शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला; आतापर्यंत ७६ लाख शेतकऱ्यांना मिळाला ओळख क्रमांक

By नितीन चौधरी | Updated: March 12, 2025 09:48 IST

राज्यात असे १५ लाखांहून अधिक अर्ज तलाठ्यांच्या मान्यतेविना प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

पुणे : ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा नोंदणीतील सहभाग वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.दरम्यान, आधार कार्डावरील माहिती आधारे हे ओळखपत्र देण्यात येत असून, आधारमधील ८० टक्के माहिती जुळली तरी ओळख क्रमांक देण्यात येत आहेत. आता त्यापेक्षा कमी माहिती जुळत असली तरी पडताळणी करून अशा अर्जांवरही तलाठ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश भूमी अभिलेख विभागाने दिले आहेत. मात्र, असा अर्ज स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार तलाठ्यांनाच असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात असे १५ लाखांहून अधिक अर्ज तलाठ्यांच्या मान्यतेविना प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकारने या योजनेचा २० वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांना थेट निधी हस्तांरणाद्वारे जमा केला आहे. मात्र, २१ व्या हप्त्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करण्यासाठी सहभाग वाढविला आहे. त्यानुसार राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.

यात आतापर्यंत आघाडीवर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने अव्वल क्रमांक कायम ठेवला असून, जिल्ह्याने ओळख क्रमांकाचा पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ९ हजार ९८८ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात ४ लाख ५० हजार ६४० शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ६३२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.

जिल्हानिहाय ओळख क्रमांक

अकोला १५,१२७८

अमरावती २४,७२६६

बुलढाणा ३०४७३७

वाशिम १३१२५९

यवतमाळ २६६५९०

बीड २९०१९५

संभाजीनगर २५२८७१

धाराशिव १७५९०६

हिंगोली १४८५९४

जालना २२०२४२

लातूर १९९४७५

नांदेड २५१०१७

परभणी १८५००३

पालघर ७८२०१

रायगड ७४४९२

रत्नागिरी ११२५३४

सिंधुदुर्ग ७३४१६

ठाणे ५४,२५८

भंडारा १६२१५८

चंद्रपूर १९२५१६

गडचिरोली १२१५६५

गोंदिया १९०६४४

नागपूर १४७३२८

वर्धा १५२७५१

अहिल्यानगर ५०९९८८

धुळे १४९८१८

जळगाव ३७६८७८

नंदुरबार ९५५८२

नाशिक ४५०६४०

कोल्हापूर ३८३५४२

पुणे ४३४६३२

सांगली २६४७३२

सातारा ४०३१६६

सोलापूर ३८९२३२

मुंबई उपनगर ३४६

एकूण : ७६,३९,८५२

राज्यात ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. तलाठ्यांकडून योजनेला गती देण्यात आली आहे. तसेच आधार माहिती जुळण्याबाबत पडताळणी करून तो अर्ज मान्य करण्याबाबत सांगण्यात आले आहे. - सरिता नरके, राज्य संचालक, ॲॅग्रीस्टॅॅक, भूमिअभिलेख विभाग, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र