पुणे लोकसभेच्या चार मतदारसंघात सर्वच लढती काहींना काही कारणांनी राज्यासह देशपातळीवर चर्चेचे केंद्रस्थानी राहिले आहे.. उमेदवार जाहीर करण्यापासून ते प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीपर्यंत पुणे मतदारसंघातील चारही जागांवर घडलेल्या घडामोडी राजकारणाच्या फडात लक्षवेधी ठरल्या..बारामतीत सुप्रिया सुळे तर मावळ मधून पार्थ पवार यांच्या द्वारे पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.पुण्यातून गिरीश बापट यांच्यासह शिरूर मधून शिवाजीराव आढळराव यांच्या लढतीकडे लक्ष लागून आहे..
'' या '' उमेदवारांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लोकसभेच्या निकालावर
* ४७ लाख मतांची होणार मोजणी
* ९१६९ मतदान यंत्राचा झाला वापर
* ९३उमेदवार निवडणुकीच्या रिगणात, चौघांची होणार निवड
सुप्रिया सुळे। राष्ट्रवादी : ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्यातून तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मोर्चेबांधणी केली. २०१४ मध्ये अनपेक्षितरीत्या मताधिक्य घटल्याने, गेल्या पाच वर्षांत पद्धतशीरपणे संपर्क वाढविला. शहरी भागातून होणारी संभाव्य पीछेहाट ग्रामीण भागातून भरून निघण्याची अपेक्षा यांना असेल. .........गिरीश बापट । भाजप: पक्षाची वाढलेली संघटनात्मक ताकद, स्वत:कडचे कॅबिनेटमंत्रिपद यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविता आली नाही. विजयाचा विश्वास व्यक्त केला जात असला, तरी २०१४ मध्ये भाजपने मिळविलेले सव्वा तीन लाखांचे मताधिक्य राखणार की घसरणार, याचे औत्सुक्य असेल.
....शिवाजीराव आढळराव। शिवसेना : खासदारकीचा चौकार मारण्यासाठी इच्छुकअसताना ऐनवेळी तगडा प्रतिस्पर्धी समोर उभा ठाकल्याने सगळी समीकरणे बदलली. अनुभवाच्या बळावर जोरदार लढत दिली खरी; पण शिरूर, हडपसर आणि भोसरीतल्या मतदारांनी किती साथ दिली, यावर निकाल ठरेल.
.......