शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

Pune Lok Sabha Result 2024: लाेकसभेची निवडणूक फिरली स्थानिक मुद्यावर; पुणेकरांच्या संमिश्र भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 11:31 IST

निकालानंतर तरी कुठे काय चुकले, हे पाहणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत; तर काहींनी भाजप पुन्हा सत्तेत आले हेच समाधानकारक आहे, अशी भावना व्यक्त केली आहे....

पुणे : लाेकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपला चांगला धडा शिकविला आहे. धर्माचा, श्रद्धेचा मुद्दा चालला नाही. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेणे सामान्यांना रुचले नाही. यातही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक होता. या पार्श्वभूमीवर लाेकसभा निवडणूक निकालाबाबत ‘लाेकमत’ने पुणेकरांच्या भावना जाणून घेतल्या. निकालानंतर तरी कुठे काय चुकले, हे पाहणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत; तर काहींनी भाजप पुन्हा सत्तेत आले हेच समाधानकारक आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आहे. बोर्डात येणारे मूल केवळ उत्तम मार्क्स मिळून पास झाले, असे काहीसे झाले आहे. भाजप हे सगळ्यात अग्रेसर असणार हे तर माहीतच होते; पण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक होता. कुठे काय चुकले हे पाहणे गरजेचे आहे. सत्तेत भाजपच आले हे समाधानकारक आहे. भाजपच्या राज्यात सुरक्षित वाटते.

- अमृता देशपांडे, गृहिणी

सत्तेत कुणीही येवो काही फरक पडत नाही; पण जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. जनतेचे प्रश्न सोडून धर्म, जात या मुद्यावर निवडणुका लढविल्या जातात तेव्हा नक्की चाललंय काय? असा प्रश्न पडतो. सामान्यांना भेडसावणारे महागाई, बेरोजगारी, पाणी हे मुद्दे घेऊनच निवडणुकीत उतरणे आवश्यक आहे. भविष्यात खासदारांनी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच काम करणे अपेक्षित आहे.

- सुनीता रमेश पांढरे, गृहिणी

सत्ताधाऱ्यांना जनतेने चांगलाच धडा शिकविला आहे. जनतेने काँग्रेसला हात दिला, तर भाजपला काठावर पास केले. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी तसे म्हटले तर आशादायी चित्र आहे. यापुढील निवडणुकीत स्थानिक मुद्देच महत्त्वाचे ठरणार आहेत. गावागावांमध्ये लोकप्रतिनिधींनी काय काम केले यावरच भविष्यात पक्षांचे मूल्यमापन केले जाणार आहे, असा इशारा जनतेने या निवडणुकीतून दिला आहे.

- सोमनाथ राऊत, चार्टर्ड अकाउंटंट

महाराष्ट्रात ज्या पद्धतीने फोडाफोडीचे राजकारण झाले, तेच मुळात जनतेला पटले नाही. नेत्यांची दमदाटी, पैशाचा माज, उन्माद सत्ताधाऱ्यांमध्ये वाढला होता. राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी सारखे घेतलेले मुद्देच योग्य होते. हे जनतेला पटले. आज गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढली आहे. ती कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

- जीवन निवृत्ती चाकणकर, शेतकरी

काहीही म्हणा मोदी की गॅरंटीला धक्का लागला. विरोधी पक्षालाही चान्स मिळाला. एकाधिकारशाही चालणार नाही हे मतदारांनी दाखवून दिले आणि लोकशाहीला मजबूत केले.

- अरुणा उदय माने, गृहिणी

निवडणुका म्हटले की चढ-उतार येतातच. म्हणून मतदार दुरावत नाहीत. भाजपचा एक पारंपरिक वर्ग आहे. भाजपचा ४०० पारचा नारा यशस्वी झाला नसला तरी २४० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे निम्मी जनता मोदी यांच्याबरोबर आहे. तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होतील, याची आम्हाला खात्री आहे.

- केतकी पाध्ये

आता मतदार जागृत झाला आहे. लोकप्रतिनिधी चुकला तर मतदार चुका दाखवून देतात. मतदारांना गृहीत धरता येत नाही. तरीही लोकांच्या मनावर मोदींनी घेतलेली पकड कमी झालेली नाही. चुका सुधारून पुन्हा सत्तेत आले तर जनता नक्कीच स्वीकारेल.

- प्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :ravindra dhangekarरविंद्र धंगेकरmurlidhar moholमुरलीधर मोहोळLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPuneपुणे