुरवतोय. पण हे किती दिवस चालणार हा प्रश्न त्यांना भेडसावतोय. पुढे काय याचे उत्तर त्यांना मिळायला तयार नाही.

 एक कर्मचारी म्हणाला ,” पुण्यात सात दिवसांसाठी हॉटेल आणि रेस्टोरंट बंद करण्यात आले आहेत. मागच्या वेळी प्रमाणे ही संचारबंदी वाढत जाण्याची आम्हाला भीती वाटू लागली आहे. मी घरात एकटा कमवता आहे. दर महिन्याला घरभाडे भरण्याची जबाबदारी माझ्यावरच असते. हॉटेलने राहण्याची सोय करून दिली आहे. त्यामुळे आम्ही इथेच राहत आहोत. घरी जाऊन कुटुंबियांना कुठं त्रास देणार म्हणून पर्याय नसल्याने येथे राहावे लागत आहे.” अर्थात परत फिरणे सोपे नाही याची जाणीवसुद्धा त्यांना आहे. 

 वेटरचे काम करणाऱ्या सुग्रीव म्हणाला, आम्हाला आता पुन्हा घरी जावे लागते की काय अशी भीती वाटू लागली आहे. संचारबंदी हा उपाय नाही. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या हॉटेल व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सद्यस्थितीत हॉटेलमधून आम्हाला सहकार्य होत आहे. आमचे पगार अजूनही थांबवले नाहीत. त्याचप्रमाणे राहण्याची सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसhotelहॉटेल