शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

विमानतळ बाधित सात गावांत जमीन खरेदी-विक्री एजंटांचा सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:10 IST

शेती उत्पन्नावर आधारित शेतकऱ्यांचा विमानतळाला विरोध, मात्र विक्री व्यवहार जोरात : बाधित सात गावांतील आकडेवारी समोर..व्यावसायिक, उद्योजकांकडून मोठी जमीनखरेदी

सासवड : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गावातील गावपुढाऱ्यांना हाताशी धरत जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांनी आपले बस्तान बसवत जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार जोरात चालवले आहेत. यामध्ये काही व्यवहार कायदेशीर तर अनेक व्यवहार बेकायदेशीर केले असल्याची माहिती मिळत आहे. सामाजिक भान नसल्याने तरुण पिढी आयत्या पैशाच्या मागे लागल्याचे दिसत आहे. निव्वळ शेती उत्पनावर आधारित शेतकरी कुटुंबाची मात्र यातून फरपट दिसत असल्याने विमानतळास विरोध वाढत आहे.

विमानतळाच्या भूसंपादनाला गती आली असून, भूसंपादनाची प्रक्रिया पुढे जात असतानाच विमानतळ बाधित वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, पारगाव या गावांतील भूसंपादनासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात अनेक बैठका शेतकऱ्यांसोबत घेत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांकडून मात्र सातत्याने कोणत्याही शेतकऱ्यांनी जमिनी विक्री करू नयेत, असे सांगितले तरी बाधित गावांमध्ये खरेदी खताचा धडाका सुरू आहे. उदाचीवाडी, एखतपूर, कुंभारवळण, खानवडी, पारगाव, मुंजवडी, वनपुरी या सात गावांमध्ये एक जानेवारी ते ३१ मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १५२ दस्त नोंदणी झाल्याची माहिती दस्त नोंदणी कार्यालयातून प्राप्त झाली आहे. सातही गावांतील एकूण दस्तांच्या नोंदणीसाठी ३४ लाख ५६ हजार ७३९ रुपये जमा झाले आहेत. एक कोटी ५३ लाख ५४ हजार ५०० रुपये इतकी रक्कम मुद्रांक शुल्कापोटी जमा झाले आहेत, अशी माहिती पुरंदरचे दुय्यम निबंधक आर. बी. फुलपगारे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे विमानतळ प्रकल्पाला सुरुवातीपासून कडवा विरोध करणाऱ्या पारगावात सर्वांत जास्त म्हणजे ७६ दस्तांची नोंदणी झाली आहे. यामध्ये दस्तांची केवळ संख्या असून, किती एकर क्षेत्राची विक्री झाली, ही माहिती गुलदस्त्यात आहे.

एकीकडे विमानतळ प्रकल्पाला विरोध दाखवायचा आणि दुसरीकडे स्वतःची आर्थिक भरभराट करण्यासाठी दलाली सुरूच ठेवायची, असा दुहेरी गोरख धंदा काही स्वयंघोषित समाजसेवक करीत आहेत, तसेच ज्या व्यक्तींना जमिनी दिल्या आहेत, त्या व्यक्ती पुणे, मुंबईसह अन्य जिल्ह्यांतील आहेत. अमराठी व्यक्तींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. गावपुढारीच जमीन विक्रीत दलालीचे काम करीत आहेत. केवळ आपले नाव पुढे येऊ नये म्हणून राजकीय पक्षाच्या नेते अथवा कार्यकर्त्यांना पुढे केले जात आहे. त्यातून व्यवहार पूर्ण होताच ठरलेली टक्केवारी वाटून घेतली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना याची भनकदेखील लागलेली नसते. केवळ गावपुढाऱ्यांवर विश्वास ठेवून विरोधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. खुद त्यांनीच जमिनीचे कागद केल्याचे अनेक दस्तांमधून दिसून आले आहे. त्यामुळे विमानतळ होईल अथवा न होईल. मात्र, येत्या काही वर्षांत पुरंदरमध्ये परप्रांतीय लोकांची संख्या वाढून स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

अशातच खानवडी येथील एक दस्त दुय्यम निबंधक रवींद्र फुलपगार यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला आहे. दस्त नोंदविताना संबंधित व्यक्तीला ओरिजनल आधार कार्ड मागितले होते. नंतर तो परत आला नाही, यानंतर त्यांनी दिलेल्या कलर आधार कार्डच्या झेरॉक्सची पडताळणी केली असता हे आधार कार्ड वैध नसल्याचे समजले. यानंतर संबंधितांना व्यक्ती बोगस असल्याचे सांगितले व हा दस्त ए.डी.एम. ठेवून रद्द लेखाचा दस्त नोंदविण्यात आला व यासंदर्भात खरेदी घेणाऱ्यांची फसवणूक झाली असल्यास त्यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - रवींद्र फुलपगार, दुय्यम निबंधक, सासवड

विमानतळ प्रकल्प बाधित गावांची १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीतील दस्त संख्या..

गावाचे नाव जानेवारी फेब्रुवारी मार्च एकूण दस्तउदाचीवाडी— ५ - ५ - ११ - २१एखतपूर — ५   -   ३ - २ -   १०कुंभारवळण— ०  -   १ - ९-  १०खानवडी—   ४  -  ९-  ७ २०पारगाव—   २४ - ३२- २०- ७६मुंजवडी—   २-१ - २ ५वनपुरी —   २ - ४ -४ १०

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडairplaneविमानAirportविमानतळ