शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

Pune Lok Sabha Result 2024: लाेकसभेची निवडणूक फिरली स्थानिक मुद्यावर; पुणेकरांच्या संमिश्र भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 11:31 IST

निकालानंतर तरी कुठे काय चुकले, हे पाहणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत; तर काहींनी भाजप पुन्हा सत्तेत आले हेच समाधानकारक आहे, अशी भावना व्यक्त केली आहे....

पुणे : लाेकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपला चांगला धडा शिकविला आहे. धर्माचा, श्रद्धेचा मुद्दा चालला नाही. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेणे सामान्यांना रुचले नाही. यातही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक होता. या पार्श्वभूमीवर लाेकसभा निवडणूक निकालाबाबत ‘लाेकमत’ने पुणेकरांच्या भावना जाणून घेतल्या. निकालानंतर तरी कुठे काय चुकले, हे पाहणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत; तर काहींनी भाजप पुन्हा सत्तेत आले हेच समाधानकारक आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आहे. बोर्डात येणारे मूल केवळ उत्तम मार्क्स मिळून पास झाले, असे काहीसे झाले आहे. भाजप हे सगळ्यात अग्रेसर असणार हे तर माहीतच होते; पण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक होता. कुठे काय चुकले हे पाहणे गरजेचे आहे. सत्तेत भाजपच आले हे समाधानकारक आहे. भाजपच्या राज्यात सुरक्षित वाटते.

- अमृता देशपांडे, गृहिणी

सत्तेत कुणीही येवो काही फरक पडत नाही; पण जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. जनतेचे प्रश्न सोडून धर्म, जात या मुद्यावर निवडणुका लढविल्या जातात तेव्हा नक्की चाललंय काय? असा प्रश्न पडतो. सामान्यांना भेडसावणारे महागाई, बेरोजगारी, पाणी हे मुद्दे घेऊनच निवडणुकीत उतरणे आवश्यक आहे. भविष्यात खासदारांनी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच काम करणे अपेक्षित आहे.

- सुनीता रमेश पांढरे, गृहिणी

सत्ताधाऱ्यांना जनतेने चांगलाच धडा शिकविला आहे. जनतेने काँग्रेसला हात दिला, तर भाजपला काठावर पास केले. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी तसे म्हटले तर आशादायी चित्र आहे. यापुढील निवडणुकीत स्थानिक मुद्देच महत्त्वाचे ठरणार आहेत. गावागावांमध्ये लोकप्रतिनिधींनी काय काम केले यावरच भविष्यात पक्षांचे मूल्यमापन केले जाणार आहे, असा इशारा जनतेने या निवडणुकीतून दिला आहे.

- सोमनाथ राऊत, चार्टर्ड अकाउंटंट

महाराष्ट्रात ज्या पद्धतीने फोडाफोडीचे राजकारण झाले, तेच मुळात जनतेला पटले नाही. नेत्यांची दमदाटी, पैशाचा माज, उन्माद सत्ताधाऱ्यांमध्ये वाढला होता. राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी सारखे घेतलेले मुद्देच योग्य होते. हे जनतेला पटले. आज गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढली आहे. ती कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

- जीवन निवृत्ती चाकणकर, शेतकरी

काहीही म्हणा मोदी की गॅरंटीला धक्का लागला. विरोधी पक्षालाही चान्स मिळाला. एकाधिकारशाही चालणार नाही हे मतदारांनी दाखवून दिले आणि लोकशाहीला मजबूत केले.

- अरुणा उदय माने, गृहिणी

निवडणुका म्हटले की चढ-उतार येतातच. म्हणून मतदार दुरावत नाहीत. भाजपचा एक पारंपरिक वर्ग आहे. भाजपचा ४०० पारचा नारा यशस्वी झाला नसला तरी २४० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे निम्मी जनता मोदी यांच्याबरोबर आहे. तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होतील, याची आम्हाला खात्री आहे.

- केतकी पाध्ये

आता मतदार जागृत झाला आहे. लोकप्रतिनिधी चुकला तर मतदार चुका दाखवून देतात. मतदारांना गृहीत धरता येत नाही. तरीही लोकांच्या मनावर मोदींनी घेतलेली पकड कमी झालेली नाही. चुका सुधारून पुन्हा सत्तेत आले तर जनता नक्कीच स्वीकारेल.

- प्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :ravindra dhangekarरविंद्र धंगेकरmurlidhar moholमुरलीधर मोहोळLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPuneपुणे