शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Pune: शिंदवणे येथील कालव्यात चारचाकी कार कोसळली; एक ठार, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 11:44 IST

हा अपघात गुरुवारी (दि.२३) सकाळी सहाच्या सुमारास घडला आहे...

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन जेजुरी रस्त्यावर शिंदवणे गाव हद्दीत कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून नवीन बेबी कालव्याच्या लोखंडी कठडा तोडून कार गाडी पाण्यात पडली आहे. या अपघातात एकाच्या जागेवर मृत्यू झाला आहे तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.२३) सकाळी सहाच्या सुमारास घडला आहे.

अमर साहेबराव घाडगे (वय २८ रा.जुन्नर) या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गणेश संजय थोरात (वय २२) व शुभम शंकर इंगोले (वय २१) रा.दोघेही केसनंद ता. हवेली व आदित्य महादेव तावरे (वय २०रा.जुन्नर) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, कारमध्ये असलेल्या चौघांचा बकऱ्या विकण्याचा व्यवसाय आहे. आज सकाळी फलटण येथील बाजार असल्याने चौघेजण कार गाडीतून निघाले होते. शिंदवणे गावाच्या हद्दीत असलेल्या कालव्यावर आले असता कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट कालव्यात पाण्यात कोसळली. यामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चारचाकी कोसळल्याची माहिती मिळताच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मदत करून सर्वांना गाडीतून बाहेर काढले.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड